शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही भान का विसरतो ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 12:56 IST

मिलिंद कुलकर्णी कोरोना विषाणूशी सारे जग लढा देत असताना आणि आम्ही भारतीय लोकदेखील समर्थ आणि सशक्तपणे मुकाबला करीत असताना ...

मिलिंद कुलकर्णीकोरोना विषाणूशी सारे जग लढा देत असताना आणि आम्ही भारतीय लोकदेखील समर्थ आणि सशक्तपणे मुकाबला करीत असताना काही मोजक्या मंडळींच्या अविवेकी कृत्यामुळे धोकेदायक स्थिती निर्माण होऊ पहात आहे. सामाजिक भान आम्हाला कधी येणार असा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.जनता संचारबंदी पाळून संयम आणि संकल्पाचा परिचय द्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्याला भारतीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देखील दिला. ही जनता संचारबंदी का, याविषयी कारणमिमांसा पंतप्रधानांनी राष्टÑाला उद्देशून केलेल्या भाषणात केली होती. भारतीय जनतेने त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सायंकाळी ५ वाजता टाळ्या, थाळ्या वाजवून शंखनाद, घंटानाद केला. कोरोनाशी मुकाबला करणाऱ्या डॉक्टरांपासून तर सगळ्या घटकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविला. आणि त्यात संपूर्ण देश सहभागी झाला. ही वेगळी अनुभूती होती. कोरोनाशी लढण्यासाठी देश सज्ज असल्याचे चित्र यानिमित्त निर्माण झाले. मात्र रात्री ९ वाजेनंतर कोरोनावर विजय मिळविल्याचा आनंद साजरा केल्यासारखी गर्दी रस्त्यांवर दिसून आली. लॉकडाऊन आणि संचारबंदी जारी केली असतानाही सोमवारी भाजीबाजारापासून तर बँकापर्यंत रांगा लागलेल्या दिसून आल्या. कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे, हे विसरुन आम्ही वागत आहोत.पंतप्रधानांच्या जनता संचारबंदी व टाळ्या वाजविण्याच्या उपक्रमातून जनतेला कोरोनाविषयी लढण्याचे गांभीर्य आणि मानसिकता असे दोन्ही जाणवले, हा फार मोठा फायदा होता. परंतु, त्या उपक्रमाची खिल्ली उडविण्यात काही महाभाग होतेच. अर्थात महात्मा गांधी यांनी काढलेली दांडीयात्रा आणि मूठभर मिठ उचलण्याचा प्रयोग, सविनय कायदेभंग, विदेशी कपड्यांची होळी अशा प्रयोगांची खिल्ली उडविणारी मंडळी तेव्हाही होतीच आणि आताही आहेच. त्याच पंक्तीतील ही मंडळी आहे, हे दिसून आले.कोरोनाचे संकट हे सामान्यांच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, ही जाणीव असल्याने पंतप्रधानांनी ‘जनता संचारबंदी’चा उपक्रम राबविला. त्यात कोणताही पक्ष, व्यक्तीचे स्तोम माजविण्याचा प्रयत्न नव्हता. परंतु, काही उतावीळ महाभागांनी ‘मोदीं’चा जयजयकार करीत विजयी रॅली काढली. अशा प्रकाराने मूळ उपक्रमाचे गांभीर्य हरवते, हे तरी मोदीप्रेमी मंडळींनी लक्षात घ्यायला हवे.सगळ्यात गंभीर प्रकार म्हणजे रावेरमधील जातीय दंगल. कोरोनाचे संकट समोर असतानाही आम्ही जाती-धर्माचे जोखड घेऊन एकमेकांची डोकी फोडत आहोत, हे कशाचे लक्षण आहे? कोरोनाचे संकट हे जात-धर्मापलिकडचे संकट असताना त्याच्याशी लढण्याऐवजी आम्ही एकमेकांविरुध्द लढून शक्तीपात करीत आहोत. संचारबंदी, लॉकडाऊनसारख्या निर्बंधाचे पालन करण्यात व्यग्र असणाºया महसूल व पोलीस प्रशासनाचे कामदेखील अशा दंगलींमुळे वाढत आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणेला प्रयत्न करावे लागले. कोरोना राहिले बाजूला आणि सगळ्यांना दंगल काबूत आणण्यासाठी झटावे लागले. संकटाचे गांभीर्य आणि सामाजिक भान नसल्याचा हा परिपाक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव