शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

अपनी तो जैसे तैसे.. कट जायेगीऽऽ आपका क्या होगा ?

By सचिन जवळकोटे | Updated: November 17, 2019 08:07 IST

लगाव बत्ती

- सचिन जवळकोटे

वय झालं म्हणून सिंह कधी गवत खात नाही, हे गेल्या दहा दिवसांत ‘थोरले काका बारामतीकरां’नी दाखवून दिलेलं. फेकलेल्या तुकड्यांना लाथाडून स्वत: शिकार करायला वाघ कधी मागं-पुढं बघत नाही, हेही निकालानंतर ‘मातोश्री’वरच्या आक्रमक डरकाळीनं कळून चुकलेलं. आता विषय इतकाच, गेल्या पाच वर्षांत रक्ताळलेल्या खंजिरांचं काय होणार ? ‘सत्तेसाठी पक्षांतर केलं...परंतु पुन्हा सत्तेविना जिणं आलं !’ असं म्हणणा-यांचं सांत्वन कोण करणार ?

 ‘लाल बत्ती’ गेली.. वर्दळ गेली..

हाती केवळ आमदारकी राहिली ! 

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणासाठी सध्याचा काळ अत्यंत ‘टर्निंग पॉर्इंट’चा. गेल्या पाच वर्षांत ज्यांनी अख्ख्या जिल्ह्याची सूत्रं स्वत:च्या ताब्यात घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला, ते दोन्ही ‘देशमुख’ आजच्या घडीला ‘माजी मंत्री’ बनले. ‘लाल बत्ती’ गेली, वर्दळ गेली, हाती केवळ आमदारकी राहिली. ज्या ‘बाणा’च्या उमेदवारांना संपविण्यासाठी यांनी आतून गेमागेमी केली, तेच आता नाकावर टिच्चून सत्तेवर येऊ लागलेले. ‘सावंतांची तानाशाही’ सहन करण्यासाठी ‘कमळ’वालेही मानसिक तयारी करू लागलेले.तरी बरं...सोलापुरात ‘बाणा’च्या ‘आजी-माजी’ जिल्हाप्रमुखांशी या दोन्ही ‘देशमुखां’ची आतून चांगलीच सलगी. याचा सज्जड पुरावाच निकालादिवशी तमाम सोलापूरकरांना मिळालेला. कुमठ्याच्या ‘मानें’ना ज्यांनी बळं-बळंच ‘मध्य’मध्ये उभं केलं, ते ‘पुरुषोत्तम’ निकाल लागल्यानंतर ‘उत्तर’चा ‘विजयो’त्सव साजरा करण्यात रंगलेले. ‘दिलीपरावां’ना इतक्या-इतक्या मतांनी लीड देऊ, अशी राणाभीमदेवी घोषणा करणारे ‘गणेश देगावकर’ही याच निकालादिनी ‘बापूं’सोबत ‘दक्षिण’चा गुलाल अंगावर घेण्यात रमलेले. ‘बाण’वाल्या या दोन्ही पदाधिका-यांच्या चेहऱ्यावर ना ‘मध्य’च्या पराभवाचं सुतक दिसलं ना चौथ्या क्रमांकावर फेकलं गेल्याचं दु:ख जाणवलं. म्हणतात ना...यशाचे धनी लाख असतात, अपयश मात्र बेवारशी असतं.असो. ‘माने-कोठे’ जोडीला आपापसात झुंजायला लावून या साºयांनीच आपापली गेम छानपैकी वाजवून घेतली. ‘बरडे-ठोंगे’ नेहमीप्रमाणं ‘जिल्हाप्रमुख’ पदासाठी भांडायला मोकळे झाले. शत्रूचं खच्चीकरण झाल्यानं आता पाच वर्षे आपण निवांत, या भावनेतून दोन्ही ‘देशमुख’ही रिलॅक्स बनले; परंतु या गोंधळात ‘प्रणितीतार्इं’चा ‘हात’ मोठा झाला हे आलंच नाही यांच्या लक्षात. आता कदाचित नव्या सरकारमध्ये ‘लाल दिव्याची गाडी’ जेव्हा ‘जनवात्सल्य’समोर येऊन धडकेल, तेव्हा यांना फुटेल घाम. मात्र ‘बरडे-वानकर’सारखी ‘निष्ठावंत’ मंडळी रुमाल घेऊन सोबत असल्यानं या दोन्ही देशमुखांना म्हणे नसावी एवढी चिंता. परंतु ज्यांनी ‘बारामतीकरां’ना सोडून ‘कमळ’ हातात धरलं, त्यांचं काय ? ‘अपनी तो जैसे तैसे कट जायेगी...आपका क्या होगा जनाबे आलीऽऽ’ असं नक्कीच ‘प्युअर लोटस’वाले बाकीच्या ‘आयारामां’ना म्हणू लागतील. लगाव बत्ती...

 एक ‘कुर्सी’.. दो ‘दाढी’ !

