शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

सीबीएसई बारावीत मुलींचीच बाजी, निकाल पहिल्यांदाच ९९.३७ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 07:03 IST

CBSE Result News:

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) यंदाच्या बारावी परीक्षेत पहिल्यांदाच सर्वाधिक ९९.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यंदाही मुलींनी बाजी मारत उत्तीर्ण होणाच्या टक्केवारीत मुलांना मागे टाकले आहे.

कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करण्यात आल्याने सीबीएसईने वैकल्पिक मूल्यांकन धोरणाच्या आधारावर (३०:३०:४०) सीबीएसईने शुक्रवारी परीक्षेचा निकाल घोषित केला. मागील वर्षाच्या तुलनेत यंंदा उत्तीर्ण होण्याची टक्केवारी १० टक्क्यांनी वाढली. तसेच मागच्या वर्षी मुली आणि मुले उत्तीर्ण होण्याच्या टक्केवारीत ६ टक्के फरक होता. सीबीएसई परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सांगितले की, मूल्यांकन धोरण यशस्वीपणे आणि निर्धारित मुदतीत लागू करण्यासाठी शिक्षकांचे काम महत्त्वपूर्ण मानण्यात आले होते. त्यासाठी शाळांना सुविधा, निकाल संकलनांत मदत आणि कोणतीही चूक राहू नये, म्हणून सीबीएसईच्या आयटी विभागाने प्रणाली विकसित केली.

केंद्रीय विद्यालये व केंद्रीय तिबेटी शालेय प्रशासनाअंतर्गत येणाऱ्या शाळांचा निकाल यंदा शंभर टक्के लागला. जवाहर नवोदय विद्यालयांचा निकालही ९९.९४ टक्के लागला आहे. सरकारी व अनुदानित शाळांतील विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अनुक्रमे ४.७८ टक्के आणि ७.९२ टक्क्यांनी वाढले. खाजगी शाळांचा निकाल यंदा ११ टक्क्यांनी वाढला . 

७० हजार विद्यार्थ्यांना ९५ टक्के गुणमागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा ८० टक्के म्हणजे ७०,००४ विद्यार्थ्यांना ९५ टक्के गुण मिळाले आहेत. १,५०,१५२ विद्यार्थ्यांना ९० ते ९५ टक्क्यांदरम्यान गुण मिळाले आहेत. ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या १२९ आहे. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी १३ लाख ९६ हजार नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पुरवणी परीक्षा श्रेणीतील ६,१४९ विद्यार्थ्यांची परीक्षा १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरदरम्यान आयोजित केली जाईल. पुरवणी परीक्षेच्या निश्चित तारखा नंतर घोषित केल्या जातील, असे भारद्वार यांनी सांगितले.  

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्र