शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना पैशाची किंमत कशी कळेल? त्यासाठी काय करायचं? जाणून घ्या मोलाचे सल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 05:22 IST

एखाद्या गोष्टीपासून मुलांना वंचित ठेवलं, तर त्याचं त्यांना जास्त आकर्षण वाटतं आणि चुकीच्या मार्गानं त्या गोष्टींकडे मुलं वळतात, त्यामुळे पालकांनीच योग्य ती समज देऊन त्यांच्यावरची अनावश्यक बंधनं उठवली, तर साधनांचा योग्य मार्गानं वापर करतात, हे आता सिद्ध झालं आहे.

मुलांना पॉकेट मनी द्यावा का, याबाबत पूर्वी बरेच पालक साशंक असायचे आणि मुलांना नको त्या वयात पैशांची सवय लावू नये, असं त्यांचं मत होतं.. काहीअंशी हे खरं असलं, तरी मुलांना ‘योग्य’ तेवढा पॉकेटमनी द्यायला हवा, असं आता तज्ज्ञांचं मत आहे. एखाद्या गोष्टीपासून मुलांना वंचित ठेवलं, तर त्याचं त्यांना जास्त आकर्षण वाटतं आणि चुकीच्या मार्गानं त्या गोष्टींकडे मुलं वळतात, त्यामुळे पालकांनीच योग्य ती समज देऊन त्यांच्यावरची अनावश्यक बंधनं उठवली, तर साधनांचा योग्य मार्गानं वापर करतात, हे आता सिद्ध झालं आहे. पैशांची गोष्टही त्याला अपवाद नाही. यासंदर्भात काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं?..१) पैशांचं नियोजनमुलांना जर आपल्या मार्गदर्शनाखाली पैशांचा योग्य वापर करायला शिकवलं, पैशासंदर्भात छोटे-छोटे निर्णय त्यांना घेऊ दिले, तर मुलं पैशांचं उत्तम नियोजन करतात आणि पैशांची ‘किंमत’ही त्यांना कळते, असा तज्ज्ञांचा अनुभव आहे. २) कर्जाच्या विळख्यापासून मुक्त मुलांना लहानपणापासून पैशांबाबत ‘आत्मनिर्भर’ बनवलं, पैशांची जबाबदारी घ्यायला शिकवलं, तर मोठेपणी कर्जाच्या विळख्यात सापडण्याची  शक्यता कमी होते. ३) आज, आता... नाही !आज, आता, ताबडतोब... कोणतीही गोष्ट लगेच पाहिजे, असा अनेकांचा कल असतो. आजूबाजूला पाहिल्यावर मुलांनाही अशा गोष्टींची चटक लागू शकते, पण पैशांचा योग्य वापर त्यांना शिकवला, त्यासाठी ‘पैशाची मालकी’ (अर्थातच मर्यादित प्रमाणात) त्यांच्यावर सोपवली, तर ‘आज, आत्ता...’ या हव्यासापासून मुलं स्वत:ला वाचवू शकतात आणि नंतर मिळालेलं म्हणजेच ‘विलंबित समाधान’ किती मोठं असतं, याची जाणीव त्यांना होते. ४) उद्दिष्ट व साध्य याची पूर्तता  कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही, त्यासाठी कष्ट करावे लागतात आणि पैसा कितीही कमी असला, तरी त्याला ‘किंमत’ असते. तसेच योग्य मार्गाने साठवत नेल्यास तो वाढीस लागतो आणि त्याची ‘किंमत’ही वाढते, याची जाणीव मुलांना पॉकेटमनीमुळे होते. आपल्या प्राथमिकता  मुलांना कळतात आणि आपली मध्यम आणि दीर्घकालीन ध्येयंही त्यांना त्यामुळे गाठता येतात.