‘महाशिवआघाडी’ सत्तेवर आलीतर ‘सीएम’ची खुर्ची ‘बाणा’कडं जाणार हे जसं स्पष्ट झालंय, तसंच पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश ‘पालकमंत्री’ पदंही ‘बारामतीकर’ स्वत:च्याच पार्टीकडं घेणार हेही कळून चुकलंय...कारण ‘थोरले काका बारामतीकर’ यांचा हाच पट्टा जीव की प्राण. तशात कोल्हापूरच्या ‘म्हाडकां’पासून अकलूजच्या ‘पाटलां’पर्यंत अनेकजण पाठीत वार करण्यात रमलेले. आयुष्यभर ‘खंजीर’रूपी कहाण्यांचं वलय घेऊन फिरणारे ‘थोरले काका’ स्वत:च्याच पाठीतल्या या नव्या वेदनेपायी कासावीस झालेले. आता वेळ फिरलीय. वार करणारे सामोरे आलेत. ‘एकेकाला बघून घेतोऽऽ’ ही घेतलेली शपथ पूर्ण करण्याची वेळ आलीय. त्यामुळंच सोलापूरसाठी ते आपलाच ‘पालकमंत्री’ नेमण्याची शक्यता दिसू लागलीय. त्यातही नाव ‘भारतनाना’चंच पुढं.किती गंमत नां...एकीकडं ‘पालकमंत्री’पदाचे दावेदार असलेले ‘बाण’वाले आमदार ‘शहाजीबापू’ यांना दाढी. दुसरीकडे ‘भारतनाना’ यांनाही दाढी. फरक फक्त एवढाच की, ‘नानां’ची राजकीय कारकीर्द ‘धनुष्यबाणा’पासून सुरू झालेली...तर ‘बापूं’चा राजकीय प्रवास आता याच ‘बाणा’पर्यंत शेवटी येऊन पोहोचलेला. लगाव बत्ती...

रिक्षा म्हणाली नेत्याला.. खुर्ची नसेल

तर मीही चालते तुम्हाला !

पेशानं प्राध्यापक असलेल्या ‘वाघोली’च्या ‘लक्ष्मणरावां’नी एकेकाळी ‘सुता’वरून सत्तेचा स्वर्ग गाठलेला. ‘पोपटपंची’ म्हणून कुचेष्टा झाली, तरीही त्यांच्या वाणीतला कडवटपणा कमी झाला नाही. ‘सत्ता दरबारातला नाच्या’ म्हणून अवहेलना झाली, तरीही त्यांच्या पायातली भिंगरी कधी थांबली नाही. ज्यासाठी ‘घड्याळ्याचे काटे’ मोडून ते ‘कमळ’ हुंगू लागले, तीच सत्ता यंदा गमाविण्याची वेळ आली. तरीही त्यांचं बोलणं-चालणं थांबलंच नाही. चारच दिवसांपूर्वी त्यांनी ‘पवारांची स्ट्रेंथ’ मोजून ‘बारामती भक्तां’ना अंगावर ओढवून घेतलं.स्वत:हून वादळाला सामोरं जाणारे हे अवलिया प्राध्यापक महाशय जिल्ह्यातील ‘घड्याळ’वाल्यांना पुरून उरलेत, हे मात्र नक्की. लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘लक्ष्मणरावां’नी ‘अनगरकरां’वर राळ उडविलेली. तेव्हा दिल्या खुर्चीला जागणारे मोहोळचे ‘चवरे’ लगेच वाड्याच्या मदतीला धावले होते. त्यांनी ‘रेडीमेड पत्रका’तून ‘लक्ष्मणरावां’च्या कार्यपद्धतीवर ‘प्रकाश’ टाकताना ‘आता स्वत:चा संसार नीट करा,’ असा अनाहूत सल्लाही त्यावेळी दिला होता. तेव्हा सटकलेले ‘लक्ष्मणराव’ थेट ‘चवरें’च्या घराकडं निघाले होते. मोहोळमधील चौकात आपली आलिशान गाडी लावून चक्क खटारा ‘टमटम’मध्ये बसले होते. याच रिक्षातूून ते ‘चवरें’च्या घरी पोहोचले अन् ‘संसार कसा करायचा असतो’ याची झलकही दाखविली होती. 

.. परंतु त्यांच्यासाठी हे सारं ‘आपलं सरकार’ असेपर्यंत ठीक होतं होऽऽ. सत्तेच्या जीवावर कितीही उड्या मारल्या तरी लोकांना कौतुक वाटतं; मात्र सत्ता नसताना केलेल्या कसरतीही जनतेला गंमती वाटू लागतात. त्यामुळं आता पाच वर्षे ‘लक्ष्मणरावां’सारख्या कैक मंडळींना खूप सावधपणे राजकारण करावं लागणार, हे मात्र नक्की. लगाव बत्ती...

जाता-जाता : ‘आपका क्या होगाऽऽ’ हे गाणं प्रातिनिधीक स्वरुपात ‘लक्ष्मणरावां’साठी असलं तरी ‘अकलूजचे दादा, पंढरपूरचे पंत, बार्शीचे राजाभौ अन् शेटफळचे डोंगरे’ यांनाही लागू होत असतं म्हणे ! बाकी अधून-मधून ‘अजितदादां’च्या संपर्कात असणाऱ्या ‘संजयमामां’च्या कानावर हे गाणं पडलं नाही तरी काही हरकत नसावी. लगाव बत्ती...

(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलPrashant Paricharakप्रशांत परिचारक