शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
4
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
5
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
6
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
8
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
9
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
10
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
11
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
12
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
13
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
14
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
15
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
16
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
17
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
18
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
19
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले

आदित्यने 'करून दाखवलं'! दहावीत 'ती'च्या प्रेमात पडला, ब्रेकअपमुळे कोलमडला; पण 'रिस्टार्ट' करत IAS झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 09:30 IST

बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर वडिलांच्या आग्रहामुळे आदित्यने अभियांत्रिकी विभागात प्रवेश घेतला....

UPSC Success Story: एखाद्या चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे आदित्यच्या आयुष्यात घडामोडी घडत गेल्या. प्रेमात झालेली फसवणूक, परीक्षांतील अपयश आणि मानसिक तणाव अशा अडचणींवर मात करत अखेर त्याने यशाला गवसणी घातलीच. प्रेमात प्रेयसी दिलेला शब्द न पाळता सोडून गेली. त्यानंतर आलेल्या एकटेपणावर मात करत आदित्यने यूपीएससीची तयारी सुरू केली आणि तिसऱ्या प्रयत्नात तो IAS झाला. 

बिहारची राजधानी असणाऱ्या पाटणामधील आदित्य पांडेने (IAS Aditya Pandey) यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळवले आहे. या परीक्षेत त्याने ४८ वी रँक मिळवली आहे. तसेच काही वर्षांपूर्वी त्याचे ब्रेकअप झाले होते त्यावेळी त्यानी सांगितलेला शब्दही खरा करून दाखवला. इंजिनीअरिंग आणि एमबीएनंतर आदित्यने यूपीएससीची परीक्षा दिली. तो दोन वेळा अयशस्वी ठरला, पण तिसऱ्या प्रयत्नांत त्याने करून दाखवलं.

घरातील भावडांमध्ये आदित्य सर्वात छोटा आहे. त्याला तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. पाटणा येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो जामनगरला गेला. आदित्यने इयत्ता ८ वी आणि ९ वी मध्ये चांगली कामगिरी केली होती, परंतु १० वी मध्ये तो एका मुलीच्या प्रेमात पडला. प्रेम फुलत असतानाच मुलीने त्याला नाकारले. त्यावेळी या प्रकरणात वेळ गेला आणि आदित्यला दहावीत कमी गुण मिळाले. त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला पाटण्याला परत पाठवले होते.

UPSC परीक्षेबद्दल माहिती नव्हती -

बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर वडिलांच्या आग्रहामुळे आदित्यने अभियांत्रिकी विभागात प्रवेश घेतला. आदित्यला अभियांत्रिकीमध्ये विशेष रुची नसूनही त्याने अभ्यास करून चांगले गुण प्राप्त केले होते. पण बालपणीच्या मैत्रिणीसोबत ब्रेकअप झाल्याने तो खूप दु:खी झाला होता. त्या मानसिक तणावातून बाहेर पडायला त्याला अनेक वर्षे गेली. कॉलेजमध्ये असताना सिनियरकडून UPSC बद्दल थोडे ऐकले होते, परंतु या परीक्षेबद्दल त्याला पूर्ण माहिती नव्हती.

देशात ४८ वी रँक -

२०२१ आणि २०२२ मधील UPSC परीक्षेत आलेल्या अपयशामुळे आदित्य खचला होता. सलग दोन वर्षे निराशा त्याच्या पदरी आली होती. या परीक्षेची तयारी करताना त्याला अनेक अडचणीवर मात करावी लागली. अभ्यासाचे योग्य नियोजन आणि तणावापासून दूर राहण्यासाठी त्याने वारंवार प्रयत्न केले. सततच्या अपयशामुळे त्याच्यातील आत्मविश्वास कमी होऊ लागला.

आजूबाजूच्या लोकांच्या नकारात्मक बोलण्याचाही त्याच्यावर प्रभाव पडला. आदित्यने लोकांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले आणि कोणताही बॅकअप प्लॅन न करता जोमाने तयारी सुरू केली. २०२३ साली त्याने यश मिळवले आणि परीक्षेत ४८ वी रँक मिळवली. आदित्यने यूपीएससीतील ऑप्शनल विषयासाठीच कोचिंगची मदत घेतली होती. बाकी त्याने स्वत:च्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून परीक्षेत यश मिळविले.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षाBiharबिहार