शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

CoronaVirus : महानगरांनी घेतला मोकळा श्वास; कोरोनाची आपत्ती प्रदूषण नियंत्रणात ठरली इष्टापत्ती

By गजानन दिवाण | Updated: April 15, 2020 13:39 IST

दिल्लीतील ‘सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट’ने केलेल्या पाहणीत ‘लॉकडाऊन’दरम्यान देशातील सर्वच महानगरांमधील प्रदूषण जवळपास ६१ टक्क्यांनी कमी नोंदविले गेले आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे देशातील सर्वच शहरांमधील स्थिती सुधारत आहे.लॉकडाऊनमुळे ही शहरे माणसांना श्वास घेण्यासारखी झाली आहेत.

- गजानन दिवाणऔरंगाबाद : ‘कोरोना’ची आपत्ती प्रदूषण नियंत्रणासाठी इष्टापत्ती ठरली आहे. कुठल्याच कायद्याने, प्रदूषणामुळे जाणाऱ्या मृत्यूच्या भीतीने वा आर्थिक नुकसानीमुळे जे होऊ शकले नाही, ते ‘कोरोना’मुळे झाले. विषारी वायूमध्ये जगणाऱ्या दिल्ली, मुंबईसह देशभरातील सर्वच महानगरांनी मोकळा श्वास घेतला. देशभरातील ‘लॉकडाऊन’मुळे सर्वच महानगरांतील प्रदूषण जवळपास ६१ टक्क्यांनी कमी झाले.

दिल्लीतील ‘सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट’ने केलेल्या पाहणीत ‘लॉकडाऊन’दरम्यान देशातील सर्वच महानगरांमधील प्रदूषण जवळपास ६१ टक्क्यांनी कमी नोंदविले गेले आहे. मुंबईत पीएम (पर्टिक्युलेट मॅटर) २.५ स्तर ६१ टक्के कमी नोंदविला गेला. दिल्लीत २६ टक्के, कोलकात्यात ६० टक्के, तर बंगळुरूमध्ये १२ टक्के कमी नोंद झाली.

जगभरातील ५० अति प्रदूषित शहरांमध्ये भारतातील २५ शहरे असल्याची नोंद गतवर्षी ‘आयक्यूएअर’ या स्वीसमधील संस्थेने केली होती. उद्योगांमुळे, वाहनांमुळे आणि कोळसा प्रकल्पांमुळेच भारतात प्रदूषण वाढत असल्याचे ‘आयक्यूएअर’ने म्हटले होते. आज लॉकडाऊनमुळे देशातील सर्वच शहरांमधील स्थिती सुधारत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या १३ एप्रिलच्या नोंदींनुसार नागपूर, भिवंडी, ठाणे, चंद्रपूर, आग्रा, दिल्ली, गुडगाव, गुवाहाटी,  इंदूर, पटणा या शहरांमधील प्रदूषणाची स्थिती सध्या सुधारत आहे. अहमदाबाद, भोपाळ, हैदराबाद, जयपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नाशिक, पुणे, सोलापूर या शहरांची स्थिती बरी आहे. अमृतसरमध्ये ठीक, तर बंगळुरू, लुधियाना, चेन्नई, औरंगाबाद आणि अमरावती या शहरांमधील प्रदूषणनियंत्रण चांगल्या स्थितीत आहे. मुंबईचा मार्च २०१९मध्ये एअर क्वालिटी इंडेक्स १५३ होता. म्हणजे आर्थिक राजधानी असलेले हे शहर माणसांना श्वास घेण्यायोग्य नव्हते. दिल्ली (एअर क्वालिटी इंडेक्स १६१)ची स्थिती तर यापेक्षा वाईट होती. लॉकडाऊनमुळे ही शहरे माणसांना श्वास घेण्यासारखी झाली आहेत.

- दिल्ली देशाची राजधानी दिल्लीत लॉकडाऊन आधीच्या तुलनेत पीएम १० चा स्तर ५१ टक्क्यांनी कमी, पीएम २.५ चा स्तर ४९ टक्क्यांनी, तर नायट्रोजन डायआॅक्साईड ३२ टक्क्यांनी कमी नोंदविले गेले आहे.

- मुंबईमहाराष्ट्राची राजधानी मुंबईत लॉकडाऊन आधीच्या तुलनेत पीएम १० चा स्तर ४९ टक्क्यांनी कमी, पीएम २.५ चा स्तर ४५ टक्क्यांनी, तर नायट्रोजन डायआॅक्साईड ६० टक्क्यांनी कमी नोंदविले गेले आहे.

- पुणेमहाराष्ट्रातील पुण्यात लॉकडाऊन आधीच्या तुलनेत पीएम १० चा स्तर ३२ टक्क्यांनी कमी, पीएम २.५ चा स्तर ३१ टक्क्यांनी, तर नायट्रोजन डायआॅक्साईड ३६ टक्क्यांनी कमी नोंदविले गेले आहे.

- अहमदाबादगुजरातमधील अहमदाबादेत लॉकडाऊन आधीच्या तुलनेत पीएम १० चा स्तर ४७ टक्क्यांनी कमी, पीएम २.५ चा स्तर ५७ टक्क्यांनी, तर नायट्रोजन डायआॅक्साईड ३२ टक्क्यांनी कमी नोंदविले गेले आहे.

स्रोत - शासनाची ‘सफर डॉट ट्रॉपमेट डॉट रेस डॉट इन’ वेबसाईट (ढोबळमानाने दोन प्रकारचे धूलिकण हवेत असतात. श्वसनामार्फत शरीरात जाणारे २.५ मायक्रोमीटरपेक्षा लहान असे पीएम २.५ कण आणि श्वसनातून शरीरात न जाणारे १० मायक्रोमीटरपेक्षा लहान पीएम १० कण.)

उद्या वाचा - रस्त्यांवरील आणि हवेतीलही ‘ट्राफिक’ कमी होणार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसenvironmentपर्यावरण