शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

अजि सोनियाचा दिनु

By admin | Updated: June 3, 2015 23:31 IST

आजचा दिवस सोन्याचा म्हणजे मौलिक आहे, ज्याची तुलना दुसऱ्या कोणत्याही उपमेने होऊ शकणार नाही असा, हे ज्ञानेश्वर आपल्याला सांगत आहेत

प्रल्हाद जाधवआजचा दिवस सोन्याचा म्हणजे मौलिक आहे, ज्याची तुलना दुसऱ्या कोणत्याही उपमेने होऊ शकणार नाही असा, हे ज्ञानेश्वर आपल्याला सांगत आहेत. ते आजच्या दिवसाविषयी बोलत आहेत. कालचा दिवस किंवा उद्याचा दिवस असे न म्हणता आजचा दिवस त्यांनी निवडला आहे. दिवसाला चोवीस तास असतात. त्यापैकी बारा तास रात्रीचे. उरलेल्या बारा तासात आपण जेमतेम आठ तास काम करणार. म्हणजे किती कमी वेळ आपल्या हातात आहे, हे लक्षात यावे. माणसाचा जन्म एकदाच मिळतो हे आता सर्वांना माहीत आहे. त्याचे जगणे क्षणभंगुर आहे, हेही सर्वांना माहीत आहे. कोणत्याही क्षणी त्याला मृत्यू गाठू शकतो. अशा स्थितीत हाती असलेला वेळ कशासाठी आणि कसा वापरायचा याचे प्राथम्य प्रत्येकानेच सकाळी उठल्या उठल्या लगेच ठरवले पाहिजे. आजचा दिवस हा जणू आयुष्यातील शेवटचा दिवस आहे असे समजून जगले तर काय होईल? तर अर्थातच त्याला सोन्याचे मोल येईल. तो सार्थकी लागेल. ‘अजि सोनियाचा दिनु’ असे ज्ञानेश्वरांनी का म्हटले आहे ते खऱ्या अर्थाने लक्षात येईल.आज मी मला नेमून दिलेले काम उत्तमरीत्या पार पाडीन, कुणावर चिडणार नाही, कुणाला कमी लेखणार नाही, भांडण करणार नाही, कुणाचा मत्सर करणार नाही, अहंभाव बाळगणार नाही, बडेजाव मिरवणार नाही, गरजूंना मदत करीन, दु:खितांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करीन, करीत असलेली गोष्ट छोटी की मोठी याचा विचार न करता ती मनापासून करीेन, साऱ्या जीवांशी-चराचराशी मी बंधुभावाने जोडला गेलो आहे हे लक्षात घेऊन प्रत्येक क्षणाचे सोने करण्याचा प्रयत्न करीन.मोठी माणसे आपल्याला नेहमी सांगतात की कामात लक्ष द्या. याचा अर्थ चित्त अन्यत्र भटकू न देता वर्तमानात रहा. अभ्यासात लक्ष द्या, असे मुलांना सांगितले जाते, याचा अर्थ त्यांनीही केवळ कल्पनेच्या विश्वात भराऱ्या न मारता वर्तमानात राहून अभ्यास केला पाहिजे. असे लक्ष दिल्यानेच कामाचे उत्तम परिणाम लाभतील. अभ्यासाचे उत्तम फळ मिळेल. भूतकाळातील परिस्थिती आपण बदलू शकत नाही आणि भविष्यकाळात काय घडेल यावर आपले नियंत्रण असू शकत नाही. म्हणून आजचा हा दिवस, या क्षणीचे वर्तमान सोन्याच्या मोलाचे आहे असे ज्ञानेश्वर सांगत आहेत. ते केवळ एवढ्यावरच थांबत नाहीत तर पुढील ओळीत ‘वर्षे अमृताचा घनू’ असे म्हणत आहेत. ज्याला वर्तमान क्षणातील सोन्याची किंमत कळते त्यांच्यावर अमृताचा मेघवर्षाव सतत होत राहील. त्यासाठी कोणत्याही वेगळ्या ऋतुुचक्राची वाट पाहण्याची आवश्यकता नाही.