शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काम नको, गोंधळच हवा! बाबासाहेब आंबेडकरांबद्दल विधान अन् भाजपा-काँग्रेसचे राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2024 08:36 IST

डाॅ. आंबेडकर यांचा दूरदृष्टिकाेन आता सत्यात उतरताे आहे, असे पदाेपदी जाणवू लागले आहे.

भारतीय राज्यघटनेला येत्या प्रजासत्ताकदिनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्त संसदेच्या दाेन्ही सभागृहांत राज्यघटनेवर चर्चा करण्यात येत आहे. खरे तर भारतीय राजकारण्यांना, विविध राजकीय पक्षांना ही एक उत्तम संधी चालून आली हाेती. जगातल्या सर्वाधिक माेठ्या लाेकशाही राष्ट्राचा प्रवास कसा हाेताे आहे, याचे मूल्यमापन करण्याची ही संधी हाेती. ती संधी सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते गमावून बसले आहेत. राज्यघटना तयार करणाऱ्या मसुदा समितीचे अध्यक्ष डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तेव्हाच इशारा दिला हाेता की, राज्यघटना उत्तम बनविण्याचा प्रयत्न केला असला, तरी ती अंमलात आणणारे राज्यकर्तेही तितके उत्तम किंबहुना राज्यघटनेचे मर्म जाणणारे असावे लागतात. 

डाॅ. आंबेडकर यांचा दूरदृष्टिकाेन आता सत्यात उतरताे आहे, असे पदाेपदी जाणवू लागले आहे. भारत स्वतंत्र हाेत असतानाची जागतिक राजकीय परिस्थिती आणि आताचे जग यामध्ये प्रचंड स्थित्यंतरे झाली आहेत. अशा पार्श्वभूमीवर राज्यघटनेच्या आधारे राष्ट्राचा कारभार चालविताना कल्याणकारी राज्य संकल्पनेला आकार देताना घ्यायच्या निर्णयांचे मूल्यमापन करण्याचीदेखील ही संधी हाेती. मात्र, अलीकडच्या काळात राज्यघटनेपासून ज्या महान नेत्यांनी देशाच्या उभारणीसाठी याेगदान दिले त्यांची टिंगलटवाळी करण्याची प्रथा पाडली जात असेल, तर राजकीय चर्चेची पातळी घसरणारच, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्याचे कारण नाही. संसदेच्या दुसऱ्या सभागृहात उत्तर प्रदेशातील सुलतानपूरचे प्रतिनिधित्व करणारे जनसंघाचे तत्कालीन तरुण प्रतिनिधी अटलबिहारी वाजपेयी यांचे भाषण ऐकून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना शाबासकी दिली हाेती. हा उमदेपणा काेठे हरवला आहे? वाजपेयी या देशाचे एक दिवस पंतप्रधान हाेतील, असेही ते म्हणाले हाेते. 

वैचारिक मतभेद असतानाहीही अशी सदिच्छेची भावना व्यक्त करण्यासाठी मनाचा माेठेपणा लागताे. १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार अल्पमतात आले हाेते. लाेकसभेतील चर्चेत भाग घेताना ते म्हणाले, राजकीय आघाड्या हाेतील, बिघडतील, सरकारे येतील, जातील; पण या देशाचे लाेकतंत्र अबाधित राहिले पाहिजे. नेहरू आणि वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा सांगणारे सत्ताधारी आणि विराेधी पक्षांचे आजचे वर्तन काय दर्शवित आहे? देशाच्या सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे पद सांभाळणारे अमित शाह यांनी बाेलताना संयमी भाषा वापरायला हवी हाेती. राज्यघटनेच्या अमृतमहाेत्सवानिमित्त चर्चा असेल, तर राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ज्यांना साऱ्या देशाने स्वीकारले आहे, त्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख वारंवार येणे अपेक्षित आहे. 

आंबेडकर यांनी राज्यघटना मांडताना काही इशारे पण दिले हाेते. धाेकेही अधाेरेखित केले हाेते. शिवाय राज्यकर्त्यांनी राज्यघटनेची अंमलबजावणी करताना काेणती काळजी घेणे आवश्यक आहे, याचा सूचनावजा सल्लाही त्यांनी दिला हाेता. तत्कालीन भारतीय समाजाची ही अतिउच्च मूल्ये स्वीकारण्याची मानसिकता हाेती का? याचे उत्तर नकारात्मकच येईल. अशा पार्श्वभूमीवर हाेणाऱ्या चर्चेत आंबेडकर आणि त्यांचे विचार, अपेक्षा हा केंद्रबिंदू असणारच आहे. तेव्हा आंबेडकर, आंबेडकर असा उल्लेख करण्याला अमित शाह यांना हरकत घेण्याचे काेणतेही कारण नव्हते. एखाद्या विषयाची मांडणी करताना भावना अनावर हाेऊ शकतात, त्यात एखादा शब्द मागे-पुढे हाेऊ शकताे, असे जरी गृहीत धरले, तर ती दुरुस्ती करण्याची संधी का घेऊ  नये? काेणाच्या भावनांना ठेच पाेहोचली असेल, तर दिलगिरी किंवा माफी मागण्याने माणूस लहान हाेत नाही. सत्ताधारी पक्षाला चुकीच्या वेळी पकडण्याची विराेधी पक्षांची जबाबदारीच असते. त्यांनी आपले कर्तृत्व पार पाडलेच पाहिजे. 

सत्ताधारी पक्षांना राज्यकारभार करण्याची जबाबदारी दिली आहे, तशीच जबाबदारी सत्तेवर अंकुश ठेवण्यासाठी विराेधकांवर जनतेने साेपविली आहे. याच्याऐवजी संसदेच्या प्रांगणात धक्काबुक्की करणे, आरडाओरडा करणे, धिंगाणा घालणे शाेभत नाही. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी या धक्काबुक्कीत जखमी झालेल्या संसद सदस्यांशी संपर्क करून विचारपूस केली. तशीच विचारपूस विराेधी नेत्यांची करून चहापानाला बाेलवायला आणि वादावर ताेडगा काढायला काय हरकत आहे? आंबेडकर यांच्यावरून सुरू झालेला वाद आता राज्यांच्या विधिमंडळात आणि जनतेपर्यंत पाेहोचला आहे. अशावेळी संयम दाखविणे चुकीला चूक म्हणण्याचे धाडसही दाखविणे आवश्यक असते. त्यातून समाज पुढेच जाताे.

 

टॅग्स :ParliamentसंसदBJPभाजपाcongressकाँग्रेस