शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा...! ८ दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
2
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
3
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
4
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
5
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
6
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
7
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
8
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
9
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
10
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
11
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं
12
जेपी इन्फ्राटेकचे एमडी मनोज गौर यांना अटक; १२,००० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आहे आरोप
13
डॉलरसमोर रुपयाची मोठी घसरण! तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल? बाजारात काय स्थिती?
14
Delhi Blast : 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती
15
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
16
विसरभोळे प्रवासी! ‘इतक्या’ कोटींच्या वस्तू रेल्वेत विसरले, रोज घेता येईल मोठी कार; पाहा, आकडा
17
Court: भटक्या कुत्र्यांमुळे संसारात विघ्न; पत्नीच्या एका सवयीमुळे पतीचा घटस्फोटासाठी अर्ज, नेमकं प्रकरण काय? 
18
आधीच BCCIची रोहित शर्माला 'वॉर्निंग'; त्यात आता MCAच्या 'त्या' विधानाने वाढवलं 'टेन्शन'
19
Groww Share Price Today : Groww च्या शेअर्सची दुसऱ्या दिवशीही जोरदार घोडदौड! गुंतवणूकदारांना ५०% हून अधिक फायदा, केलं मालामाल
20
Bhagvadgeeta: कोणतेही काम एका झटक्यात पूर्ण व्हावे, यासाठी 'हा' श्लोक २१ वेळा म्हणा!

सीबीएसई बारावीचे मूल्यांकन दहावी, अकरावीसह पूर्वपरीक्षेतील कामगिरीआधारे; समितीच्या बैठकीत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 05:06 IST

शिक्षण मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, मूल्यमापन करताना प्रत्येक घटकाला किती महत्त्व द्यायचे, याबाबत मतभेद समोर आले. परंतु या निकषाबाबत अंतिम निर्णय सीबीएसई बोर्ड घेणार आहे. १

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : सीबीएसई १२ वीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन १० वी आणि ११ वीमध्ये वार्षिक परीक्षेत मिळालेले गुण आणि १२ वीच्या पूर्वपरीक्षेतील त्यांच्या कामगिरीआधारे केले जाण्याची शक्यता आहे. मूल्यमापनाचे निकष ठरवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि सीबीएसई बोर्डाने गठित केलेल्या १२ तज्ज्ञांची समिती यांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली आहे. 

शिक्षण मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, मूल्यमापन करताना प्रत्येक घटकाला किती महत्त्व द्यायचे, याबाबत मतभेद समोर आले. परंतु या निकषाबाबत अंतिम निर्णय सीबीएसई बोर्ड घेणार आहे. १ जूनरोजी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला निर्माण झालेला धोका लक्षात घेता ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी ही परीक्षा घेण्याची तयारी दर्शविली होती, परंतु महाराष्ट्रासह दिल्ली, गोवा आदी राज्यांनी प्रत्यक्ष परीक्षा घेण्यास विरोध दर्शविला होता. सुप्रीम कोर्टानेही बोर्डाला मूल्यांकनाचे निकष ठरवण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली होती.

विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे वस्तुनिष्ठ प्रतिबिंब १० वीच्या निकालातून दिसून येत असल्याने १२ वीचे मूल्यांकन करताना याचा आधार घेतला जावा, असे समितीच्या सदस्यांचे मत होते, तर बारावीच्या पूर्वपरीक्षेसाठी पुरेशी तयारी न करू शकलेल्यांच्याबाबतीत ११ वीच्या निकालाचा आधार घेतला जावा, अशी चर्चा या बैठकीत झाली. तसेच १२ वीचे मूल्यांकन करावयाचे असल्याने याच्या पूर्वपरीक्षेतील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा विचार केलाच गेला पाहिजे, अशी चर्चा या बैठकीत झाल्याचे शिक्षण मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षा