शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शिक्षणमंत्र्यांचा शालेय यंत्रणेवर विश्वास नाही का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2022 08:52 IST

तिसरीपासून परीक्षा : शिक्षकांची नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : इयत्ता आठवीपर्यंत परीक्षा न घेण्याचे आधीचे धोरण बदलून तिसरीपासूनच परीक्षा घेण्याचा विचार सुरू असल्याचे वक्तव्य शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अलीकडेच केले. या वक्तव्यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा होतात की नाही, परीक्षांबाबत शाळा आणि त्यांची यंत्रणा कशी चालते, हे शिक्षणमंत्र्यांना माहीत नाही का, असा सवाल शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडून उपस्थित होत आहे. शिक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यावर अनेकांनी नाराजीही व्यक्त केली आहे. शाळा व्यवस्थापन, शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर अविश्वास दाखवणे आश्चर्यकारक असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षकांच्या वर्तुळातून उमटत आहेत. 

विद्यार्थ्यांना एटीकेटीची सवलत देता येते का, या पर्यायावरही विचार सुरू असल्याचे शिक्षणमंत्री म्हणाले; मात्र पहिली ते आठवीपर्यंत या विषयाचा संबंध येत नसल्याचे मत शिक्षण क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.काय म्हणाले शिक्षणमंत्री?आठवीपर्यंत परीक्षाच नसल्याने  ९व्या इयत्तेत परीक्षांना सामोरे जाणारे विद्यार्थी अपयशी होताना दिसतात. परिणामी शैक्षणिक दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात तिसरीपासून परीक्षा घेण्याचा मानस आहे. 

 अनुत्तीर्ण नाही,   मूल्यमापन होते  शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करता येत नसले तरी पहिली ते आठवीच्या मूल्यमापनासाठी २० ऑगस्ट २०१० चा शासन निर्णय अस्तित्वात असून त्यानुसार विद्यार्थ्यांची लेखी चाचणी परीक्षा तसेच प्रत्येक सत्राचे शेवटी लेखी परीक्षा घेतली जाते. प्रत्येक सत्राच्या शेवटी निकाल तयार करून तो विद्यार्थ्यांना दिला जातो. तसेच प्राथमिक विभागात संबंधित क्षेत्रीय अधिकारी हा निकाल तपासून पाहून मंजूर करतात. ही सर्व व्यवस्था गेली बारा वर्षे अस्तित्वात आहे. - महेंद्र गणपुले, प्रवक्ते, राज्य मुख्याध्यापक महासंघ

शिक्षणमंत्र्यांचे वक्तव्य शाळा यंत्रणा आणि मूल्यमापन व्यवस्थेवर अविश्वास दाखवणारे आहे. विद्यार्थ्यांच्या चाचणी, सत्र, सर्व मूल्यमापन परीक्षांच्या नोंदणी शाळा व्यवस्थापनांकडे असतात; मात्र शिक्षण विभागातील निरीक्षकांचीच पदे रिक्त असल्याने त्याची नियमित चाचणी होत नाही. सरकारने अशी वक्तव्ये करण्याआधी यंत्रणेची माहिती घेणे आवश्यक आहे.- जालिंदर सरोदे, शिक्षक, आदर्श विद्यालय , चेंबूर

टॅग्स :Educationशिक्षण