शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
3
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
4
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
5
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
6
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
7
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
8
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
9
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
10
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
11
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
12
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
13
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
14
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
15
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
16
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
17
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
18
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
19
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
20
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!

ह. मो. मराठे - शापित प्रतिभावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 03:15 IST

ह. मो. मराठे हे ‘हमो’ या टोपण नावाने ओळखले जात होते. त्यांच्या काही कथा कादंबºयांमधून उपरोधिक आणि विडंबनात्मक लेखनशैलीचा अनुभव त्यांनी वाचकांना दिला.

ह. मो. मराठे हे ‘हमो’ या टोपण नावाने ओळखले जात होते. त्यांच्या काही कथा कादंबºयांमधून उपरोधिक आणि विडंबनात्मक लेखनशैलीचा अनुभव त्यांनी वाचकांना दिला. ते चतुरस्र लेखक व साक्षेपी संपादक होते. आपल्या लेखनावर आणि विचारांवर ते कायमच ठाम राहिले,१९७५ पासून ते अगदी आजपर्यंत मराठी वाचकांच्या मनावर राज्य करणारे ह.मो. स्वर्गवासी झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेला एक जिद्दी युवक साहित्य क्षेत्रात किती उत्तुंग भरारी घेऊ शकतो, याचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांना एडिटर विईथ मिडास टच म्हणायचे. किर्लोस्कर मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. लोकप्रभाचे संपादक झाल्यावर त्यांनी त्याचा खप लाखाच्या पुढे नेऊन दाखविला होता. त्यामुळे पत्रकारितेतील ज्या दुढ्ढाचार्यांचा पोटशूळ उठला त्यांनी ह.मों.वर वैयक्तिक चिखलफेक करून त्यांना त्या पदावरून घालवले, घरदार नावाच्या नवख्या मासिकाला त्यांनी आपल्या संपादन कौशल्याच्या जोरावर लाखाच्या पुढे खप गाठून दिला होता. ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ या त्यांच्या साहित्यकृतीमुळे मराठी वाचकाला ह. मो. यांचा खºया अर्थाने परिचय झाला.

परंतु प्रत्येक वेळी यश त्यांना हुलकावणी देत गेले. त्यामुळे घरदार मासिकाच्या मालकांची आर्थिक स्थिती डबघाईला आली आणि ते बंद पडले. नवशक्तीचे ते काही काळ संपादक होते, त्याआधी मार्मिकचेही ते कार्यकारी संपादक होते. परंतु संपादनाची जी भट्टी किर्लोस्कर, लोकप्रभा आणि घरदारमध्ये जमली तशी ती परत जमलीच नाही. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे ते उमेदवार होते. यश त्यांच्या दृष्टिक्षेपात होते. परंतु त्यांनी काढलेल्या आवाहन पत्रातील काही विधानांना जातीय रंग देऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मजल काहींनी गाठली आणि साहित्य क्षेत्रातील या हनुमानाला पुन्हा एकदा माघार घ्यावी लागली.पुढारीचे संपादक म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले. परंतु तिथे ते रमले नाहीत. त्यांच्या लेखनाची भट्टी ही नंतर बिघडतच गेली. बालकांड हे त्यांचे आत्मचरित्र खूप गाजले, हे त्यांचे गाजलेले शेवटचे पुस्तक म्हणावे लागेल. परिस्थितीमुळे आणि साहित्यातील जातीयवाद व कंपूशाही याचा ते आयुष्यभर बळी ठरले. लेखन, पत्रकारिता, संपादन, आणि साहित्य क्षेत्र यात प्रभावी मुशाफिरी करणारा हा प्रतिभावंत अभिजात सृजनशीलतेचा धनी होता. परंतु त्याला नियतीची आणि नशिबाची साथ मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्यातील अस्सल प्रतिभावंत हा पूर्ण ताकदीने वाचकांपुढे येऊ शकला नाही.मराठी साहित्यातील पुरस्कारांनीही त्यांची उपेक्षा केली. असे असले तरी सतत हसतमुख असणारा आणि चिरतरुण लेखणीचे वरदान लाभलेला हा प्रतिभावंत काळाच्या पडद्याआड गेल्याने मराठी सारस्वताची अपरिमित हानी झाली आहे. साहित्य पत्रकारिता आणि संपादन यातील ‘अरुण’ साधूंच्या रूपाने अस्ताला गेला आणि त्यापाठोपाठ काही दिवसांतच याच तीनही क्षेत्रात कर्तबगार भरारी घेणारा हनुमानही अंतर्धान पावला. हे मराठी साहित्याचे दुर्दैव म्हटले पाहिजे.