शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

सीबीएसई बारावीचे मूल्यांकन दहावी, अकरावीसह पूर्वपरीक्षेतील कामगिरीआधारे; समितीच्या बैठकीत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 05:06 IST

शिक्षण मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, मूल्यमापन करताना प्रत्येक घटकाला किती महत्त्व द्यायचे, याबाबत मतभेद समोर आले. परंतु या निकषाबाबत अंतिम निर्णय सीबीएसई बोर्ड घेणार आहे. १

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : सीबीएसई १२ वीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन १० वी आणि ११ वीमध्ये वार्षिक परीक्षेत मिळालेले गुण आणि १२ वीच्या पूर्वपरीक्षेतील त्यांच्या कामगिरीआधारे केले जाण्याची शक्यता आहे. मूल्यमापनाचे निकष ठरवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि सीबीएसई बोर्डाने गठित केलेल्या १२ तज्ज्ञांची समिती यांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली आहे. 

शिक्षण मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, मूल्यमापन करताना प्रत्येक घटकाला किती महत्त्व द्यायचे, याबाबत मतभेद समोर आले. परंतु या निकषाबाबत अंतिम निर्णय सीबीएसई बोर्ड घेणार आहे. १ जूनरोजी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला निर्माण झालेला धोका लक्षात घेता ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी ही परीक्षा घेण्याची तयारी दर्शविली होती, परंतु महाराष्ट्रासह दिल्ली, गोवा आदी राज्यांनी प्रत्यक्ष परीक्षा घेण्यास विरोध दर्शविला होता. सुप्रीम कोर्टानेही बोर्डाला मूल्यांकनाचे निकष ठरवण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली होती.

विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे वस्तुनिष्ठ प्रतिबिंब १० वीच्या निकालातून दिसून येत असल्याने १२ वीचे मूल्यांकन करताना याचा आधार घेतला जावा, असे समितीच्या सदस्यांचे मत होते, तर बारावीच्या पूर्वपरीक्षेसाठी पुरेशी तयारी न करू शकलेल्यांच्याबाबतीत ११ वीच्या निकालाचा आधार घेतला जावा, अशी चर्चा या बैठकीत झाली. तसेच १२ वीचे मूल्यांकन करावयाचे असल्याने याच्या पूर्वपरीक्षेतील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा विचार केलाच गेला पाहिजे, अशी चर्चा या बैठकीत झाल्याचे शिक्षण मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षा