शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

क्रूरकर्मा हुकूमशहा किम जोंग यांच्यावर माफी मागण्याची वेळ का आली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 01:45 IST

तर माफी मागायची वेळ मुळात आलीच का?

हे आक्रित घडलं कसं? याचं जगभरात सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं आहे. मुळात आश्चर्य म्हणण्यापेक्षा सुखद धक्का. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी चक्क माफी मागत दिलगिरी व्यक्त केली आहे. हुकूमशहा, क्रूरकर्मा आणि विरोधकांना अतिशय भयंकर शिक्षा देऊन त्यांचा थेट नायनाटच करण्याची ख्याती असलेले उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग यांनी ‘सॉरी’ म्हणणं ही काही लहानसहान गोष्ट नव्हे. मात्र मुळात स्वत:ला सर्वशक्तिमान म्हणवणाऱ्या आणि ज्याच्याविषयी शेकडो आख्यायिका आहेत त्या नेत्यावर माफी मागण्याची वेळ का यावी? मुळात किम जोंगही ‘माफी’ मागू शकतात, हा दिवस उगवलाच कसा, यावरच जगभर चर्चा आहे. त्यानिमित्तानं सोशल मीडियातही विनोद, मिम्स फिरु लागले आहेत. मात्र त्यानिमित्तानं का होईना एक आशेचा किरण दिसतो आहे की, निदान कोरोना काळात तरी ‘संवादाला’ जागा शिल्लक ठेवावी असं किम जोंग यांनाही वाटलं हेच किती महत्त्वाचं आहे.

तर माफी मागायची वेळ मुळात आलीच का?दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्या सीमांवर नेहमीच चोख बंदोबस्त असतो. तणावही असतो. उत्तर कोरियातून दक्षिण कोरियात पळून जाण्याचा प्रयत्न करणारेही काहीजण सापडतात. मात्र आता कोरोनाकाळात उत्तर कोरियानं ठरवलं की, दक्षिण कोरियातून कुणीही उत्तर कोरियात येता कामा नये. तसं कुणी बेकायदा येताना दिसलं तर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश सैन्याला देण्यात आले. सरकारी सेवेत असलेल्या एका ४८ वर्षीय दक्षिण कोरियन व्यक्तीला उत्तर कोरियाच्या सैनिकांनी मारलं, पेटवून दिलं आणि समुद्रात फेकून दिलं असा आरोप दक्षिण कोरियाने केला.संबंधित व्यक्ती सागरी आणि मत्स्य मंत्रालयात काम करत असल्याचं दक्षिण कोरियाचं म्हणणं आहे. संबंधित व्यक्ती ही कर्तव्य बजावत होती आणि त्याकाळात दोन्ही देशांच्या सागरी सीमेवर ही घटना घडली. त्यातून दक्षिण कोरियन जनतेत मोठा असंतोषही निर्माण झाला. विशेष म्हणजे दक्षिण कोरियाने आरोप करताच उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग यांच्या कार्यालयाने, सेउलला अर्थात दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांना पत्र पाठवलं आणि त्या पत्रात स्पष्ट केलं की, या घटनेविषयी मी खेद आणि दिलगिरीही व्यक्त करतो. मुख्य म्हणजे उत्तर कोरियाने हे मान्य केलं की त्या व्यक्तीला उत्तर कोरियाच्या सैनिकांनीच मारलं. ‘आमच्या देशाकडून, सैनिकांकडून चूक झाली. मी माफी मागतो’, हे किम जोंग यांनी म्हणणं, जगजाहीर मान्य करणं हेदेखील या साºया घटनाक्रमात चकीत करणारं आहे. २००८ सालीही दोन देशांच्या समुद्री सीमेवर अशीच घटना घडली होती. दक्षिण कोरियन पर्यटक महिलेला उत्तर कोरियन गार्डसनी गोळ्या घातल्या होत्या, त्यावेळी मात्र त्यांनी या घटनेच्या संयुक्त चौकशीलाही नकार दिला होता.

मग यावेळी माफी मागावी असं किम जोंग यांना का वाटलं असेल?- तर त्याची कारणं दोन असावीत, एक म्हणजे झाल्या घटनेमुळे जगभर त्यांची बदनामी झाली. कोरोना केसेस दडपणे, किंवा जगाला आकडेवारीच न सांगणे या साºयामुळे जगभराचा रोष त्यांना पत्करावाच लागत आहे. अर्थात, त्यांनी जगाची पर्वा कधीही केली नाही. मात्र आता याकाळात त्यांना दक्षिण कोरियन जनतेचा रोष पत्करण्याची इच्छा दिसत नाही. तो सामूहिक क्षोभ शांत व्हावा, दक्षिण कोरियाशी संवाद सुरूठेवण्याची इच्छा आहे असं किमान जगाला आणि दक्षिण कोरियन लोकांनाही दिसावं म्हणून हे माफीपत्र पाठवलं गेलं असावं.त्याहून महत्त्वाचं कारण म्हणजे १० आॅक्टोबरला एक भव्य सैनिकी परेड करायचे किम जोंग यांनी ठरवलं आहे. त्याची जोरदार तयारीही सुरूआहे. सत्ताधारी वर्कर्स पार्टीचा त्यादिवशी ७५वा वर्धापनदिन आहे. त्याचं भव्य आयोजन, जोरदार सैन्य शक्तिप्रदर्शन किम जोंग करणार आहेत.त्याकाळात शेजारी देशाशी तणाव नको म्हणून ‘दिलगिरी’ व्यक्त करण्यात आली असावी अशीही चर्चा आहे. मात्र तरीही किम जोंगसारखा हुकूमशहा, ‘माफी’ मागतो, हेच कोरोनाकाळात पुरेसं बोलकं आणि वेगळं आहे, हे मात्र नक्की ! 

टॅग्स :South Koreaदक्षिण कोरियाKim Jong Unकिम जोंग उन