शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
3
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
4
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
5
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
6
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
7
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."
8
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
9
Video - "मी तुमच्या मुलीवर उपचार करणार नाही..."; डॉक्टरची रुग्णाच्या वडिलांना मारहाण
10
Vastu Shastra: वास्तु शास्त्रानुसार घराच्या 'या' भागात ठेवा मोरपीस, आयुष्यात भरतील नवे रंग!
11
मायक्रोसॉफ्टने नोकियानंतर या कंपनीवर तगडा पैसा लावला; Ai च्या इतिहासातील सर्वात मोठी डील, फळणार का?
12
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
13
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
14
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्ठा राडा !! मोहम्मद रिझवान पाक क्रिकेट बोर्डाला नडला... काय घडलं?
15
किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; सेन्सेक्स ८५,००० अंकांच्या आणि निफ्टी २६,००० अंकांच्या जवळ
16
PPF ला साधं समजू नका! पती-पत्नी मिळून बनवू शकता ₹१.३३ कोटींचा फंड, तोही टॅक्स फ्री
17
'तो' प्रवास ठरला शेवटचा! कुटुंबीयांसमोरच वडील आणि मुलीचा होरपळून मृत्यू; १० जण जखमी
18
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
19
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
20
Ramkesh Murder Case: बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?

यंदाचं वरीस लय भारी ठरेल वन्यजीवांच्या वाढीसाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 05:33 IST

यावर्षी पाऊस भरपूर झाल्याने सगळीकडे हिरवेगार गालिचे पसरले आहेत. पाणवठे वाढले आहेत. आता गरज आहे फक्त माणसाच्या शहाणपणाची. वृक्षांचे संवर्धन करण्याची.

- डॉ. महेश गायकवाड, पर्यावरणतज्ज्ञयावर्षी पाऊस भरपूर झाल्याने सगळीकडे हिरवेगार गालिचे पसरले आहेत. पाणवठे वाढले आहेत. आता गरज आहे फक्त माणसाच्या शहाणपणाची. वृक्षांचे संवर्धन करण्याची. आता जर आपण निसर्गरक्षण केले तर जैवविविधता वाढेल. स्थानिक वृक्षसंपदा झपाट्याने वाढते आहे. गाव व शहराभोवती जंगले निर्माण झाली आहेत. काही ठिकाणी मात्र अशा चांगल्या वाढलेल्या गवतावर तणनाशक मारून ती पुन्हा उजाड करण्याचे काम काही अज्ञानी करतात. हे वेळीच थांबले पाहिजे. कारण निसर्गाने जे निर्माण केलेले आहे, ते नष्ट करण्याचा मानवाला अधिकार नाही.

