शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात एका मांडवात दोन लग्नं होतील का?

By यदू जोशी | Updated: June 2, 2023 12:23 IST

लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक राज्यात एकाचवेळी होईल का, यावर सध्या राजकीय तर्कवितर्क सुरू आहेत. कोणाचे म्हणणे काय आहे?

यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

लोकसभा व विधानसभेची निवडणूक एकाचवेळी होईल असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना वाटत आहे. ‘‘एकावेळी झाली काय अन् न झाली काय, आम्हीच जिंकणार’’, असं भाजपचे माजी संकटमोचक गिरीश महाजन सांगत आहेत. हो माजीच. कारण आता मंत्री रवींद्र चव्हाण हे नवीन संकटमोचक बनत आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर हा बदल झालाय. शिंदे गटाचे संजय शिरसाट यांना मात्र निवडणुका एकावेळी होणार नाहीत, असं वाटतं.

लोकसभा अन् विधानसभेचं लग्न एकाच मांडवात होईल का, हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. दिल्लीतून माहिती अशी आहे की, तसं काही होण्याची शक्यता आजतरी दिसत नाही. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असे दोनच पर्याय लोकांसमोर असावेत आणि त्या परिस्थितीत मोदी कधीही उजवे ठरतील, असा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा विश्वास आहे. हिंदुत्व, राममंदिर, कलम ३७०, गरिबांसाठीच्या योजना, विकास अन् समान नागरी कायदा (संभाव्य) हे मुद्दे भाजपच्या झोळीत भरभरून मतं टाकतील. एकत्रितपणे सामोरे गेले तर या मुद्द्यांना राज्य सरकारचे यशापयश, उद्धव ठाकरेंना असलेली सहानुभूती, राज्यातील राजकारणाचे जातीय संदर्भ असे अनेक विषय चिकटतील व त्यातून लोकसभेला नुकसान होऊ शकते. लोकसभा आधी घेतली तर मोदी विरुद्ध राहुल असा सामना होईल; पण एकत्र निवडणूक झाली तर मोदी-शिंदे-फडणवीस विरुद्ध राहुल-शरद पवार-उद्धव ठाकरे-नाना पटोले अशी लढत होईल. प्रतिमांचा कॅनव्हास असा पसरट करणे भाजप श्रेष्ठींना मान्य नसेल. एकत्र लग्नात खर्च वाचतो हे खरं, पण दोन्ही वऱ्हाडांकडे सारखं लक्ष न दिल्यास रुसवेफुगवे होऊ शकतात.  

एकत्र निवडणूक झाली तर मोदींच्या प्रतिमेचा फायदा विधानसभेसाठीही होईल हा एक तर्क आहे; पण त्याचवेळी राज्यातील समीकरणांचा फटका लोकसभेला बसू शकतो. एक असाही मतदार आहे की जो लोकसभेला मोदी म्हणून भाजपला मत देतो; पण विधानसभेला त्याची पसंती महाविकास आघाडीला असू शकते. एकाचवेळी दोन्ही फड ठेवले तर त्याचा गोंधळ होईल अन् दोन्ही मतं तो महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकेल, अशी शक्यतादेखील आहे. दिल्लीला तसा गोंधळ नको आहे. राष्ट्रवादीला तेच हवं आहे; म्हणून तर अजित पवार बोलत आहेत. मुख्य म्हणजे, शिंदे-फडणवीस सहा महिने आधी सत्ता का सोडतील? १९९९ मध्ये तशी चूक करून एकत्र निवडणुका घेतल्या; पण राज्यातली सत्ता गेली होती. त्या चुकीची पुनरावृत्ती करतील, अशी शक्यता कमी. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात शिंदे-फडणवीस सरकार असणं आवश्यक असेल. सरकार असलं की पोलिस, प्रशासन हातात, शिवाय नवीन आश्वासनं आणि त्यांच्या  पूर्ततेची खात्री देता येते.

डबल की ट्रबल इंजिन? 

लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही शिंदे-फडणवीस यांच्यासाठी परीक्षा असेल. यश मिळाल्यास त्याचा फायदा लोकसभेला होईल. राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जादाचे देण्याचा निर्णय गेमचेंजर ठरू शकतो. डबल इंजिनचं सरकार राज्यात हवंच, हा भाजपचा प्रचार असतो. लोकसभेवेळी सत्तेत असल्यासच  तसा प्रचार अधिक प्रभावीपणे करता येईल. कर्नाटकमधील प्रचारात काँग्रेसने केलेल्या पाच लोकाभिमुख घोषणांचा फायदा झाला. 

महाराष्ट्रात दहा मोठी आश्वासनं देण्याची योजना काँग्रेस आखत आहे. त्या संभाव्य आश्वासनांमधील हवा आधीच काढून टाकण्यासाठी येत्या चार-पाच महिन्यात शिंदे-फडणवीस सरकारकडून मोठमोठ्या घोषणा केल्या जातील. मोदींच्या चरणी ४२ जागा अर्पण करणं याला शिंदे-फडणवीस यांचं सर्वोच्च प्राधान्य असेल. डबल इंजिन सरकारचे फायदे भाजपकडून सांगितले जातील. महाविकास आघाडीकडून डबल इंजिनच्या सरकारविरुद्ध ‘‘हे तर ट्रबल इंजिनचं सरकार’’, असा प्रचार केला जाईल. 

भाजपकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडी खूप पुढे असल्याचे दिसते म्हणतात. त्यामुळे ही एकत्रित निवडणुकीची जोखीम घेण्याच्या मूडमध्ये भाजप नाही. निवडणूक जिंकणं हे शहरांची नावं बदलण्याइतकं सोपं थोडीच आहे?

स्फोट होईल; पण कुठे? 

महाविकास आघाडी अभेद्य असणं ही भाजपची सर्वात मोठी डोकेदुखी! त्यामुळे त्यात फूट पाडण्याची रणनीती आखली जात आहे. काही नेते नजीकच्या काळात भाजपच्या गळाला लागू शकतात. निरोपानिरोपी सुरू आहे. पहाटेचा शपथविधी झाला तसं पहाटेचं पक्षांतर होऊ शकतं. शिंदे गटाचे अनेक आमदार, खासदार संपर्कात आहेत; लवकरच मोठा स्फोट होईल, असा दावा ठाकरे गट करीत असला तरी ती पुडी आहे. स्वत:चे उरलेले आमदार, खासदार वाचवण्यासाठीची ही धडपड दिसते. उद्धव ठाकरे सध्या सहकुटुंब परदेशात आहेत. ते परतल्यानंतर त्यांच्या गटात आणखी स्फोट करण्याची तयारी मुख्यमंत्री शिंदे करत आहेत. 

परवा देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना भेटले अन् भाजप-शिवसेना-मनसे चर्चा सुरू झाली. तसं काहीही होणार नाही. मनसेविरोधात लढणं भाजपच्या अधिक हिताचं असेल. त्यानुसारच स्क्रिप्ट लिहिली जात आहे. भाजपच्या विजयाची ब्लू प्रिंट फडणवीस तयार करत आहेत, त्यात राज ठाकरे यांचा रोल ठरवला जात आहे. अर्थात राज गळाला लगेच लागतील इतके सोपे नाहीत.. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा सुरूच राहील!

टॅग्स :Electionनिवडणूकlok sabhaलोकसभाvidhan sabhaविधानसभा