शहरं
Join us  
Trending Stories
1
Lokmat Exclusive: ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
IT हब की नरकाचे द्वार? बेंगळुरूत पहाटे ३:३० वाजताही वाहतूक कोंडी सुटेना; दोन-दोन तास...
3
५ वर्षांचं अफेअर, ३ मुलं, पण इन्स्टावरील प्रेमासाठी घर सोडलं; पतीनेच स्वहस्ते लावून दिलं पत्नीचं दुसरं लग्न!
4
रिमांड संपली, पाप उघडं पडलं! बांगलादेश दिपू हत्या प्रकरणातील १८ जण कोठडीत; त्यांनी जे कारण सांगितलं..
5
Crypto वर देखरेख ठेवणं कठीण! RBI नंतर आता आयकर विभागानंही हात वर केले, प्रकरण काय?
6
आजचे राशीभविष्य : शुक्रवार ९ जानेवारी २०२६; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
7
९ वर्षांत ७५ हजार कोटी खर्च केले तर मग विकास कुठे?: अजितदादांचा भाजपा नेत्यांना थेट सवाल
8
तू तिच्या गाडीला अपघात कर, मी तिला वाचवतो...; तरुणीला इम्प्रेस करण्याचा प्लॅन, सफलही झाला पण...
9
“स्वत:च्या भरवशावर बहुमत मिळवू; परंतु साथीदारांना सोडणार नाही”; CM फडणवीस यांचा टॉक शो
10
ठाकरेंच्या गुहेत एकनाथ शिंदे यांची कठीण परीक्षा; भाजपा मदतीने तगडे आव्हान पार केले तर...
11
आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा! रात्रीच्या अंधारात सरकारी कार्यालये ताब्यात, तेहरानने हवाई क्षेत्र बंद केले...
12
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
13
…तर अमेरिका भारतावर ५०० टक्के टॅरिफ लादणार; डोनाल्ड ट्रम्प प्रशासन धक्का देण्याच्या तयारीत
14
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
16
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
17
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
18
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
19
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
20
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसई बारावीचे मूल्यांकन दहावी, अकरावीसह पूर्वपरीक्षेतील कामगिरीआधारे; समितीच्या बैठकीत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 05:06 IST

शिक्षण मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, मूल्यमापन करताना प्रत्येक घटकाला किती महत्त्व द्यायचे, याबाबत मतभेद समोर आले. परंतु या निकषाबाबत अंतिम निर्णय सीबीएसई बोर्ड घेणार आहे. १

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : सीबीएसई १२ वीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन १० वी आणि ११ वीमध्ये वार्षिक परीक्षेत मिळालेले गुण आणि १२ वीच्या पूर्वपरीक्षेतील त्यांच्या कामगिरीआधारे केले जाण्याची शक्यता आहे. मूल्यमापनाचे निकष ठरवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि सीबीएसई बोर्डाने गठित केलेल्या १२ तज्ज्ञांची समिती यांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली आहे. 

शिक्षण मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, मूल्यमापन करताना प्रत्येक घटकाला किती महत्त्व द्यायचे, याबाबत मतभेद समोर आले. परंतु या निकषाबाबत अंतिम निर्णय सीबीएसई बोर्ड घेणार आहे. १ जूनरोजी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला निर्माण झालेला धोका लक्षात घेता ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी ही परीक्षा घेण्याची तयारी दर्शविली होती, परंतु महाराष्ट्रासह दिल्ली, गोवा आदी राज्यांनी प्रत्यक्ष परीक्षा घेण्यास विरोध दर्शविला होता. सुप्रीम कोर्टानेही बोर्डाला मूल्यांकनाचे निकष ठरवण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली होती.

विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे वस्तुनिष्ठ प्रतिबिंब १० वीच्या निकालातून दिसून येत असल्याने १२ वीचे मूल्यांकन करताना याचा आधार घेतला जावा, असे समितीच्या सदस्यांचे मत होते, तर बारावीच्या पूर्वपरीक्षेसाठी पुरेशी तयारी न करू शकलेल्यांच्याबाबतीत ११ वीच्या निकालाचा आधार घेतला जावा, अशी चर्चा या बैठकीत झाली. तसेच १२ वीचे मूल्यांकन करावयाचे असल्याने याच्या पूर्वपरीक्षेतील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा विचार केलाच गेला पाहिजे, अशी चर्चा या बैठकीत झाल्याचे शिक्षण मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षा