शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
2
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...
3
महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट
4
अफगाणिस्तानातून कोणकोणत्या नद्या पाकिस्तानच्या दिशेने वाहतात? तालिबानने प्रवाहच रोखला तर काय होईल?
5
भारतीय नर्सला सिंगापूरमध्ये १४ महिन्यांचा कारावास अन् २ चाबकाचे फटके; असं नेमकं काय घडलं?
6
IND vs AUS 3rd ODI : 'या' पठ्ठ्यानं कोच गंभीरचा विश्वास ठरवला सार्थ! ऑस्ट्रेलियनं संघ २३६ धावांवर ऑलआउट
7
जैन बोर्डिंगचा व्यवहार १ तारखेच्या अगोदर रद्द नाही झाला तर संपूर्ण देशभर मोठे आंदोलन; जैन मुनींचा इशारा
8
पाकिस्तान पुन्हा तोंडघशी पडला; UN मध्ये काश्मीरचा मुद्दा उपस्थित करताच भारतानं दाखवला आरसा
9
Shreyas Iyer Brilliant Catch : श्रेयसनं घेतला जबरदस्त कॅच! पण ऑस्ट्रेलियन बॅटरसह त्यानंही सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?
10
ट्रम्प आता चीनशी पंगा घेणार...! जिनपिंग यांना थेट तैवानवरून जाब विचारणार, आशियाच्या दौऱ्यावर निघाले
11
Pandav Panchami 2025: आजच्या काळात काय आहे पांडव पंचमीचे महत्त्व? तिलाच 'लाभ पंचमी' का म्हणतात?
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर; मोदी सरकारनं 'या' प्रस्तावाला दिली मंजुरी, जाणून घ्या
13
VIRAL : एका आठवड्यात पैसे परत करेन म्हणणारी 'ऑनलाइन' मैत्रीण पालटली! १५ हजारांची मदत करणार्‍यालाच सुनावलं
14
पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात...
15
कॅनडाच्या 'त्या' जाहिरातीत असं काय होतं की डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड झाला? व्यापार करार रोखला!
16
Health Tips: ऑक्टोबर हीट कमी करण्यासाठी सकाळी अंशपोटी प्या 'हे' मॅजिक ड्रिंक 
17
विवाहित महिला पुतण्याच्या प्रेमात पडली, लिव्ह-इनमध्ये राहिली; वाद सुरू होताच आयुष्य संपवलं! आता पती म्हणाला...
18
IND vs AUS : DSP सिराजला 'रिमांड'वर घेण्याच्या मूडमध्ये होता हेड; पण त्याच्यावरच आली ‘अरेस्ट’ होण्याची वेळ
19
Manifestation Tips: पैसा, मनःशांती, समाधान, जे हवं ते सगळं मिळेल; फक्त रोज करा 'हे' तीन उपाय
20
परेश रावल यांनी 'दृश्यम ३'ला दिला नकार; कारण सांगत म्हणाले, "स्क्रिप्ट खूप चांगली आहे पण..."

आम्ही भान का विसरतो ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 12:56 IST

मिलिंद कुलकर्णी कोरोना विषाणूशी सारे जग लढा देत असताना आणि आम्ही भारतीय लोकदेखील समर्थ आणि सशक्तपणे मुकाबला करीत असताना ...

मिलिंद कुलकर्णीकोरोना विषाणूशी सारे जग लढा देत असताना आणि आम्ही भारतीय लोकदेखील समर्थ आणि सशक्तपणे मुकाबला करीत असताना काही मोजक्या मंडळींच्या अविवेकी कृत्यामुळे धोकेदायक स्थिती निर्माण होऊ पहात आहे. सामाजिक भान आम्हाला कधी येणार असा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.जनता संचारबंदी पाळून संयम आणि संकल्पाचा परिचय द्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्याला भारतीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देखील दिला. ही जनता संचारबंदी का, याविषयी कारणमिमांसा पंतप्रधानांनी राष्टÑाला उद्देशून केलेल्या भाषणात केली होती. भारतीय जनतेने त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सायंकाळी ५ वाजता टाळ्या, थाळ्या वाजवून शंखनाद, घंटानाद केला. कोरोनाशी मुकाबला करणाऱ्या डॉक्टरांपासून तर सगळ्या घटकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविला. आणि त्यात संपूर्ण देश सहभागी झाला. ही वेगळी अनुभूती होती. कोरोनाशी लढण्यासाठी देश सज्ज असल्याचे चित्र यानिमित्त निर्माण झाले. मात्र रात्री ९ वाजेनंतर कोरोनावर विजय मिळविल्याचा आनंद साजरा केल्यासारखी गर्दी रस्त्यांवर दिसून आली. लॉकडाऊन आणि संचारबंदी जारी केली असतानाही सोमवारी भाजीबाजारापासून तर बँकापर्यंत रांगा लागलेल्या दिसून आल्या. कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे, हे विसरुन आम्ही वागत आहोत.पंतप्रधानांच्या जनता संचारबंदी व टाळ्या वाजविण्याच्या उपक्रमातून जनतेला कोरोनाविषयी लढण्याचे गांभीर्य आणि मानसिकता असे दोन्ही जाणवले, हा फार मोठा फायदा होता. परंतु, त्या उपक्रमाची खिल्ली उडविण्यात काही महाभाग होतेच. अर्थात महात्मा गांधी यांनी काढलेली दांडीयात्रा आणि मूठभर मिठ उचलण्याचा प्रयोग, सविनय कायदेभंग, विदेशी कपड्यांची होळी अशा प्रयोगांची खिल्ली उडविणारी मंडळी तेव्हाही होतीच आणि आताही आहेच. त्याच पंक्तीतील ही मंडळी आहे, हे दिसून आले.कोरोनाचे संकट हे सामान्यांच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, ही जाणीव असल्याने पंतप्रधानांनी ‘जनता संचारबंदी’चा उपक्रम राबविला. त्यात कोणताही पक्ष, व्यक्तीचे स्तोम माजविण्याचा प्रयत्न नव्हता. परंतु, काही उतावीळ महाभागांनी ‘मोदीं’चा जयजयकार करीत विजयी रॅली काढली. अशा प्रकाराने मूळ उपक्रमाचे गांभीर्य हरवते, हे तरी मोदीप्रेमी मंडळींनी लक्षात घ्यायला हवे.सगळ्यात गंभीर प्रकार म्हणजे रावेरमधील जातीय दंगल. कोरोनाचे संकट समोर असतानाही आम्ही जाती-धर्माचे जोखड घेऊन एकमेकांची डोकी फोडत आहोत, हे कशाचे लक्षण आहे? कोरोनाचे संकट हे जात-धर्मापलिकडचे संकट असताना त्याच्याशी लढण्याऐवजी आम्ही एकमेकांविरुध्द लढून शक्तीपात करीत आहोत. संचारबंदी, लॉकडाऊनसारख्या निर्बंधाचे पालन करण्यात व्यग्र असणाºया महसूल व पोलीस प्रशासनाचे कामदेखील अशा दंगलींमुळे वाढत आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणेला प्रयत्न करावे लागले. कोरोना राहिले बाजूला आणि सगळ्यांना दंगल काबूत आणण्यासाठी झटावे लागले. संकटाचे गांभीर्य आणि सामाजिक भान नसल्याचा हा परिपाक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव