शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 14:52 IST

मुले-तरुणांच्या आत्महत्यांमागील कारणे अनेक आहेत. मात्र प्रश्न आहे तो, या सामाजिक समस्येतून सुटका कशी मिळवायची? महाराष्ट्रात ‘विवेक वाहिनी’ युवक चळवळीने युवा मानस मैत्री अभियान हाती घेऊन आयुष्याची पणती

धर्मराज हल्लाळे

आईने डोक्याला जास्त तेल लावले म्हणून मुलीची आत्महत्या... पालकांनी मोबाईल गेम खेळू दिला नाही म्हणून मुलाची आत्महत्या... या ताज्या घटना मन सुन्न करणाºया आहेत. देशभरात दरवर्षी लाखावर आत्महत्या होतात. त्यातील ५० टक्के आत्महत्या या १५ ते ३५ वयोगटातील आहेत. ज्यांनी आपले परिपूर्ण आयुष्यही पाहिले नाही, ती चिमुकली मुले, तरुण शेवटचा मार्ग अनुसरतात, हे चिंताजनक आहे.  

मुले-तरुणांच्या आत्महत्यांमागील कारणे अनेक आहेत. मात्र प्रश्न आहे तो, या सामाजिक समस्येतून सुटका कशी मिळवायची? महाराष्ट्रात ‘विवेक वाहिनी’ युवक चळवळीने युवा मानस मैत्री अभियान हाती घेऊन आयुष्याची पणती जपून ठेवण्याचा जागर सुरू केला आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हमीद दाभोळकर यांच्या पुढाकारातून मानसमित्र घडत आहेत. ज्यावेळी सर्वसाधारण कारणांमुळे मुले आपला जीव देतात, त्यावेळी समाजमन हादरते. इतकेच नव्हे, मुलांच्या आत्महत्येमागची कारणे प्रत्येक जण आपल्या घरात शोधू लागतो. एवढ्याशा गोष्टीसाठी त्या मुलाने अथवा मुलीने टोकाचे पाऊल का उचलले, हा प्रश्न प्रत्येक पालकाला सतावतो. परंतु यातून मार्ग कसा काढायचा, हे सूचत नाही. रागावले तर टोकाची भूमिका, समजावून सांगितले तर ऐकत नाही, या कोंडीमध्ये पालक वर्ग सापडला आहे. अशावेळी युवा मानस मैत्री अभियान दिलासा देणारे ठरणार आहे. त्याची सुरुवात म्हणून राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये ५० महाविद्यालयात युवक कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण झाले. निश्चितच विवेक वाहिनी, डॉ. हमीद दाभोळकर यांचे प्रयत्न स्तुत्य आहेत. परंतु प्रश्न आहे तो, व्यापक पातळीवर हा विषय मांडण्यासाठी शासन आणि समाजाचा सहभाग कितपत आहे व राहील? विद्यार्थी, तरुणाच्या आत्महत्या झाल्या की काही काळ चर्चा होते. प्रश्न मांडले जातात. परंतु या समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न होत नाही; किंबहुना या प्रश्नावर नियंत्रण प्रस्थापित करणारी यंत्रणा अस्तित्वात नाही. मुलांना येणारे ताणतणाव नेमके कोणत्या स्वरुपाचे आहेत? स्पर्धा, वाढत्या वयानुसार आकर्षण, प्रेम, नैराश्य या विषयावर बहुतेक कुटुंबात बोलण्याची सोय नाही. काही उदाहरणांमध्ये पालक आणि मुलांत विसंवाद आहे. नेमकी ही अडचण युवा मानस मैत्री अभियानाने जाणली आहे. प्रशिक्षित युवक कार्यकर्ते विद्यार्थ्यांना समजावून सांगतील की, मन म्हणजे काय? शरीर जसे आजारी पडते तसे मनही आजारी पडते. त्यासाठी पहिली पायरी संवाद आहे. गरजेनुसार समुपदेशन आणि त्याही पुढे जाऊन मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आजही मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणे म्हणजे वेगळ्या भावनेने बघितले जाते. एकंदर ही सामाजिक दृष्टी बदलविण्याची गरज आहे. 

वर्षभरात एक हजार मानस मित्र-मैत्रीण तयार करण्याचा निर्धार युवा मानस मैत्री अभियानाने केला आहे. सोशल मीडियाकडे तरुणांचा असलेला ओढा लक्षात घेऊन त्याद्वारेही हे अभियान चालविले जाणार आहे. याच धर्तीवर काम करणाºया व्यक्ती, संस्था आहेत. त्यांच्या प्रयत्नांना सरकारी यंत्रणेने बळ दिले पाहिजे. विशेषत: शालेय व उच्च शिक्षण खात्याने शाळा, महाविद्यालयांमध्ये या उपक्रमांचा अधिकृत समावेश केला पाहिजे. विवेक वाहिनीसारख्या संस्थांना सोबत घेऊन आत्महत्येसारख्या गंभीर प्रश्नावर, शासनाने गांभीर्याने यंत्रणा राबविली तर येणाºया काळातील चित्र अधिक आशादायी बनेल. शाळा-महाविद्यालयात नानाविध उपक्रम राबविण्यासाठी सरकार रोज नवनवीन परिपत्रके जारी करते. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना जीवनाधार देणारा एखादा आणखी एक निर्णय का घेऊ नये?

टॅग्स :Suicideआत्महत्या