शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 14:52 IST

मुले-तरुणांच्या आत्महत्यांमागील कारणे अनेक आहेत. मात्र प्रश्न आहे तो, या सामाजिक समस्येतून सुटका कशी मिळवायची? महाराष्ट्रात ‘विवेक वाहिनी’ युवक चळवळीने युवा मानस मैत्री अभियान हाती घेऊन आयुष्याची पणती

धर्मराज हल्लाळे

आईने डोक्याला जास्त तेल लावले म्हणून मुलीची आत्महत्या... पालकांनी मोबाईल गेम खेळू दिला नाही म्हणून मुलाची आत्महत्या... या ताज्या घटना मन सुन्न करणाºया आहेत. देशभरात दरवर्षी लाखावर आत्महत्या होतात. त्यातील ५० टक्के आत्महत्या या १५ ते ३५ वयोगटातील आहेत. ज्यांनी आपले परिपूर्ण आयुष्यही पाहिले नाही, ती चिमुकली मुले, तरुण शेवटचा मार्ग अनुसरतात, हे चिंताजनक आहे.  

मुले-तरुणांच्या आत्महत्यांमागील कारणे अनेक आहेत. मात्र प्रश्न आहे तो, या सामाजिक समस्येतून सुटका कशी मिळवायची? महाराष्ट्रात ‘विवेक वाहिनी’ युवक चळवळीने युवा मानस मैत्री अभियान हाती घेऊन आयुष्याची पणती जपून ठेवण्याचा जागर सुरू केला आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हमीद दाभोळकर यांच्या पुढाकारातून मानसमित्र घडत आहेत. ज्यावेळी सर्वसाधारण कारणांमुळे मुले आपला जीव देतात, त्यावेळी समाजमन हादरते. इतकेच नव्हे, मुलांच्या आत्महत्येमागची कारणे प्रत्येक जण आपल्या घरात शोधू लागतो. एवढ्याशा गोष्टीसाठी त्या मुलाने अथवा मुलीने टोकाचे पाऊल का उचलले, हा प्रश्न प्रत्येक पालकाला सतावतो. परंतु यातून मार्ग कसा काढायचा, हे सूचत नाही. रागावले तर टोकाची भूमिका, समजावून सांगितले तर ऐकत नाही, या कोंडीमध्ये पालक वर्ग सापडला आहे. अशावेळी युवा मानस मैत्री अभियान दिलासा देणारे ठरणार आहे. त्याची सुरुवात म्हणून राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये ५० महाविद्यालयात युवक कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण झाले. निश्चितच विवेक वाहिनी, डॉ. हमीद दाभोळकर यांचे प्रयत्न स्तुत्य आहेत. परंतु प्रश्न आहे तो, व्यापक पातळीवर हा विषय मांडण्यासाठी शासन आणि समाजाचा सहभाग कितपत आहे व राहील? विद्यार्थी, तरुणाच्या आत्महत्या झाल्या की काही काळ चर्चा होते. प्रश्न मांडले जातात. परंतु या समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न होत नाही; किंबहुना या प्रश्नावर नियंत्रण प्रस्थापित करणारी यंत्रणा अस्तित्वात नाही. मुलांना येणारे ताणतणाव नेमके कोणत्या स्वरुपाचे आहेत? स्पर्धा, वाढत्या वयानुसार आकर्षण, प्रेम, नैराश्य या विषयावर बहुतेक कुटुंबात बोलण्याची सोय नाही. काही उदाहरणांमध्ये पालक आणि मुलांत विसंवाद आहे. नेमकी ही अडचण युवा मानस मैत्री अभियानाने जाणली आहे. प्रशिक्षित युवक कार्यकर्ते विद्यार्थ्यांना समजावून सांगतील की, मन म्हणजे काय? शरीर जसे आजारी पडते तसे मनही आजारी पडते. त्यासाठी पहिली पायरी संवाद आहे. गरजेनुसार समुपदेशन आणि त्याही पुढे जाऊन मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आजही मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणे म्हणजे वेगळ्या भावनेने बघितले जाते. एकंदर ही सामाजिक दृष्टी बदलविण्याची गरज आहे. 

वर्षभरात एक हजार मानस मित्र-मैत्रीण तयार करण्याचा निर्धार युवा मानस मैत्री अभियानाने केला आहे. सोशल मीडियाकडे तरुणांचा असलेला ओढा लक्षात घेऊन त्याद्वारेही हे अभियान चालविले जाणार आहे. याच धर्तीवर काम करणाºया व्यक्ती, संस्था आहेत. त्यांच्या प्रयत्नांना सरकारी यंत्रणेने बळ दिले पाहिजे. विशेषत: शालेय व उच्च शिक्षण खात्याने शाळा, महाविद्यालयांमध्ये या उपक्रमांचा अधिकृत समावेश केला पाहिजे. विवेक वाहिनीसारख्या संस्थांना सोबत घेऊन आत्महत्येसारख्या गंभीर प्रश्नावर, शासनाने गांभीर्याने यंत्रणा राबविली तर येणाºया काळातील चित्र अधिक आशादायी बनेल. शाळा-महाविद्यालयात नानाविध उपक्रम राबविण्यासाठी सरकार रोज नवनवीन परिपत्रके जारी करते. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना जीवनाधार देणारा एखादा आणखी एक निर्णय का घेऊ नये?

टॅग्स :Suicideआत्महत्या