शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

सीबीएसई बारावीत मुलींचीच बाजी, निकाल पहिल्यांदाच ९९.३७ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 07:03 IST

CBSE Result News:

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) यंदाच्या बारावी परीक्षेत पहिल्यांदाच सर्वाधिक ९९.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यंदाही मुलींनी बाजी मारत उत्तीर्ण होणाच्या टक्केवारीत मुलांना मागे टाकले आहे.

कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करण्यात आल्याने सीबीएसईने वैकल्पिक मूल्यांकन धोरणाच्या आधारावर (३०:३०:४०) सीबीएसईने शुक्रवारी परीक्षेचा निकाल घोषित केला. मागील वर्षाच्या तुलनेत यंंदा उत्तीर्ण होण्याची टक्केवारी १० टक्क्यांनी वाढली. तसेच मागच्या वर्षी मुली आणि मुले उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारीत ६ टक्के फरक होता. सीबीएसई परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सांगितले की, मूल्यांकन धोरण यशस्वीपणे आणि निर्धारित मुदतीत लागू करण्यासाठी शिक्षकांचे काम महत्त्वपूर्ण मानण्यात आले होते. त्यासाठी शाळांना सुविधा, निकाल संकलनांत मदत आणि कोणतीही चूक राहू नये, म्हणून सीबीएसईच्या आयटी विभागाने प्रणाली विकसित केली.

केंद्रीय विद्यालये व केंद्रीय तिबेटी शालेय प्रशासनाअंतर्गत येणाऱ्या शाळांचा निकाल यंदा शंभर टक्के लागला. जवाहर नवोदय विद्यालयांचा निकालही ९९.९४ टक्के लागला आहे. सरकारी व अनुदानित शाळांतील विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अनुक्रमे ४.७८ टक्के आणि ७.९२ टक्क्यांनी वाढले. खाजगी शाळांचा निकाल यंदा ११ टक्क्यांनी वाढला . 

७० हजार विद्यार्थ्यांना ९५ टक्के गुणमागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा ८० टक्के म्हणजे ७०,००४ विद्यार्थ्यांना ९५ टक्के गुण मिळाले आहेत. १,५०,१५२ विद्यार्थ्यांना ९० ते ९५ टक्क्यांदरम्यान गुण मिळाले आहेत. ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या १२९ आहे. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी १३ लाख ९६ हजार नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पुरवणी परीक्षा श्रेणीतील ६,१४९ विद्यार्थ्यांची परीक्षा १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरदरम्यान आयोजित केली जाईल. पुरवणी परीक्षेच्या निश्चित तारखा नंतर घोषित केल्या जातील, असे भारद्वार यांनी सांगितले.  

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्र