शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

CET च्या निकालात १०० पर्सेंटाइलचा दबदबा; राज्यातील २७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 05:32 IST

पीसीएम गटातील १०० पर्सेंटाइलच्या यादीत मुंबईच्या सात विद्यार्थ्यांचा समावेश असून, पुण्याच्या दोन आणि ठाणे, पालघर, सोलापूर, नागपूर, अकोला येथील प्रत्येकी एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेत पीसीएम गटातून १३ विद्यार्थ्यांना १०० पर्सेटाइल मिळाले आहेत, तर पीसीबी गटातून १४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल गुण प्राप्त झाले आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल गुरुवारी सीईटी सेल मार्फत जाहीर करण्यात आला आहे.

१०० पर्सेंटाइलच्या या यादीमध्ये मुंबई व पुण्याच्या विद्यार्थ्यांचा वरचष्मा दिसून आला. हा निकाल विद्यार्थ्यांसाठी सीईटीच्या https://mhitcet2022.mahacet.org/StaticPages/HomePage या अधिकृत संकेतस्थळवर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी दिली.

मुंबई पुण्याचा वरचष्मापीसीएम गटातील १०० पर्सेंटाइलच्या यादीत मुंबईच्या सात विद्यार्थ्यांचा समावेश असून, पुण्याच्या दोन आणि ठाणे, पालघर, सोलापूर, नागपूर, अकोला येथील प्रत्येकी एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राखीव प्रवर्गातील विविध संवर्गातून पहिल्या तीन क्रमांकाच्या यादीत आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १२ आहे.  पीसीबी गटातून १०० पर्सेंटाइलच्या यादीत मुंबईच्या चार, पुण्याच्या दोन, तर ठाणे, सांगली, सातारा, नागपूर, नांदेड, पालघर, अमरावती, लातूर येथील प्रत्येकी एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पीसीबी गटातील राखीव प्रवर्गातील विविध संवर्गातून प्रथम ३ क्रमांकामध्ये आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे.

सीईटीच्या निकालानंतर आता प्रवेश प्रक्रियेसाठी चुरसयंदाच्या निकालात १०० पर्सेंटाइलचेच पीसीबी व पीसीएम गटाचे २७ हून अधिक विद्यार्थी असल्याने ९५ आणि त्याहून अधिकच्या विद्यार्थ्यांची संख्या निश्चितच अधिक असल्याने नामांकित महाविद्यालयांमध्ये काॅम्प्युटर सायन्स, मॅकेनिकल आणि आयटी या शाखांमध्ये प्रवेशासाठी चुरस पाहावयास मिळणार आहे. सीईटीचा निकाल सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आला असला तरी अद्याप संबंधित शाखांच्या संचलनालयाकडून प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक अंतिम नियमावली तयार आहे की नाही, प्रवेशप्रक्रिया केव्हा व कशी सुरू होणार याची विद्यार्थ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.