शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

अजि सोनियाचा दिनु

By admin | Updated: June 3, 2015 23:31 IST

आजचा दिवस सोन्याचा म्हणजे मौलिक आहे, ज्याची तुलना दुसऱ्या कोणत्याही उपमेने होऊ शकणार नाही असा, हे ज्ञानेश्वर आपल्याला सांगत आहेत

प्रल्हाद जाधवआजचा दिवस सोन्याचा म्हणजे मौलिक आहे, ज्याची तुलना दुसऱ्या कोणत्याही उपमेने होऊ शकणार नाही असा, हे ज्ञानेश्वर आपल्याला सांगत आहेत. ते आजच्या दिवसाविषयी बोलत आहेत. कालचा दिवस किंवा उद्याचा दिवस असे न म्हणता आजचा दिवस त्यांनी निवडला आहे. दिवसाला चोवीस तास असतात. त्यापैकी बारा तास रात्रीचे. उरलेल्या बारा तासात आपण जेमतेम आठ तास काम करणार. म्हणजे किती कमी वेळ आपल्या हातात आहे, हे लक्षात यावे. माणसाचा जन्म एकदाच मिळतो हे आता सर्वांना माहीत आहे. त्याचे जगणे क्षणभंगुर आहे, हेही सर्वांना माहीत आहे. कोणत्याही क्षणी त्याला मृत्यू गाठू शकतो. अशा स्थितीत हाती असलेला वेळ कशासाठी आणि कसा वापरायचा याचे प्राथम्य प्रत्येकानेच सकाळी उठल्या उठल्या लगेच ठरवले पाहिजे. आजचा दिवस हा जणू आयुष्यातील शेवटचा दिवस आहे असे समजून जगले तर काय होईल? तर अर्थातच त्याला सोन्याचे मोल येईल. तो सार्थकी लागेल. ‘अजि सोनियाचा दिनु’ असे ज्ञानेश्वरांनी का म्हटले आहे ते खऱ्या अर्थाने लक्षात येईल.आज मी मला नेमून दिलेले काम उत्तमरीत्या पार पाडीन, कुणावर चिडणार नाही, कुणाला कमी लेखणार नाही, भांडण करणार नाही, कुणाचा मत्सर करणार नाही, अहंभाव बाळगणार नाही, बडेजाव मिरवणार नाही, गरजूंना मदत करीन, दु:खितांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करीन, करीत असलेली गोष्ट छोटी की मोठी याचा विचार न करता ती मनापासून करीेन, साऱ्या जीवांशी-चराचराशी मी बंधुभावाने जोडला गेलो आहे हे लक्षात घेऊन प्रत्येक क्षणाचे सोने करण्याचा प्रयत्न करीन.मोठी माणसे आपल्याला नेहमी सांगतात की कामात लक्ष द्या. याचा अर्थ चित्त अन्यत्र भटकू न देता वर्तमानात रहा. अभ्यासात लक्ष द्या, असे मुलांना सांगितले जाते, याचा अर्थ त्यांनीही केवळ कल्पनेच्या विश्वात भराऱ्या न मारता वर्तमानात राहून अभ्यास केला पाहिजे. असे लक्ष दिल्यानेच कामाचे उत्तम परिणाम लाभतील. अभ्यासाचे उत्तम फळ मिळेल. भूतकाळातील परिस्थिती आपण बदलू शकत नाही आणि भविष्यकाळात काय घडेल यावर आपले नियंत्रण असू शकत नाही. म्हणून आजचा हा दिवस, या क्षणीचे वर्तमान सोन्याच्या मोलाचे आहे असे ज्ञानेश्वर सांगत आहेत. ते केवळ एवढ्यावरच थांबत नाहीत तर पुढील ओळीत ‘वर्षे अमृताचा घनू’ असे म्हणत आहेत. ज्याला वर्तमान क्षणातील सोन्याची किंमत कळते त्यांच्यावर अमृताचा मेघवर्षाव सतत होत राहील. त्यासाठी कोणत्याही वेगळ्या ऋतुुचक्राची वाट पाहण्याची आवश्यकता नाही.