शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

संपादकीय - जिनपिंगना हवा होता मोदींबरोबर ‘हसरा’ फोटो!

By विजय दर्डा | Updated: September 19, 2022 10:02 IST

शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत नरेंद्र मोदी हे शी जिनपिंग, शाहबाजना भेटले नाहीत, पुतीन यांच्याशी गळाभेटही घडली नाही! याचा अर्थ काय होतो?

विजय दर्डा

चीन आपल्या स्वभावानुसार धूर्तपणे चाल खेळला खरा; परंतु भारताला चकवा देण्यात त्याला यश आले नाही. भारतीय कूटनीतीच्या रथी- महारथींनी चीनच्या छुप्या इच्छेवर अखेर पाणी फिरवले, असेच म्हणावे लागेल. शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ)  बैठकीत भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर आपला एखादा तरी हसरा फोटो काढला जावा, त्यांच्यासोबत हास्यविनोद करतानाचा आपला एखाद दुसरा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल व्हावा, अशी चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांची इच्छा होती. 

आता प्रश्न असा पडेल, की शी जिनपिंग यांना असे का वाटले असावे? या प्रश्नावर चर्चा करण्याआधी शांघाय सहकार्य संघटना हे प्रकरण नक्की काय आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. आधी या संघटनेचे नाव ‘शांघाय ५’ असे होते आणि कझाकस्तान, चीन, किरगीजस्थान, रशिया आणि ताजकिस्तान हे या संघटनेचे सदस्य होते. २००१ मध्ये या संघटनेत उजबेकीस्थान सामील झाल्यानंतर त्याचे नाव शांघाय सहकार्य संघटना असे ठेवण्यात आले. २०१७ मध्ये भारत आणि पाकिस्तानही त्यात सामील झाले. शिक्षण, ऊर्जा, परिवहन, पर्यटन आणि पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रात एकमेकांशी सहकार्य वाढवण्याबरोबरच शांतता आणि सुरक्षा हेही या संघटनेचे उद्दिष्ट आहे; परंतु कमाल अशी की दस्तुरखुद्द चीनच या संघटनेतील  अन्य  देशांसाठी सर्वांत मोठा धोका झाला आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत चीन नेमकी कोणती चाल खेळणार होता, हेही महत्त्वाचे आहे. डोकलाममध्ये चीनबरोबर दीर्घकाळ चकमक झाल्यानंतर अचानक हे प्रकरण थंडावले. वास्तविक त्यावेळी चीनने ब्रिक्स संमेलन आयोजित केले होते आणि त्या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामील व्हावे, अशी चीनची इच्छा होती. यावेळीही चीनने हीच चाल खेळली.

१५ आणि १६ सप्टेंबरला समरकंद येथे शांघाय सहकार्य संघटनेची बैठक होणार होती आणि नऊ सप्टेंबरला अचानक बातमी आली की, भारतीय व चिनी लष्कर अधिकाऱ्यांच्या बैठकीत लडाखच्या पेट्रोल पॉइंट पंधरावर दोन्ही देशांच्या सैन्याने माघारीची तयारी दाखवली आहे. केवळ तीन दिवसांत सैन्य मागे घेण्याची चर्चाही सुरू झाली. जो चीन डझनावारी बैठका होऊनही एक इंचभरही मागे सरकायला तयार नव्हता, तो अचानक माघारीसाठी कसा तयार झाला? चीन भारताला आपल्या जाळ्यात फसवण्याची चाल खेळतो आहे, हे भारतीय कूटनीतीच्या चाणक्यांना समजायला अर्थातच वेळ लागला नाही!भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समरकंदमध्ये चिनी राष्ट्रपती शी जीनपिंग यांच्याबरोबरच्या भेटीला तयार व्हावे, यासाठी चीनने हे पाऊल उचलले होते. दोघांचे दोन- चार हसरे फोटो निघाले असते, तर चीन जगाला हे दाखवू शकला असता की, दोन्ही देशांमध्ये वादविवाद आणि तणाव  असले, तरी भारताशी चीनचे संबंध ठीकठाक आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांचा समावेश असलेल्या ‘क्वाड’ संघटनेचा भारत सदस्य आहे. याचा चीनला नेहमीच त्रास होत आला आहे. चीन एकीकडे भारताला धमक्या देतो आणि दुसरीकडे सगळे ठीकठाक असल्याचे दाखवू पाहतो. जेणेकरून भारताच्या नव्या मित्रांची फसगत व्हावी. 

