शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

अकरावीच्या एक लाख जागा प्रवेशाच्या प्रतीक्षेत; दुसरी विशेष फेरी १५ सप्टेंबरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 08:26 IST

या विशेष फेरीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी अजूनही १ लाख ०७ हजार ७२६ जागा रिक्त आहेत.

मुंबई : अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आता दुसरी विशेष फेरी आजपासून राबवली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान अर्ज भरण्यासह अर्जात दुरुस्ती, पसंतीक्रम नोंदवणे, अर्जाचा भाग दोन भरणे, आदी प्रक्रिया करता येणार असून, दुसऱ्या फेरीची निवड यादी १५ सप्टेंबरला जाहीर होईल. या विशेष फेरीत आता पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही अर्ज करता येणार आहे. 

या विशेष फेरीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी अजूनही १ लाख ०७ हजार ७२६ जागा रिक्त आहेत.  अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या, तर एक विशेष फेरी अशा एकूण चार फेऱ्या राबवण्यात आल्या. मात्र, अद्यापही काही विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्याने, तसेच राज्य मंडळाने घेतलेल्या पुरवणी परीक्षेच्या निकालातील उत्तीर्ण आणि एटीकेटी सवलत प्राप्त विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळण्यासाठी दुसरी विशेष फेरी राबवली जाणार आहे. दरम्यान, पहिल्या विशेष फेरीमध्ये अलॉटमेंट प्राप्त ७९ हजार ५१३ विद्यार्थ्यांपैकी ५८ हजार ७७२ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. 

एटीकेटी विद्यार्थ्यांनी असा भरावा अर्जएटीकेटी सवलत प्राप्त विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेतील सहा विषयांचे गुण भरावेत. गुणपत्रिका एकापेक्षा जास्त असल्यास सर्वांत शेवटच्या परीक्षेचा बैठक क्रमांक अर्जात नोंदवून गुणपत्रके अपलोड करावीत.एटीकेटी असल्यास उर्वरित एक किंवा दोन विषयांचे सर्वोत्तम गुण मोजून सहाशेपैकी गुण नोंदवावेत. ते गुण पाचेशपैकी रूपांतरित करून गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरले जातील.एटीकेटी विद्यार्थ्याने प्रवेश अर्ज भरून भाग एक आणि भाग दोन पुन्हा लॉक करणे आवश्यक आहे.भाग एक यापूर्वी भरला असल्यास त्यातील माहिती आवश्यकतेनुसार सुधारित करून अर्ज लॉक करावा. जुलै २०२२ च्या पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी रिपीटर म्हणून अर्ज भरावा.