शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

शापित कोहिनूर हवाच कशाला?

By admin | Updated: April 24, 2016 03:46 IST

जगामध्ये सर्वोच्च किंमत असलेला कोहिनूर हिऱ्याच्या मालकी हक्कावरून पुन्हा वादळ उठले आहे. यापूर्वी अनेकदा मालकी हक्कावरून वाद-प्रवाद झाले. पण इंग्लडने अद्यापपर्यंत कोहिनूर

- विनायक पात्रुडकरजगामध्ये सर्वोच्च किंमत असलेला कोहिनूर हिऱ्याच्या मालकी हक्कावरून पुन्हा वादळ उठले आहे. यापूर्वी अनेकदा मालकी हक्कावरून वाद-प्रवाद झाले. पण इंग्लडने अद्यापपर्यंत कोहिनूर वरचा हक्क सोडलेला नाही. साधारण १८५० च्या म्हणजे अडीचशे वर्षापूर्वी ही घटना असेल. त्या वेळी निम्म्या जगावर इंग्रजांचे राज्य होते. जेव्हा कोहिनूर त्यांच्या ताब्यात आला, तेव्हापासून इंग्रजांचा अंमल कमी झाला. त्यांच्या ताब्यातील एकेक देश स्वतंत्र होत गेला. खरे तर इतिहासातील या घटना कोहिनूर शापित असल्याचेच निदर्शक म्हणावे लागेल. कोहिनूरचा नूर काही और आहे, यात शंका नाही. गंमत म्हणजे कोहिनूर हिऱ्याचा आतापर्यंत व्यवहार झालेला नाही. म्हणजे खरेदी विक्री वगैरे. एक तर कुणीतरी लुटला आहे किंवा कुणीतरी भेट दिला आहे. त्यामुळे त्याची खरी किंमत कुणालाच ठाऊक नाही. तरीही एका अंदाजानुसार, दोन अब्ज भारतीय रुपयापर्यंत ही किंमत असल्याचे सांगितले जाते. जेव्हा खाणीत सर्वात पहिल्यांदा हा हिरा सापडला, तेव्हा तो ७९३ कॅरेटचा होता. त्यांनतर त्याच्यावर तीन-चार वेळा सुबकतेचे प्रयोग करण्यात आले.सध्या जगात तब्बल दोन हजारांवरून अधिक मौल्यवान हिरे आहेत, ज्यांची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे, पण कोहिनूर हिऱ्याला कुणाचीच सर नाही. जगातील सर्वात मौल्यवान हिरा म्हणून ‘कोहिनूर’कडे पाहिले जाते. ‘कोह-इ-नूर’ म्हणजे ‘प्रकाशाचा पर्वत’ असा या अरबी शब्दाचा अर्थ आहे. कोहिनूर मिळविण्यासाठी भारताने यापूर्वी अनेकदा प्रयत्न केले आहेत, पण इंग्लडने ताबा सोडलेला नाही. आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेले, तेव्हा गेल्याच आठवड्यात सरकारने कोहिनूर हिरा इंग्लडला भेट म्हणून दिल्याचा उल्लेख केला, त्यावरून पुन्हा वादळ उठले. मोदी सरकारने मात्र, आम्ही हा मौल्यवान हिरा भारताकडे परत आणू, अशी ग्वाही दिली आहे.कोहिनूर हिरा मूळचा कुठला, यावरही बरेच प्रवाद आहेत. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील खाणीत तब्बल पाच हजार वर्षांपूर्वी हा हिरा सापडल्याचे सांगण्यात येते. तो तेथील मालवा प्रांतातील राजाकडे होता. त्यानंतर दिल्लीच्या बादशाहने हा हिरा लुटला. १५२६ साली बाबरच्या ताब्यात हा हिरा होता. त्यानंतर शाहजहान ते औरंगजेब असा हिऱ्याचा प्रवास सांगितला जातो. या कोहिनूर हिऱ्याची खासियत म्हणजे हा ज्यांच्या ताब्यात गेला, त्याचे साम्राज्य खालसा झाले. पुरुषांसाठी हा कोहिनूर शापित मानला गेला आहे. मात्र, महिलांनी परिधान केल्यास कोहिनूरचे विपरित परिणाम जाणवत नाहीत, अशी वदंता आहे. त्यामुळेच की काय, तो इंग्लडच्या राणीच्या मुकुटात शांतपणे विराजमान आहे. दहाव्या शतकापासून भारतीय भूमीवर भाकवंशीय राज्यकर्ते होते. १४ व्या शतकात त्यांच्याकडे कोहिनूर आला आणि लुगलक शाहने भाकवर स्वारी करून राज्य खालसा केले. मोहम्मद बिन तुगलककडे हा कोहिनूर होता आणि त्यानंतर ज्यांच्याकडे कोहिनूर गेला, त्यांचा दु:खांत झाला. शाहजहानने त्याच्या मुकुटावर कोहिनूर हिरा चिकटवला होता. त्यानंतर त्याचा पुत्र औरंगजेबने शाहजहानलाच नजरकैदेत ठेवले. त्या वेळी शाहजहान मुमताजच्या