आज कुठेही फेरफटका मारला तर सगळीकडे रानातून खळखळ असा पाण्याचा मंजुळ आवाज येतो. अशा छोट्या-मोठ्या झऱ्यांतील पाण्याच्या आवाजाने मन प्रसन्न होत आहे, अगदी रानभर सगळीकडे अजूनही पाणी वाहत आहे. ज्या भागात गवत जास्त आहे, त्या भागात तर आजही शेतातून पाणी वाहत आहे. ज्या रानाला गवताने वेढले आहे, त्या रानात सहजपणे पाणपक्षी पोहताना दिसून येत आहेत, यात रानबदके, बगळे, चिखल्या, धोबी, चमचे, करकोचे, पानकोंबड्या, वकील, टिटवी असे नानाविध पक्षी पाहावयास मिळतात. सगळीकडे राने शेवाळली आहेत, त्यामुळे विविध पक्ष्यांचे खाद्य रानात तयार झाले आहे, उथळ पाण्यात तर अगदी लवकरच शेवाळ तयार होते. परिणामी पक्ष्यांसाठी अशी राने म्हणजे मेजवानीच असते. पाणथळ जागा म्हणजे बेडकांचे माहेरघरच, या ठिकाणी रात्रभर नर बेडूक मादी बेडकाला मोठमोठ्याने आवाज काढीत मिलनासाठी बोलावत असतो, परिणामी हजारो बेडूक निर्माण झाले आहेत. यांच्यामुळे पाणदिवड किंवा विरुळा जातीचा पाणसाप दिसायला लागला आहे, कारण गेल्या १० ते १२ वर्षांत जमिनीवर अशी पाणथळ दिसतच नव्हती, त्यामुळे पाणसापसुद्धा दुर्मीळ होत गेले. आता मात्र सहज माळरान परिसरात जिथे डबकी साठली आहेत तिथे बेडूक, पाणसाप दिसायला सुरुवात झाली आहे.
सर्वांसाठी माळरानांतील उथळ पाणथळांमुळे परदेशी पक्षीही आकर्षित होतात आणि मग जुन्या पाणवठ्यावर जाण्यापेक्षा नवीन अतिउथळ भागातील पाणथळी भेट देतात. अशा पाणथळांच्या ठिकाणी पाणपक्ष्यांचे खाद्य शेवाळ, लहान कीटक जास्त तयार होते. खरे तर यात उजनी जलाशय, माणमधील राजेवाडी तलाव असून यावर्षी मात्र अशा अनेक मोजक्या तलावांवर पक्षी जाताना दिसत नाहीत. याला प्रमुख दोन कारणे आहेत, यात उजनी, राजेवाडीसारखे तलाव आजही १०० टक्के भरलेले आहेत. त्यामुळे पक्ष्यांना खायला शेवाळ किंवा गाळातील पाणकीटक खाण्यास मिळत नाहीत, म्हणून त्यांनी आपली मोहीम माळरानातील विविध छोट्या पाणथळ जागांकडे आखल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. खरे तर ही बाब अतिशय आनंददायक असून, यामुळे खाण्यासाठी पक्ष्यांमध्ये अजिबात स्पर्धा निर्माण होत नाही. मोठ्या प्रमाणात खायला मिळत असल्यामुळे प्रजननसुद्धा मोठ्या प्रमाणावर होऊन, संख्यात्मक वाढ होण्यासाठी उपयुक्त अशी आशादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
यामुळे यंदा निवडक पाणवठ्यांवर पक्ष्यांची गर्दी होणार नाही, त्यामुळे पक्षीनिरीक्षकांना नवनवीन ठिकाणे शोधावी लागतील आणि परिणामी ठरावीक ठिकाणी पक्षी आणि मानव संघर्षसुद्धा कमी होण्याची संधी निसर्गाने उपलब्ध करून दिलेली आहे.आज तरी किमान सगळीकडे गवताने रान माखलेले असून, यात असंख्य कीटकांचे मिलन सुरू आहे. त्यामुळे ज्या जगात कीटकांची दुनिया भारी तिथे जैवविविधता जास्त वेगाने वाढते. आता फक्त गरज आहे लोकशिक्षणाच्या माध्यमातून पर्यावरण साक्षरता वाढविण्याची. नाही तर, आता नाहीतर पुन्हा कधीच नाही. कारण यापुढील काळात पर्जन्यमान समान पद्धतीने होईल असे वाटत नाही. त्यामुळे पडलेला पाऊस जास्तीत जास्त साठवून ठेवणे नितांत गरजेचे आहे. यासाठी सर्वात मोठा पर्याय म्हणजे हिरवाई.
आता आपल्याला फेबुवारी-मार्चमध्ये आग नियंत्रण रेषा आखणे बंधनकारक करणे गरजेचे आहे. यामुळे आपल्या भागातील जैवविविधता सुधारण्यास मदत होईल. साधारणपणे गेली १० ते १२ वर्षे दुष्काळाची झळा माणसाबरोबर सर्वच जीव सहन करत आहेत. अगदी जगातील ८०० कोटी लोकांची स्वप्ने विविध आहेत. मात्र पृथ्वी एकच आहे. म्हणून पाणी हा सर्वांच्या स्वप्नातील केंद्रबिदू मानला तरच पाणीसंवर्धन होईल आणि पाणीसंवर्धन करायचे असल्यास आपण फक्त पृथ्वीला हिरवाईचा शालू घालणे नितांत गरजेचे आहे.