शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला तेव्हाच का बाहेर नाही काढले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 00:38 IST

भारतीय संसदेने अलीकडेच संमत केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशातील काही

कुमार बडदे

आम्ही इतकी वर्षे इथे राहतो. आमचे तारुण्य येथे गेले, आमची मुले इथेच मोठी झाली, आमच्या घरातील वडीलधारे याच मातीत मिसळले. आता सरकार आमच्याकडे नागरिकत्वाचे पुरावे मागणार का? आता सरकार आम्हाला या देशाचे नागरिक नसल्याने बाहेर काढणार का? ज्यावेळी आम्ही येथे आलो, तेव्हाच आम्हाला शोधण्यात अपयशी ठरलेल्या शासकीय यंत्रणाची काहीच चूक नाही का? असा सवाल केला आहे मुश्ताक (नाव बदलले आहे) याने. हे सरकारचे अपयश आहे. आमची मते घेतली तेव्हा आमचे मूळ तुमच्या डोळ्यांत खुपले नाही का? असा सवालही मुश्ताकने केला.

भारतीय संसदेने अलीकडेच संमत केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशातील काही राज्यांत हिंसक किंवा लोकशाही मार्गाने आंदोलने सुरू आहेत. यातील काही आंदोलनांनी हिंसक पाऊल उचलल्याने जाळपोळ, दगडफेक सुरू झाली आहे. या कायद्याविरोधात बुधवारी मुंब्य्रातदेखील विशाल मोर्चा काढण्यात आला होता. यात सहभागी झालेल्या व सध्या देशाचे पण मूळ बांगलादेशी नागरिक असलेल्या काहींशी संपर्क साधला असता, त्यातील अनेकांनी सध्या सुरू असलेल्या नागरिकत्व कायद्याच्या गदारोळावर सुरुवातीला बोलण्यास नकार दिला. काहींनी आपण मूळचे बांगलादेशी असल्याचे कबूल करण्यास इन्कार केला. मात्र, विश्वासात घेतल्यावर त्यापैकी एक-दोघांनी आपल्या मनातील संतापाला वाट मोकळी करून दिली. अर्थात, कुणी हा त्यांच्यावरील अन्याय असल्याचे मान्य करील तर कुणी त्यांचा हा आक्रमक पवित्रा म्हणजे ‘उल्टा चोर कोतवाल को डांटे’ या पद्धतीचा असल्याचे म्हणेल. याबाबत तलाह मंडल या मध्यमवयीन पुरु षाने सांगितले की, बांगलादेशातील बेरोजगारी, दोन वेळेला पोटभर अन्न मिळवण्यासाठी होत असलेली ओढाताण यामुळे त्याने भारतामध्ये येण्याचा निर्णय घेतला. आठ वर्षांपूर्वी गनिमी कावा पद्धतीने देशात प्रवेश केल्याची माहिती त्याने दिली. अशा पद्धतीने देशात येत असलेल्या त्याच्या अन्य समाजबांधवांना त्रास होऊ नये, यासाठी देशात प्रवेश करताना कुठल्या पद्धतीचा वापर केला, त्याबद्दल सविस्तर सांगण्यास मात्र त्याने नकार दिला. मात्र पैसा सब जगह काम कर जाता है, असे सूचक विधान मंडल याने केले.येथे आल्यानंतर कुणालाही तो बांगलादेशी असल्याचा संशय येऊ नये म्हणून यापूर्वी देशात दाखल झालेल्या बागलादेशींप्रमाणे त्याने मध्यम किंवा उच्चभू वसाहतीमध्ये न राहता झोपडपट्टीमध्ये राहण्याचे ठरवले. मी माझ्या कुटुंबासमवेत ज्या झोपडपट्टीत राहिलो तेथे असंख्य समस्या त्यावेळी होत्या व आजही आहेत. बांगलादेशात जे हलाखीचे जीणे जगत होतो तसेच जीणे येथेही सुरुवातीला माझ्या नशिबी आले. मात्र फरक एवढाच होता की, येथे माझ्या हाताला काम मिळण्याची शाश्वती होती. ‘ये पापी पेट नही होता तो इतनी बडी मुसीबत मोड के यहां नही आता’, मंडल म्हणाला. तेथे थोडे स्थिरावल्यानंतर माझ्याअगोदर व नंतर आलेल्या जातबांधवांशी संपर्क साधून मोलमजुरी, बांधकाम व्यवसायात रोजंदारी, फळ व भाजीविक्री अशी कामे करून स्थिरस्थावर झालो. मात्र आता नागरिकत्व सुधारणा कायद्यानंतर पुन्हा अस्थिरतेची भीती वाटू लागली आहे. माझे आता बांगलादेशसोबत नाते राहिलेले नाही. हाच देश माझे पोट भरत आहे, असे मंडल म्हणाला. दुसऱ्या एकाने नाव न छापण्याच्या अटीवर त्यांच्या येथे वास्तव्य करण्याच्या पद्धतीची अत्यंत स्फोटक माहिती दिली. तो म्हणाला की, आम्ही मूळ बांगलादेशी आहोत. परंतु सध्या पोटापाण्याकरिता येथे राहत असल्याने आमच्यापैकी बहुतेकांकडे भारतीय नागरिकांप्रमाणेच शिधापत्रिका, आधारकार्ड इतकेच काय छोटामोठा व्यवसाय करणाऱ्यांकडे पॅनकार्ड आहेत. ते बनवण्याकरिता स्थानिक दलालांनी आम्हाला मोलाची मदत केली आहे. आम्हाला मदत करणारे ते भारतीय नागरिक आहेत. त्या दलालांना पैसा हवा होता. आम्ही ज्या वस्तीत वास्तव्य करतो तेथून विजयी होणाºया लोकप्रतिनिधींना मते हवी होती. त्यामुळे त्यांनी आम्हाला सहजगत्या हे पुरावे उपलब्ध करून दिले. मात्र सुधारित नागरिकत्व कायद्यानुसार नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी वरील शासकीय कागदपत्रांखेरीज इतर काही कागदपत्रांची मागणी पुरावा म्हणून करण्यात येणार असल्यामुळे आमच्यापैकी अनेकांना ते भारतीय नागरिक असल्याचे सिद्ध करताना अडचणी येणार आहेत. त्यामुळे आमचे भवितव्य टांगणीला लागले आहे. आम्ही आता येथे स्थिरावलो आहोत. आम्ही येथे चाळीत, झोपडपट्ट्यांत इतकेच काय इमारतीत घरे घेतली आहेत. आमची हीच कागदपत्रे पाहून आम्हाला येथील वित्तसंस्थांनी कर्जं दिली आहेत. कुणी खाजगी कर्ज काढली आहेत. आता अचानक जर कुणी आम्हाला तुम्ही या देशाचे नागरिक नाही, त्यामुळे चालते व्हा म्हणाले तर आम्ही काय करायचे? आमची मते घेऊन निवडून आलात आणि आता आमच्याच मुळावर उठता? त्यामुळे हा जाचक कायदा रद्द झाला पाहिजे. यावर तोडगा निघेल, असा आत्मविश्वास त्याने व्यक्त केला.

