शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अंमलबजावणीत बदल नाही; लाेकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 07:02 IST

नवी पद्धत २०२५ पासून लागू केल्यास सरावासाठी वेळ मिळेल, अशा प्रतिक्रिया उमेदवार देत आहेत. 

मुंबई : राज्यसेवा मुख्य परीक्षेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमातील बदलांची अंमलबजावणी २०२४-२५ पासून करण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे. मात्र जाहीर केल्यानुसार २०२३ पासून अंमलबजावणीच्या निर्णयात कोणताही  बदल करण्याचा विचार नसल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) गुरुवारी स्पष्ट केले. काही उमेदवार आणि संघटनांकडून या प्रकरणी करण्यात येणारी अवास्तव मागणी दबाव आणण्याचा प्रयत्न समजण्यात येईल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा परीक्षेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमातील बदलांचीच अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षांपासून म्हणजे २०२३ पासून करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र त्या विरोधात राज्य सेवा परीक्षेच्या अनेक उमेदवारांनी नाराजी दर्शविली असून, ही पद्धती येत्या २०२४-२५ पासून लागू करण्याकडे ७६ टक्के उमेदवारांचा कल असल्याचे ऑनलाईन सर्वेक्षणातून दिसून आले. नवी पद्धत २०२५ पासून लागू केल्यास सरावासाठी वेळ मिळेल, अशा प्रतिक्रिया उमेदवार देत आहेत. 

उमेदवारांकडून काय सर्वेक्षण घेण्यात आले ?नवा अभ्यासक्रम आणि नवी परीक्षा योजना याबाबतचा कल जाणून घेण्यासाठी एमपीएससी स्टुडंट राइटतर्फे समाज माध्यमांद्वारे ऑनलाईन सर्वेक्षण करण्यात आले. जवळपास १० हजारांहून अधिक उमेदवारांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन प्रतिसाद नोंदवला. प्रतिसाद नोंदवलेल्या उमेदवारांपैकी ७६ टक्के उमेदवारांचा कल २०२४-२५ पासून नवा अभ्यासक्रम आणि परीक्षा योजना लागू करण्याकडे असल्याचे दिसून आले, तर २४ टक्के उमेदवारांनी २०२३ पासूनच या बदलांची अंमलबजावणी व्हावे, असे मत नोंदवले.

आधीच्या अभ्यासाचे महत्त्व शून्य?मागील २ ते ३ मुख्य राज्यसेवा परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी आयोगाने लागलीच पुढील वर्षांपासून या निर्णयाची अंमलबजावणी न करता आणखी २ ते ३ वर्षांनंतर तो लागू करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. नवीन पद्धती लागू केल्यास त्यांनी ज्या पद्धतीने आतापर्यंत अभ्यास केला त्या अभ्यासाचे महत्त्व शून्य होऊन आता नव्याने सुरुवात करावी लागेल आणि त्यामुळे त्यांना अपेक्षित यश मिळेलच, याची खात्री नसल्याची भीती ते व्यक्त करीत आहेत. त्यामुळे नवी परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रम २०२४-२५ पासून लागू केल्यास या बदलांना जुळवून घेण्यासाठी उमेदवारांना वेळ मिळेल, अशा प्रतिक्रिया उमेदवार देत आहेत.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा