शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

जाणून घ्या, भारतातील पहिले IAS अधिकारी कोण होते? वयाच्या २१ व्या वर्षी मिळवलं होतं यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 15:37 IST

UPSC वेबसाईटनुसार, इंग्रजांनी भारतात नागरी सेवा परीक्षेला १८५४ मध्ये सुरुवात केली होती. संसदेच्या सिलेक्ट कमिटीचे लॉर्ड मैकाले यांच्या रिपोर्टनंतर त्याला मान्यता दिली.

ठळक मुद्दे १८५४ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना झाली. १८५५ मध्ये लंडनमध्ये परीक्षेला सुरुवात झाली.त्याआधी नागरी सेवकांची नियुक्ती ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून केली जात होती.किमान १८ वर्ष आणि कमाल २३ वर्ष वय असणं बंधनकारक होतं. ही परीक्षा भारतीयांसाठी खूप कठीण समजली जायची.

नवी दिल्ली – देशातील केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवारी नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२० च्या निकालाची घोषणा केली. या परीक्षेत एकूण ७६१ उमेदवारांनी यश मिळवलं. बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील शुभम कुमारने सिविल सर्व्हिसेस मुख्य परीक्षा २०२० मध्ये टॉप करत IAS होण्याचं स्वप्न साकार केले आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय का? भारतातील पहिला आयएएस अधिकारी होण्याचा मान कुणाला जातो?

१८५४ मध्ये नागरी सेवा परीक्षेची सुरुवात

UPSC वेबसाईटनुसार, इंग्रजांनी भारतात नागरी सेवा परीक्षेला १८५४ मध्ये सुरुवात केली होती. संसदेच्या सिलेक्ट कमिटीचे लॉर्ड मैकाले यांच्या रिपोर्टनंतर त्याला मान्यता दिली. त्याआधी नागरी सेवकांची नियुक्ती ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून केली जात होती. त्यांना लंडनच्या हेलीबरी कॉलेजमध्ये ट्रेनिगनंतर भारतात आणलं जायचं. १८५४ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना झाली. १८५५ मध्ये लंडनमध्ये परीक्षेला सुरुवात झाली. त्यात किमान १८ वर्ष आणि कमाल २३ वर्ष वय असणं बंधनकारक होतं. ही परीक्षा भारतीयांसाठी खूप कठीण समजली जायची.

कोण होते भारताचे पहिले IAS अधिकारी?

रवींद्रनाथ टागोर यांचे मोठे भाऊ सत्येंद्रनाथ टागोर हे भारतीय होते ज्यांनी १८६४ मध्ये नागरी सेवा परीक्षेत यश मिळवलं होतं. सत्येंद्रनाथ टागोर आयएएस अधिकारी बनणारे पहिले भारतीय होते. सत्येंद्रनाथ टागोर परीक्षेच्या तयारीला १८६२ मध्ये भारतातून इंग्लंडला गेले होते. त्यांची १८६३ मध्ये नागरी सेवेसाठी निवड झाली. १८६४ मध्ये इंग्लंडमध्ये ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर सत्येंद्रनाथ भारतात परतले. ते अधिकृतरित्या भारताचे पहिले IAS अधिकारी बनले होते. त्यानंतर बॉम्बे प्रेसीडेंसीमध्ये ते तैनात होते. काही महिन्यांनी अहमदाबाद शहरात त्यांची बदली झाली.

१ जून १८४२ मध्ये सत्येंद्रनाथ टागोर यांचा जन्म

सत्येंद्रनाथ टागोर यांचा जन्म १ जून १८४२ मध्ये झाला होता. हिंदू स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं त्यानंतर कोलकाता विद्यापीठातून परीक्षा देणारे ते पहिल्या विद्यार्थ्यांपैकी एक होते. सत्येंद्रनाथ टागोर यांचा विवाह १७ व्या वर्षी ज्ञानदानंदिनी देवी यांच्याशी झाला. जेव्हा सत्येंद्रनाथ आयएएस अधिकारी बनले तेव्हा त्यांचे वय केवळ २१ वर्ष होतं. सत्येंद्रनाथ टागोर यांनी प्रामाणिकपणे त्यांचं कर्तव्य निभावलं. ते साहित्य क्षेत्रातील कुटुंबातून येत होते. त्यामुळे त्यांनी साहित्य क्षेत्रात बरेच काम केले.  

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगIndiaभारत