शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

सीबीएसई बारावीत मुलींचीच बाजी, निकाल पहिल्यांदाच ९९.३७ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 07:03 IST

CBSE Result News:

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) यंदाच्या बारावी परीक्षेत पहिल्यांदाच सर्वाधिक ९९.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यंदाही मुलींनी बाजी मारत उत्तीर्ण होणाच्या टक्केवारीत मुलांना मागे टाकले आहे.

कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करण्यात आल्याने सीबीएसईने वैकल्पिक मूल्यांकन धोरणाच्या आधारावर (३०:३०:४०) सीबीएसईने शुक्रवारी परीक्षेचा निकाल घोषित केला. मागील वर्षाच्या तुलनेत यंंदा उत्तीर्ण होण्याची टक्केवारी १० टक्क्यांनी वाढली. तसेच मागच्या वर्षी मुली आणि मुले उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारीत ६ टक्के फरक होता. सीबीएसई परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सांगितले की, मूल्यांकन धोरण यशस्वीपणे आणि निर्धारित मुदतीत लागू करण्यासाठी शिक्षकांचे काम महत्त्वपूर्ण मानण्यात आले होते. त्यासाठी शाळांना सुविधा, निकाल संकलनांत मदत आणि कोणतीही चूक राहू नये, म्हणून सीबीएसईच्या आयटी विभागाने प्रणाली विकसित केली.

केंद्रीय विद्यालये व केंद्रीय तिबेटी शालेय प्रशासनाअंतर्गत येणाऱ्या शाळांचा निकाल यंदा शंभर टक्के लागला. जवाहर नवोदय विद्यालयांचा निकालही ९९.९४ टक्के लागला आहे. सरकारी व अनुदानित शाळांतील विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अनुक्रमे ४.७८ टक्के आणि ७.९२ टक्क्यांनी वाढले. खाजगी शाळांचा निकाल यंदा ११ टक्क्यांनी वाढला . 

७० हजार विद्यार्थ्यांना ९५ टक्के गुणमागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा ८० टक्के म्हणजे ७०,००४ विद्यार्थ्यांना ९५ टक्के गुण मिळाले आहेत. १,५०,१५२ विद्यार्थ्यांना ९० ते ९५ टक्क्यांदरम्यान गुण मिळाले आहेत. ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या १२९ आहे. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी १३ लाख ९६ हजार नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पुरवणी परीक्षा श्रेणीतील ६,१४९ विद्यार्थ्यांची परीक्षा १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरदरम्यान आयोजित केली जाईल. पुरवणी परीक्षेच्या निश्चित तारखा नंतर घोषित केल्या जातील, असे भारद्वार यांनी सांगितले.  

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्र