आठवणीत बुडून गेलेला होता. कोहिनूर हिऱ्यातून तो ताजमहालची प्रतिकृती पाहत असे. त्यानंतर पर्शियन राजा नादीर शाहने मोगलांवर स्वारी केली. त्यात मोगलांचे राज्य खालसा झाले. नादीर शाहने हा हिरा पर्शियात नेऊन ठेवला. त्याच नादीर शाहची पुढे हत्या झाली. मग हा कोहिनूर अफगाणिस्तानचा बादशहा मोहम्मद दुर्रानीकडे पोहोचला. त्यानंतर वशंज शुजा दुर्रानीकडे कोहिनूर आला आणि त्याची सत्ता मिळविण्यासाठी दुसऱ्या भावंडाने शुजा दुर्रानीला पळून जाण्यास भाग पाडले. शुजाने लाहोरला पलायन केले. त्या वेळी तेथील पंजाब प्रांतावर राजा रणजित सिंहची सत्ता होती. शुजाने तो कोहिनूर रणजित सिंहच्या ताब्यात दिला. त्या वेळी रणजित सिंहने कोहिनूरच्या बदल्यात शुजाला त्याचे राज्य परत मिळवून दिले. कोहिनूर रणजित सिंहच्या ताब्यात मिळताच काही वर्षांनंतर त्याचाही मृत्यू झाला. त्या वेळी अखंड भारतावर इंग्रजांचा अंंमल सुरू झाला होता. इंग्रजांनी कोहिनूर ताब्यात घेऊन राणी व्हिक्टोरियाकडे दिला, तोपर्यंत कोहिनूरची शापित प्रवासाची कहाणी व्हिक्टोरिया राणीपर्यंत पोहोचली होती. राणीने मग त्या हिऱ्याला स्वत:च्या मुुकुटात स्थान दिले आणि केवळ महिलाच हा मुकुट परिधान करतील, असा फतवा काढला. पुढे जरी ब्रिटनच्या गादीवर पुरुष बसला, तरी हा मुकुट त्याच्या पत्नीच्या डोक्यावर असेल, असेही या फतव्यात नमूद करण्यात आले आहे. तेव्हापासून इंग्लडच्या ताब्यात हा कोहिनूर आहे. सध्या लंडनच्या टॉवरमध्ये हा कोहिनूर अतिशय कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आलेला आहे. पर्यटकांसाठी कधी तो खुलाही केला जातो. राणीच्या वाढदिवसाला तिच्या मुकुटात मोठ्या दिमाखात हा कोहिनूर झळकत असतो.तब्बल १०५ कॅरेटचा हा कोहिनूर आपल्या देशाच्या प्रतिमेचा विषय असता, तरी कायदेशीरदृष्ट्या इंग्लडकडे आहे. यापूर्वी अफगाणिस्तान, पाकिस्तान यांनीही कोहिनूरच्या ताब्याविषयी पत्रे लिहिली, पण इंग्लडने त्यांनाही स्पष्ट नकार दिला. परवा सर्वोच्च न्यायालयानेही भारतीय अधिकाऱ्यांनी इंग्लडच्या ईस्ट इंडिया कंपनीला पंजाबच्या राजाने हा हिरा भेट दिल्याचे सांगितले. त्यामुळे हिरा परत मागण्याचा अधिकार भारताने गमावला आहे. एखाद्याला वस्तू भेट दिल्यानंतर ती परत मागणे असभ्यतेचे लक्षण मानले जाते. भारताने स्वातंत्र्यानंतर अनेकदा हा हिरा भारताच्या ताब्यात देण्याची विनंती केली, पण इंग्लडने ती विनंती साफ फेटाळून लावली. भारताने कोहिनूर हिरा हा प्रतिष्ठेचा विषय न करता, ३३ कोटी जनता पाण्याविना तडफडत आहे, त्याचा प्राधान्याने विचार करायला हवा. कोहिनूर ही आपली गरज नाही. त्यापेक्षा आपल्याकडे अजून मूलभूत गरजा पुरेशा भागलेल्या नाहीत, त्याची प्राथमिकता असायला हवी. शापित कोहिनूरच्या मागे लागण्यापेक्षा नव्या पिढीचे नवे कोहिनूर तयार करण्यात भारताने प्राधान्य दिले, तर त्यांच्या आयुष्यात प्रकाशाचे पर्वत नक्कीच तयार होतील, पण जनतेच्या मूळ प्रश्नाला बगल देऊन कोहिनूर स्वप्नाकडे पाहायला लावण्यातच सरकारला रस आहे. आपल्याही नागरिकांची स्मृती फारशी टिकत नाही. कोहिनूर लंडनच्या टॉवरमध्ये ठेवला काय आणि दिल्लीच्या लाल किल्ल्यात ठेवला काय, सामान्यांच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? पण कोहिनूरभोवती स्वप्न रंजन केल्याने दैनंदिन आयुष्याच्या ताणावर तेवढाच उतारा मिळतो. क्षणभर का होईना, डोक्यावर कोहिनूरचा मुकुट नसला, तरी तणावाचा काटेरी मुकुट हलकासा दूर होतो, हेही नसे थोडके.

(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत. )