शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

ह. मो. मराठे - शापित प्रतिभावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 03:15 IST

ह. मो. मराठे हे ‘हमो’ या टोपण नावाने ओळखले जात होते. त्यांच्या काही कथा कादंबºयांमधून उपरोधिक आणि विडंबनात्मक लेखनशैलीचा अनुभव त्यांनी वाचकांना दिला.

ह. मो. मराठे हे ‘हमो’ या टोपण नावाने ओळखले जात होते. त्यांच्या काही कथा कादंबºयांमधून उपरोधिक आणि विडंबनात्मक लेखनशैलीचा अनुभव त्यांनी वाचकांना दिला. ते चतुरस्र लेखक व साक्षेपी संपादक होते. आपल्या लेखनावर आणि विचारांवर ते कायमच ठाम राहिले,१९७५ पासून ते अगदी आजपर्यंत मराठी वाचकांच्या मनावर राज्य करणारे ह.मो. स्वर्गवासी झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेला एक जिद्दी युवक साहित्य क्षेत्रात किती उत्तुंग भरारी घेऊ शकतो, याचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांना एडिटर विईथ मिडास टच म्हणायचे. किर्लोस्कर मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. लोकप्रभाचे संपादक झाल्यावर त्यांनी त्याचा खप लाखाच्या पुढे नेऊन दाखविला होता. त्यामुळे पत्रकारितेतील ज्या दुढ्ढाचार्यांचा पोटशूळ उठला त्यांनी ह.मों.वर वैयक्तिक चिखलफेक करून त्यांना त्या पदावरून घालवले, घरदार नावाच्या नवख्या मासिकाला त्यांनी आपल्या संपादन कौशल्याच्या जोरावर लाखाच्या पुढे खप गाठून दिला होता. ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ या त्यांच्या साहित्यकृतीमुळे मराठी वाचकाला ह. मो. यांचा खºया अर्थाने परिचय झाला.

परंतु प्रत्येक वेळी यश त्यांना हुलकावणी देत गेले. त्यामुळे घरदार मासिकाच्या मालकांची आर्थिक स्थिती डबघाईला आली आणि ते बंद पडले. नवशक्तीचे ते काही काळ संपादक होते, त्याआधी मार्मिकचेही ते कार्यकारी संपादक होते. परंतु संपादनाची जी भट्टी किर्लोस्कर, लोकप्रभा आणि घरदारमध्ये जमली तशी ती परत जमलीच नाही. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे ते उमेदवार होते. यश त्यांच्या दृष्टिक्षेपात होते. परंतु त्यांनी काढलेल्या आवाहन पत्रातील काही विधानांना जातीय रंग देऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मजल काहींनी गाठली आणि साहित्य क्षेत्रातील या हनुमानाला पुन्हा एकदा माघार घ्यावी लागली.पुढारीचे संपादक म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले. परंतु तिथे ते रमले नाहीत. त्यांच्या लेखनाची भट्टी ही नंतर बिघडतच गेली. बालकांड हे त्यांचे आत्मचरित्र खूप गाजले, हे त्यांचे गाजलेले शेवटचे पुस्तक म्हणावे लागेल. परिस्थितीमुळे आणि साहित्यातील जातीयवाद व कंपूशाही याचा ते आयुष्यभर बळी ठरले. लेखन, पत्रकारिता, संपादन, आणि साहित्य क्षेत्र यात प्रभावी मुशाफिरी करणारा हा प्रतिभावंत अभिजात सृजनशीलतेचा धनी होता. परंतु त्याला नियतीची आणि नशिबाची साथ मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्यातील अस्सल प्रतिभावंत हा पूर्ण ताकदीने वाचकांपुढे येऊ शकला नाही.मराठी साहित्यातील पुरस्कारांनीही त्यांची उपेक्षा केली. असे असले तरी सतत हसतमुख असणारा आणि चिरतरुण लेखणीचे वरदान लाभलेला हा प्रतिभावंत काळाच्या पडद्याआड गेल्याने मराठी सारस्वताची अपरिमित हानी झाली आहे. साहित्य पत्रकारिता आणि संपादन यातील ‘अरुण’ साधूंच्या रूपाने अस्ताला गेला आणि त्यापाठोपाठ काही दिवसांतच याच तीनही क्षेत्रात कर्तबगार भरारी घेणारा हनुमानही अंतर्धान पावला. हे मराठी साहित्याचे दुर्दैव म्हटले पाहिजे.