शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जित केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 06:03 IST

नाणार प्रकल्पाला आमचा सुरुवातीपासूनच तीव्र विरोध आहे. कोकण किनारपट्टीवर असे प्रदूषणकारी प्रकल्प नको, असे घातक प्रकल्प येणे हे मुळातच चुकीचे आहे.

- विनायक राऊतनाणार प्रकल्पाला आमचा सुरुवातीपासूनच तीव्र विरोध आहे. कोकण किनारपट्टीवर असे प्रदूषणकारी प्रकल्प नको, असे घातक प्रकल्प येणे हे मुळातच चुकीचे आहे. सुरुवातीला हा प्रकल्प देशाचा आहे असे सांगण्यात आले. मात्र या प्रकल्पात ५० टक्के भागीदारी सौदी अरेबियाच्या आरामको कंपनीची आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण कोकण किनारपट्टी सौदी अरेबियाला आंदणदेण्याचा सरकारचा डाव आहे. तोआम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही.रिफायनरीचा अभ्यास केल्यावर त्याचे दुष्परिणाम समोर येत आहेत. सरकारने ग्रीन रिफायनरी असल्याचा दावा केला व कितीही अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले तरी त्याचे व्हायचे ते दुष्परिणाम होणारच आहेत. अणुऊर्जा, रिफायनरी प्रकल्पासहित १७ प्रदूषणकारी प्रकल्प कोकणात आले आहेत. अणुऊर्जा प्रकल्पाच्या ५० किमी परिघात कोणतेही प्रकल्प येऊ नयेत, असा नियम आहे. प्रत्यक्षात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पापासून नाणार रिफायनरी प्रकल्प अवघ्या ५ किमी. अंतरावर आहे. नियमांची पायमल्ली करून प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आम्ही कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही. हे प्रकल्प कोकणच्या विकासासाठी आणण्याचा दावा केला जात असला तरी त्यामधून कोकणचा विकास होण्याऐवजी भकास होण्याचीच शक्यता आहे.स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधाची दखल सरकारने घेण्याची गरज आहे. भूमी अधिग्रहण कायद्याप्रमाणे ७० टक्के प्रकल्पग्रस्तांची परवानगी आवश्यक आहे. याबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारला हमीपत्र दिले आहे. मात्र या प्रकल्पामधील बहुसंख्य नागरिकांचा विरोध असतानाही सरकार प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारला स्थानिक नागरिकांच्या हिताऐवजी पक्षीय स्वार्थ महत्त्वाचा वाटत आहे. सरकारचे देणेघेणे केवळ सौदी अरेबियाच्या कंपनीशी आहे. कंपनीला देशाने ५० टक्के भागीदारी दिली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून २ लाख ७३ हजार कोटी भारतीय चलन दरवर्षी सौदी अरेबियाला जाणार आहे. त्यामुळे आमचा या प्रकल्पाला विरोध आहे.कोकणी माणसाला देशोधडीला लावणाऱ्या कोणत्याही विकास प्रकल्पाची कोकणवासीयांना अजिबात गरज नाही. विकासाच्या नावावर कोकणी नागरिकांना विस्थापित करण्याचा हा प्रयत्न आहे व हा प्रयत्न शिवसेना अजिबात खपवून घेणार नाही. नाणार प्रकल्पाला स्थानिक जनतेचा एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोध होत असतानाही समन्वयाची भूमिका घेण्याची तयारी मुख्यमंत्री दाखवत नाहीत. मुख्यमंत्री दिल्लीतील त्यांच्या हायकमांडच्या इच्छेप्रमाणे मान डोलवून प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न करत आहेत.कोकण किनारपट्टीला नैसर्गिक सौंदर्य लाभलेले आहे. कोकणाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग असल्यास नागरिकांनी त्याचे स्वागत केले असते. मात्र स्थानिकांना गावाबाहेर काढणाºया या प्रकल्पाला नागरिक समर्थन देतील, असा विचार करणेही चुकीचे आहे. स्थानिक खासदार म्हणून या परिसरात फिरताना या प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिकांच्या भावना किती तीव्र आहेत याची जाणीव मला आहे. शिवसेनेने नेहमीच त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. कोकणला भकास करणाºया कोणत्याही प्रकल्पाला कोकणी माणूस पाठिंबा देणार नाही, याची दखल सरकारने घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी कोणतीही भूमिका घेतली तरी नाणार रिफायनरीला विसर्जित करेपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणारनाही.(लेखक हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.)

टॅग्स :Nanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पnanar refinery projectनाणार प्रकल्प