शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
2
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
3
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
4
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
5
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
6
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
7
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
8
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
9
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
10
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
11
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
12
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
13
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
14
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
15
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
16
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
17
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
18
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
19
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
20
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

आदित्यने 'करून दाखवलं'! दहावीत 'ती'च्या प्रेमात पडला, ब्रेकअपमुळे कोलमडला; पण 'रिस्टार्ट' करत IAS झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 09:30 IST

बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर वडिलांच्या आग्रहामुळे आदित्यने अभियांत्रिकी विभागात प्रवेश घेतला....

UPSC Success Story: एखाद्या चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे आदित्यच्या आयुष्यात घडामोडी घडत गेल्या. प्रेमात झालेली फसवणूक, परीक्षांतील अपयश आणि मानसिक तणाव अशा अडचणींवर मात करत अखेर त्याने यशाला गवसणी घातलीच. प्रेमात प्रेयसी दिलेला शब्द न पाळता सोडून गेली. त्यानंतर आलेल्या एकटेपणावर मात करत आदित्यने यूपीएससीची तयारी सुरू केली आणि तिसऱ्या प्रयत्नात तो IAS झाला. 

बिहारची राजधानी असणाऱ्या पाटणामधील आदित्य पांडेने (IAS Aditya Pandey) यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळवले आहे. या परीक्षेत त्याने ४८ वी रँक मिळवली आहे. तसेच काही वर्षांपूर्वी त्याचे ब्रेकअप झाले होते त्यावेळी त्यानी सांगितलेला शब्दही खरा करून दाखवला. इंजिनीअरिंग आणि एमबीएनंतर आदित्यने यूपीएससीची परीक्षा दिली. तो दोन वेळा अयशस्वी ठरला, पण तिसऱ्या प्रयत्नांत त्याने करून दाखवलं.

घरातील भावडांमध्ये आदित्य सर्वात छोटा आहे. त्याला तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. पाटणा येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो जामनगरला गेला. आदित्यने इयत्ता ८ वी आणि ९ वी मध्ये चांगली कामगिरी केली होती, परंतु १० वी मध्ये तो एका मुलीच्या प्रेमात पडला. प्रेम फुलत असतानाच मुलीने त्याला नाकारले. त्यावेळी या प्रकरणात वेळ गेला आणि आदित्यला दहावीत कमी गुण मिळाले. त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला पाटण्याला परत पाठवले होते.

UPSC परीक्षेबद्दल माहिती नव्हती -

बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर वडिलांच्या आग्रहामुळे आदित्यने अभियांत्रिकी विभागात प्रवेश घेतला. आदित्यला अभियांत्रिकीमध्ये विशेष रुची नसूनही त्याने अभ्यास करून चांगले गुण प्राप्त केले होते. पण बालपणीच्या मैत्रिणीसोबत ब्रेकअप झाल्याने तो खूप दु:खी झाला होता. त्या मानसिक तणावातून बाहेर पडायला त्याला अनेक वर्षे गेली. कॉलेजमध्ये असताना सिनियरकडून UPSC बद्दल थोडे ऐकले होते, परंतु या परीक्षेबद्दल त्याला पूर्ण माहिती नव्हती.

देशात ४८ वी रँक -

२०२१ आणि २०२२ मधील UPSC परीक्षेत आलेल्या अपयशामुळे आदित्य खचला होता. सलग दोन वर्षे निराशा त्याच्या पदरी आली होती. या परीक्षेची तयारी करताना त्याला अनेक अडचणीवर मात करावी लागली. अभ्यासाचे योग्य नियोजन आणि तणावापासून दूर राहण्यासाठी त्याने वारंवार प्रयत्न केले. सततच्या अपयशामुळे त्याच्यातील आत्मविश्वास कमी होऊ लागला.

आजूबाजूच्या लोकांच्या नकारात्मक बोलण्याचाही त्याच्यावर प्रभाव पडला. आदित्यने लोकांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले आणि कोणताही बॅकअप प्लॅन न करता जोमाने तयारी सुरू केली. २०२३ साली त्याने यश मिळवले आणि परीक्षेत ४८ वी रँक मिळवली. आदित्यने यूपीएससीतील ऑप्शनल विषयासाठीच कोचिंगची मदत घेतली होती. बाकी त्याने स्वत:च्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून परीक्षेत यश मिळविले.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षाBiharबिहार