शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

गांधी मरत का नाही ?

By admin | Updated: February 16, 2016 03:08 IST

विलक्षण प्रेम आणि आत्यंतिक द्वेष हे दोन्ही अनुभव जिवंतपणी ज्यांच्या वाट्याला यायचे त्या महात्मा गांधींची मृत्यूनंतरही यातून सुटका होत नाही.

विलक्षण प्रेम आणि आत्यंतिक द्वेष हे दोन्ही अनुभव जिवंतपणी ज्यांच्या वाट्याला यायचे त्या महात्मा गांधींची मृत्यूनंतरही यातून सुटका होत नाही. राग-लोभाच्या कचाट्यात गांधी आजही असतो. त्याच्या जगण्याची तऱ्हा, त्याची उपोषणे काहींच्या श्रद्धेचे तर काहींच्या निंदानालस्तीचे विषय असतात. कुठल्यातरी कारणाने, निमित्ताने गांधी आपल्या अवतीभवती असतो. जसा अस्वस्थतेत, शांततेत, तसाच आनंदात आणि दु:खातही... एखादा ग्रॅहम स्टेन्स आणि त्याची मुले जिवंत जाळली जातात, आपण अस्वस्थ होतो. कुणी अकलाख नराधमांच्या क्रौर्याला बळी पडतो, आपण व्यथित होतो. सांधू पाहणारी मने पुन्हा तुटतात की काय, या भीतीने डोळ्याला डोळा लागत नाही. या अवस्थेतही तो सोबतीला असतो, आपल्याला मोडू देत नाही आणि वाकूही देत नाही... परवा हा महात्मा पुन्हा भेटला. निमित्त त्याच्या पणतूच्या भाषणाचे. आपल्या पणजोबांच्या हत्त्येमागची खरी कारणे हा पणतू शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्याने गांधींना मारले तो नथुराम आणि त्याचे समर्थक ६० वर्षांपासून खोटी कारणे सांगून भ्रम निर्माण करीत आहेत. हा माथेफिरु नथुराम कधी नाटकाच्या रूपाने आपल्या विकृतीचे समर्थन करू पाहतो, तर कधी त्याचे सगेसोयरे जयंती-पुण्यतिथीला त्याला हुतात्मा ठरवून महात्म्याच्या हत्त्येचा असुरी आनंद उपभोगत असतात. गांधींच्या पुण्याईवर जगणारे गांधीवादी मात्र अशावेळी शांतपणे बसून राहतात. ‘माझ्या पणजोबांना तुम्ही राष्ट्रपिता म्हणता आणि ६७ वर्षे होऊनही त्यांच्या खुनाला जबाबदार असलेली माणसे आणि त्यांच्या संस्था प्रतिष्ठेने समाजात वावरतात! त्यांच्या निर्घृण हत्त्येमागील दडवून ठेवलेले सत्य देशासमोर का येत नाही’, हा तुषार गांधींचा अतिशय साधा आणि सरळ प्रश्न आहे. नथुरामी मानसिकतेचा उन्माद वाढला असतानाच्या काळात मग हा प्रश्न अधिक जळजळीत ठरतो. गांधींची हत्त्या हा पूर्वनियोजित आणि प्रदीर्घ कटाचा भाग होता. त्यांच्या खुनामागे ज्यांचे पाठबळ होते त्या विचाराची माणसे आज सत्तेत आहेत. ते गोडसेला महात्मा ठरवितात, गांधीजींची कुचेष्टा करतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या स्वातंत्र्य लढ्याची आठवण पुसून टाकण्याचे घाणेरडे कामही करतात. स्वातंत्र्य लढ्यात कुठेही नसलेली किंबहुना इंग्रजांना छुपी मदत करणारी, माफीनामा लिहून देणारी, गांधींची हत्त्या झाल्यानंतर मिठाई वाटणारी ही मंडळी आज देशभक्त म्हणून मिरवितात आणि त्यांच्या हत्त्येची असत्य आणि देशभक्तीपर कारणे तरुणांच्या मनावर घट्टपणे बिंबवतात. ‘कुणी एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे कर असे सांगणारा तो भेकड म्हातारा, ‘महात्मा’ कसा’, असा प्रश्न एखादा तरुण विचारून जातो, तेव्हा हे विष किती खोलवर पेरले गेले आहे, याचा तीव्रतेने प्रत्यय येतो. या सगळ्या विखारी मानसिकतेत गांधींबद्दलचा खुनी द्वेष दडलेला आहे. पण याची कुणी दखल घेत नाही किंवा चर्चाही करीत नाही. नेमके हेच दु:ख त्यांच्या पणतूला आहे. परवा नागपूर आणि अमरावतीच्या व्याख्यानात तुषार गांधींच्या डोळ्यातील अश्रुंनी या दु:खाला वाट मोकळी करून दिली. त्यांच्या डोळ्यात, शब्दात एक विलक्षण वेदना जाणवत होती. आपल्या पणजोबांचा खून करणाऱ्या व्यक्तींचा नव्हे तर त्या मानसिकतेचा ते शोध घेत आहेत. तो प्रयत्न त्यांना कडवट बनवत नाही तर गांधींनीच सांगितलेल्या मनुष्यधर्माच्या अधिक जवळ नेणारा आहे. गांधी हा तसा किरकोळ आणि कृश देहाचा. पेटलेल्या नौआखलीत ‘तुमच्या अंत:करणातील द्वेषभावनेवर मात करा’ असे तो कळवळून सांगायचा. त्याच्या अहिंसेत, सत्त्याग्रहात असे कोणते सामर्थ्य होते? त्याला एकदा मारल्यानंतरही तो जिवंत कसा? तो अजून मरत का नाही? शरीररुपाने कधीचाच संपलेला हा म्हातारा आपल्या विकृत विचारसरणीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे, असे नथुरामभक्ताना सतत वाटत असते. त्यामुळे या महात्म्याच्या वाटेने जाणाऱ्या प्रत्येक नि:शस्त्र माणसाची त्यांना भीती वाटते. तुषार गांधींचा शोध पूर्णत्वाला जाईल की नाही? सांगता येत नाही. पण गांधी कधी संपणार नाही. नथुरामभक्तांचे हेच वैफल्य आहे. - गजानन जानभोर