जगाच्या विद्यमान परिस्थितीवर आपण नजर टाकली तर एक गोष्ट स्पष्ट होते, की चीनविषयी संपूर्ण जगात नाराजी वाढली आहे. तैवानच्या मुद्यावर अमेरिकेच्या भूमिकेतही कडकपणा आलेला दिसतो आहे. एकुणात गोळाबेरीज ही, की आपल्या उद्योगामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन खलनायकाच्या भूमिकेत गेला आहे. श्रीलंका आणि पाकिस्तानसह ४२ देशांना चीनने आपल्या कर्जाच्या जाळ्यात अडकवले आहे. कर्जात फसलेल्या देशांच्या साधनसामुग्रीवर चीन आता ताबा मिळवू पाहतो आहे. याच्या बरोबर उलट नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत जगभर चमकतो आहे. शक्तिमान देश होण्याच्या सर्व शक्यता भारतामध्ये दिसतात. चीनला हे नेमके कळते. म्हणून तो भारताला धोका देण्याचे, गुंगवण्याचे प्रयत्न करत राहतो. भारत आता १९६२ मधला देश राहिलेला नाही, हे चीनला पक्के ठाऊक आहे. त्यामुळे हल्ला करण्याचा विचार करणेही चीनला शक्य नाही. त्यामुळे चाली आणि धोकेबाजी हाच चीनसाठी एकमेव रस्ता उरतो. चीनची ही चाल भारताच्या पंतप्रधानांनी ओळखली. त्यामुळे जीनपिंग यांच्याशी काही भेट, बोलणे होण्याची शक्यताच नव्हती. 

चीनच्या इच्छेवर पाणी तर पडलेच. शिवाय जागतिक प्रश्नांवर भारताने जी स्पष्ट भूमिका घेतली त्याची चीनच काय; पण रशियानेही कल्पना केली नव्हती. पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज हेही तेथे होते; परंतु त्यांना भेटण्याचा प्रश्न तर कुठे दूरवरूनही दृष्टिपथात नव्हता. शांघाय सहकार्य संघटनेच्या या शिखर संमेलनात पंतप्रधान मोदींनी अत्यंत स्पष्ट शब्दांत पाकिस्तान आणि चीनवर उघड टीका केली. पुतीन यांच्याबरोबर झालेल्या संवादातही त्यांनी स्पष्ट सांगितले, की ही युद्धाची वेळ नव्हे! युक्रेनवरील हल्ल्यासंदर्भात चीन पूर्णपणे रशियाच्या बरोबर आहे, असे असताना मोदींनी घेतलेली भूमिका पुतीन यांनाही मोठा संदेश देणारी होती. जगभरातील माध्यमांमध्ये मोदींच्या या संदेशाची चर्चा होत आहे. आणखी एक ठळकपणे जाणवलेली बाब! यापूर्वी जेव्हा जेव्हा पुतीन यांच्याशी मोदींची भेट झाली, तेव्हा तेव्हा गळाभेट झाली! यावेळी मात्र या दोघांमध्ये संवाद झाला, तरी तशी गळाभेट झाली नाही. हाही भारतीय कूटनीतीचाच भाग होता का? - कदाचित!

एका छोट्या देशावर हल्ला करणाऱ्या देशाच्या राष्ट्रपतींशी आम्ही गळाभेट करणार नाही, हेच त्यातून भारताला सांगायचे होते! तूर्तास चीनची चाल असफल ठरली आहे. त्यामुळे चीन अर्थातच भडकलेला आहे. पुढचा धोका काय द्यावयाचा याच्या तयारीला चीन एव्हाना लागलाही असेल. आपल्याला सावध राहावे लागेल.

(लेखक लोकमत एडिटोरियल बोर्ड आणि लोकमत समुहाचे चेअरमन आहेत)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीXi Jinpingशी जिनपिंगchinaचीन