शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

१२ च्या परीक्षेला सुरुवात; शिक्षकांच्या बहिष्कारामुळे निकालावर मात्र प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 05:49 IST

बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनावर महासंघाने बहिष्कार टाकला असून पुणे येथे मंगळवारी इंग्रजी विषयाची ‘चीफ मॉडरेटर’ ची बैठकीला अनुपस्थिती दर्शविण्यात आली.

मुंबई : राज्यात बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या असल्या तरी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कारामुळे निकालाचे काय होणार यावर प्रश्नचिन्ह आहे. 

शिक्षण क्षेत्र व शिक्षकांचे प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. वारंवार शासनाला निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याची प्रतिक्रिया कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे मुकुंद आंधळकर यांनी दिली. मागण्यांच्या पूर्ततेसाठी ५ सप्टेंबर शिक्षक दिनापासून वेगवेगळ्या टप्प्यांवर तालुका व जिल्हास्तरावर विविध आंदोलने करण्यात आली. दरम्यान, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक मागण्यांकडे सातत्याने डोळेझाक केल्यामुळे बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनावर महासंघाने बहिष्कार टाकला असून पुणे येथे मंगळवारी इंग्रजी विषयाची ‘चीफ मॉडरेटर’ ची बैठकीला अनुपस्थिती दर्शविण्यात आली. यापुढेही हे  आंदोलन तीव्र करण्याची संघटनेची भूमिका असल्याचे मुकुंद आंधळकर यांनी स्पष्ट केले. 

मागण्या काय?१ नोव्हेंबर २००५ पूर्वी विना तसेच अंशतः अनुदानावरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सेवानिवृत्तांना या योजनेचा तातडीने लाभ द्यावा१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, निवड श्रेणीसाठीची २० टक्क्यांची अट रद्द करावी, आय.टी. विषय अनुदानित करावा.अनुदानासाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात, विना अनुदानितकडून अनुदानितमध्ये बदलीला १ डिसेंबर २०२२ पासून लागू केलेली स्थगिती त्वरित रद्द करावी, शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरावीत, कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी पटसंख्येचे निकष शाळा संहितेनुसार असावेत, एम. फिल.,एम.एड.,पीएच. डी. धारक शिक्षकांना उच्च शिक्षणाप्रमाणे वेतनवाढ लागू करावी व इतर लाभासाठी ग्राह्य धरण्यात यावे, आदींसह विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी हे आंदोलन छेडले आहे.

विद्यार्थ्यांना एसटीचा दिलासा

बारावी आणि दहावीच्या परीक्षा लक्षात घेत एसटी महामंडळाने परीक्षांच्या वेळापत्रकाला अनुसरून गाड्यांच्या वेळेत बदल करण्याच्या सूचना विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत. २१ फेब्रुवारीपासून राज्यभरात बारावीची परीक्षा सुरू झाली; तर ३ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना गाव ते परीक्षा केंद्र असा प्रवास विनासायास व्हावा यासीठ विशेष एसटी गाड्या गरजेनुसार सोडणे, उपलब्ध गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये परीक्षेच्या वेळापत्रकाला अनुसरून विद्यार्थ्यांना येण्या-जाण्याकरिता सोयीचे होईल असा बदल करणे, परीक्षा केंद्रावर जाणारे विद्यार्थी मार्गावर दिसल्यास व त्याने गाडी थांबविण्याची विनंती केल्यास अशा विद्यार्थ्यांना गाडीमध्ये जागा करून देणे, अशा सुविधा देण्यात येणार आहेत. परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार बसेस पुरविण्यात याव्यात. याबाबत कोणतीही तक्रार येणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षा