मूळचे बांगलादेशी असलेल्या या कुटुंबातील स्त्रिया बाजारपेठांमध्ये फिरताना शक्यतो त्यांच्या ओळखीच्या आणि बांगलादेशी जातबांधव असलेल्या स्त्रियांव्यतिरिक्त इतर स्त्रियांशी बोलत नाहीत. बांगलादेशी पुरु ष कटाक्षाने त्यांचे बांधव ज्या सलूनमध्ये केस कापण्याचे काम करतात, त्याच सलूनमध्ये केस कापण्यासाठी अथवा दाढी करण्यासाठी जातात. अनेक बांगलादेशी स्त्रिया येथे वेश्या व्यवसाय किंवा डान्स बारमध्ये काम करतात, असेही त्याने मान्य केले. काही बांगलादेशी तरुणींनी येथील स्थानिक तरुणांसोबत विवाह केल्याचेही त्याने सांगितले. आम्ही बांगलादेशी असल्याने जरी आमच्याकडे आधारकार्ड, रेशनकार्ड असले तरी सतत एक असुरक्षिततेची, भीतीची छाया आमच्यावर असते. नागरिकत्व सुधारणा विधेयकाने आमची झोप उडवली आहे.काहींनी आपण मूळचे बांगलादेशी असल्याचे कबूल करण्यास इन्कार केला. मात्र, विश्वासात घेतल्यावर त्यापैकी एकदोघांनी आपल्या मनातील संतापाला वाट मोकळी करून दिली. अर्थात, कुणी हा त्यांच्यावरील अन्याय असल्याचे मान्य करील तर कुणी त्यांचा हा आक्रमक पवित्रा म्हणजे ‘उल्टा चोर कोतवाल को डांटे’ या पद्धतीचा असल्याचे म्हणेल.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBangladeshबांगलादेशRohingyaरोहिंग्या