अध्यात्मएस. जे. आढावआधुनिक जीवनशैलीत असंख्य गोष्टींच्या वापरातून व निर्मितीतून कार्बनडाय आॅक्साईड वायूची (उड2) टक्केवारी वाढायला लागली, तर ग्लोबल वॉर्मिंगचा धोका तीव्र होतो. सध्या उड2 चे उत्सर्जन धोकादायक प्रमाणात वाढले आहे. ते होऊ नये यासाठी उऋछ दिवे वापरणे, गाड्यांचा वापर कमी करणे, वृक्षारोपण करणे, सोलर एनर्जीचा वापर करणे इ. अनेक उपाय, पर्याय उपलब्ध आहेत. अमेरिकेतील वॉलमार्ट शॉपिंग मॉलने केवळ १६ वस्तूंचे पॅकिंग कमी करून व बदलून २३० शिपिंग कंटेनर्सचा खर्च कमी केला. त्यामुळे ३५६ बॅरेल आॅईलचा वापर व ४ हजार वृक्षाची कत्तल होणे टळले. जगात आज अतिरेकी कारवाया, दंगली, बलात्कार, खून, पातके, द्वेष, सूड भावना इ.मुळे जीवनात पराकोटीची अशांतता, अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मानवाने पश्चात्ताप करून पातकाचा मार्ग सोडून देऊन प्रभू येशू ख्रिस्ताच्या ‘शेजाऱ्यांवर प्रीती कराच, परंतु आपल्या वैऱ्यावरही प्रीती करा,’ या शिकवणुकीनुसार चालल्यामुळे जगातील कलुषित वातावरण दूर होऊ शकेल. उड2 चे उत्सर्जन रोखण्यासाठी असंख्य पर्याय उपलब्ध आहेत; परंतु मानवाला नाशापासून वाचवण्यास ‘दया, क्षमा, शांती, प्रीती व मदत’ या प्रभू येशूंच्या पंचसूत्रीची आज गरज आहे. ***एका वयोवृद्ध स्त्रीच्या निधनानंतरच्या पवित्र मंदिरातील (चर्च) शेवटच्या उपासनेमध्ये त्यांच्याबद्दल उद्गार काढले गेले, की पवित्र शास्त्रात (बायबल) लूक १० मधील मार्था-मरीयेच्या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे प्रभू येशू येणार म्हणून मार्था ज्याप्रमाणे घराची स्वच्छता कर, भोजनाची व्यवस्था कर या कार्यात सतत मग्न होती. त्याप्रमाणे या वृद्ध बाईही सतत कार्यमग्न असायच्या. घरी कोणी पाहुणे आले, तर त्यांची चहाभोजनादी व्यवस्था त्या जातीने पाहायच्या. आपल्या बहीण-भावंडांची काळजी घ्यायच्या. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचीही व्यवस्था पाहायच्या. आपल्या नातवाला त्याचे आवडते पदार्थ तयार करून जेवणाचा डबा घेऊ न शाळेच्या मधल्या सुटीत बरेच अंतर चालत जाऊन त्याला जेवण खाऊ घालायच्या. प्रेषित पौलाने म्हटले आहे, की ज्याने त्याने आपल्या कुवतीनुसार सेवा करावी. कोणी संदेश द्यावा, कोणी व्यवस्था करावी. सर्वच संदेश (उपदेश) देऊ लागले व संदेष्टे झाले, तर काय होईल? कोणीतरी मार्था होऊन आपले कर्तव्य, काम करण्याचेही गरजेचे आहे. सर्वांनीच स्टेजवर मिरवायचे म्हटले, तर स्टेजमागील कामे, व्यवस्था कोण पाहणार? आज अशा ध्येयनिष्ठ, कामाला वाहून घेणाऱ्या सेवकांची समाजाला जास्त गरज आहे. एकच जीवित त्वरित सरेल, काम ते टिकेल परमेश्वरास्तव!
हवी दया, क्षमा, शांती, प्रीती व मदत
By admin | Updated: June 17, 2014 07:56 IST