शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

न्यायाच्या प्रकाशापर्यंत पोहोचण्याची बिकट वाट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 03:55 IST

बालकांवरील लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये शेजारी, शिक्षक आणि सार्वजनिक जीवनात पालकांनी एकत्रित येऊन काळजी व लक्ष ठेवण्याची गरज भासत आहे.

- आ. डॉ. नीलम गो-हेबालकांवरील लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये शेजारी, शिक्षक आणि सार्वजनिक जीवनात पालकांनी एकत्रित येऊन काळजी व लक्ष ठेवण्याची गरज भासत आहे.लहान मुलांना या विषयाची अधिक माहिती झाल्यास त्यांच्यात बोलण्याचे धाडस येईल. बºयाचदा मुलांनी काही तक्रार केली तर, तुला काही कळत नाही, तू उगाच कुरकुर करतोस, असे सांगून त्याचा आवाज दडपण्याचा प्रकार दिसतो. त्यासोबत कुटुंबातील सदस्य गुन्हेगार असेल तर इतरांची त्याबाबत बोलण्याची हिंमत होत नाही. अशा गुंतागुंतीच्या प्रश्नात आपण धाडस, जागृती व मुलांच्या मनातील विश्वास जागवणे आवश्यक आहे.बाल लैंगिक शोषण प्रश्नासाठी पॉक्सोसारखा स्वतंत्र कायदा, तर जागतिक स्तरावरील उँ्र’ िफ्रॅँ३२ उङ्मल्ल५ील्ल३्रङ्मल्ल हा बालहक्क संरक्षणविषयक करार भारतात विविध कायद्यांच्या रूपाने लागू आहे. विधि संघर्षग्रस्त बालकांसाठी वेगळा कायदा आहे. मात्र अंमलबजावणीच्या यंत्रणा अत्यंत दुर्बल, संवेदनाहीन, मनुष्यबळाचा अभाव व आर्थिक असक्षमता आदी समस्यांनी जर्जर झालेल्या आहेत.त्याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे : बालहक्क आयोगावर या मुलांच्या सुरक्षेच्या विषयात काम करणाºया सामाजिक कार्यकर्त्यांच्या जिल्हानिहाय नेमणुका होणे, आयोगाच्या कार्यकक्षेत येणाºया बालकांना अधिकाधिक हक्क प्रदान करणे आणि आयोगाचे काम सुरळीत चालणे हे या दृष्टीने गरजेचे आहे. निवासी संस्थांमध्ये होणाºया शारीरिक व लैंगिक शोषणात अधिक सक्षमपणे कार्यवाही होणे अत्यावश्यक आहे. जिल्ह्यांच्या बाल कल्याण समिती सदस्यांच्या कार्याचे पुनरावलोकन व्हावे. त्यांची कार्यपद्धती आणि त्यातून अपेक्षित परिणाम साधला जातो किंवा नाही हे तपासण्याची आवश्यकता आहे. बालन्यायालये व त्यांची कार्यपद्धती अधिक सक्षम होणे व त्याद्वारे बालकांना न्याय मिळण्याची प्रक्रिया सोपी करणे याकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे.योग्य त्या न्यायाधीशांच्या नियुक्त्या, बाल न्यायालयांची मुलांना भीती न वाटता त्यातील वातावरण मैत्रीपूर्ण असणे, बाल गुन्हेगारांचे खºया अर्थाने पुनर्वसन होणे, जखमी बालकांना वैद्यकीय उपचार व समुपदेशन एकाच वेळी देणारी डल्ली र३ङ्मस्र उ१्र२्र२ उील्ल३१ी तयार करण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतीच याकरिता १५ कोटी ७५ लाख ५ हजार रुपये निधीची तरतूद केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात न्या. दीपक मिश्रा यांच्या सूचनांनुसार पीडित बालकांची साक्ष घेत असताना त्यांना आरोपीच्या पिंजºयात उभे करण्याऐवजी एका वेगळ्या खोलीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था केली आहे. त्यात आरोपींचे वकील न्यायाधीशांना प्रश्न विचारतात व न्यायाधीश मुलाला किंवा मुलीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रश्न विचारतात व बालक जे उत्तर देते, ते न्यायालयात ऐकता येते व दिसते. या पद्धतीमध्ये बालकाला आरोपी दिसत नाही. त्यामुळे ते मूल /मुलगी भयमुक्त वातावरणात साक्ष देते. ते स्वत: वास्तवात न्यायालयात हजर असते. त्यामुळे खटल्याच्या कामकाजात कायदेशीरदृष्ट्या कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होत नाही. आरोपींचे वकील जे प्रश्न विचारतात, त्याचा सूर व त्याचे हावभाव यामुळे मुलाला भेदरवून, घाबरवून, गोंधळवून, धमकावून प्रश्न विचारण्याची संधी राहत नाही. आरोपीच्या वकिलाचा प्रश्न न्यायाधीशांमार्फत मुलांकडे पोहोचतो. ही व्यवस्था महाराष्ट्रातील सर्वच न्यायालयांत सुरू करणे गरजेचे आहे, यासाठी चार्जशीट दाखल होऊन निकाल लागेपर्यंत बालक/बालिका आत्मविश्वास व संरक्षण कार्यक्रम ही संकल्पना माझ्या मनात असून बलात्कार, लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या व्यक्तीसाठी आणखी बºयाच उपाययोजना करण्याचा माझा संकल्प आहे.

(लेखिका : शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आणि अध्यक्षा, स्त्री आधार केंद्र, पुणे)