शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

शालेय शिक्षण काठावर पास अव्वलवरून सातव्या स्थानावर घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 09:31 IST

केवळ ४ जिल्ह्यांना ‘अत्युत्तम' रँक, २०१२ मध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे शाळांमधील गुणवत्तेचा दर्जा खालावत गेला

अविनाश साबापुरे / नम्रता फडणीस

यवतमाळ / पुणे : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या २०२१-२२ या सत्राच्या 'पीजीआय' अहवालात महाराष्ट्र अव्वल स्थानावरून सातव्या स्थानावर घसरला आहे, तर जिल्हानिहाय शिक्षण निर्देशांकातही बहुतांश जिल्ह्यांची शैक्षणिक पडझड पुढे आली.

देशभरातील शिक्षणाची अवस्था मांडणारा 'परफॉर्मन्स ग्रेडिंग इन्डेक्स' दरवर्षी केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे जाहीर होतो. यामध्ये काही वर्षात महाराष्ट्र सतत पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर राहिला. परंतु, २०२१- २२ च्या अहवालात प्रचंड घसरण दिसते. केंद्राने प्रत्येक राज्याचा जिल्हानिहाय शिक्षण निर्देशांकदेखील जाहीर केला. राज्यात ३६ पैकी यात चारच जिल्ह्यांना 'अत्युत्तम' श्रेणीमध्ये स्थान मिळाले.

हे रैंकिंग २०२१-२२ मधील स्थितीवर आधारित असून, ते कोरोना महामारीनंतरचे वर्ष होते. त्यामुळे सर्वच राज्यांचे गुण कमी झाले असून, एकही राज्य उच्च श्रेणीमध्ये नाही." -सूरज मांढरे, राज्य शिक्षण आयुक्त

पाचमध्ये एकही राज्य नाही मुल्यमापन करून राज्यांना दहा ग्रेडमध्ये विभागले गेले. यात महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर म्हणजे प्रचेस्टा तीन' या ग्रेडमध्ये आहे. देशातील एकही राज्य पहिल्या पाच ग्रेडमध्ये नाही.

राज्याला हजारातून ५८३ गुण

विविध राज्यांचा पीजीआय जाहीर करताना एक हजार गुणांसाठी एकंदर ७३ निकषांवर मूल्यमापन केले जाते, तर जिल्ह्याचा पीजीआय ठरविताना एकदर ६०० गुणांसाठी ८३ निकषांवर आधारित मूल्यमापन होते. यामध्ये महाराष्ट्राला एक हजार गुणांपैकी ५८३ गुण मिळाल्याने 'प्रचेस्ट-३' म्हणजे सातवी (दक्ष, उत्कर्ष, अतिउत्तम, उत्तम, प्रचेस्ट-१, प्रचेस्ट-३ या श्रेणीनंतरची) श्रेणी मिळाली. तर सातारा, सिंधुदुर्ग, बीड, रत्नागिरी व पुणे या जिल्ह्यांना २०२०-२१ मध्ये अत्युत्तम श्रेणी मिळाली. तसेच २०२१-२२ मध्ये सातारा, मुंबई, कोल्हापूर व नाशिक या चारच जिल्ह्यांना अत्युत्तम श्रेणी मिळविता आली.

मुले, शिक्षक नाहीत गंभीर

२०१२ मध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे शाळांमधील गुणवत्तेचा दर्जा खालावत गेला. मुलांसह शिक्षकांनीही शिक्षणाकडे गांभीर्याने पाहणे सोडून दिले. कोरोनाकाळातील ऑनलाइन शिक्षणाचा फटकाही बसला