शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अंमलबजावणीत बदल नाही; लाेकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 07:02 IST

नवी पद्धत २०२५ पासून लागू केल्यास सरावासाठी वेळ मिळेल, अशा प्रतिक्रिया उमेदवार देत आहेत. 

मुंबई : राज्यसेवा मुख्य परीक्षेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमातील बदलांची अंमलबजावणी २०२४-२५ पासून करण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे. मात्र जाहीर केल्यानुसार २०२३ पासून अंमलबजावणीच्या निर्णयात कोणताही  बदल करण्याचा विचार नसल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) गुरुवारी स्पष्ट केले. काही उमेदवार आणि संघटनांकडून या प्रकरणी करण्यात येणारी अवास्तव मागणी दबाव आणण्याचा प्रयत्न समजण्यात येईल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा परीक्षेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमातील बदलांचीच अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षांपासून म्हणजे २०२३ पासून करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र त्या विरोधात राज्य सेवा परीक्षेच्या अनेक उमेदवारांनी नाराजी दर्शविली असून, ही पद्धती येत्या २०२४-२५ पासून लागू करण्याकडे ७६ टक्के उमेदवारांचा कल असल्याचे ऑनलाईन सर्वेक्षणातून दिसून आले. नवी पद्धत २०२५ पासून लागू केल्यास सरावासाठी वेळ मिळेल, अशा प्रतिक्रिया उमेदवार देत आहेत. 

उमेदवारांकडून काय सर्वेक्षण घेण्यात आले ?नवा अभ्यासक्रम आणि नवी परीक्षा योजना याबाबतचा कल जाणून घेण्यासाठी एमपीएससी स्टुडंट राइटतर्फे समाज माध्यमांद्वारे ऑनलाईन सर्वेक्षण करण्यात आले. जवळपास १० हजारांहून अधिक उमेदवारांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन प्रतिसाद नोंदवला. प्रतिसाद नोंदवलेल्या उमेदवारांपैकी ७६ टक्के उमेदवारांचा कल २०२४-२५ पासून नवा अभ्यासक्रम आणि परीक्षा योजना लागू करण्याकडे असल्याचे दिसून आले, तर २४ टक्के उमेदवारांनी २०२३ पासूनच या बदलांची अंमलबजावणी व्हावे, असे मत नोंदवले.

आधीच्या अभ्यासाचे महत्त्व शून्य?मागील २ ते ३ मुख्य राज्यसेवा परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी आयोगाने लागलीच पुढील वर्षांपासून या निर्णयाची अंमलबजावणी न करता आणखी २ ते ३ वर्षांनंतर तो लागू करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. नवीन पद्धती लागू केल्यास त्यांनी ज्या पद्धतीने आतापर्यंत अभ्यास केला त्या अभ्यासाचे महत्त्व शून्य होऊन आता नव्याने सुरुवात करावी लागेल आणि त्यामुळे त्यांना अपेक्षित यश मिळेलच, याची खात्री नसल्याची भीती ते व्यक्त करीत आहेत. त्यामुळे नवी परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रम २०२४-२५ पासून लागू केल्यास या बदलांना जुळवून घेण्यासाठी उमेदवारांना वेळ मिळेल, अशा प्रतिक्रिया उमेदवार देत आहेत.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा