शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

गृहनिर्माण संस्थांची भांडणे मंत्रालयापर्यंत का जातात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 09:20 IST

मुंबईत जवळपास ४६ हजार हाउसिंग सोसायट्या आहेत. ढोबळमानाने ५० ते ६० लाख लोक अशा संस्थांमधील रहिवासी आहेत.

रविकिरण देशमुख, वृत्तसंपादक

मालकीचे घर हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय! पण, त्याच्याशी संबंधित नियम, कायदे याविषयीची अनास्था फारच चिंताजनक आहे. घर घेताना आणि तिथे राहत असताना आपल्याला काही नियम लागू होतात याविषयी पुरेशी संवेदनशीलता अद्याप लोकांकडे आलेली नाही, म्हणूनच की काय सहकारी गृहनिर्माण संस्थांमधली भांडणे स्थानिक पातळीपासून ते मंत्रालयापर्यंत सुरूच असतात.

मुंबईत जवळपास ४६ हजार हाउसिंग सोसायट्या आहेत. ढोबळमानाने ५० ते ६० लाख लोक अशा संस्थांमधील रहिवासी आहेत. त्याखालोखाल संस्था ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक येथे आहेत. नागरिक म्हणून फारशी बंधने असू नयेत, असे हिरिरीने सांगणारे अशा संस्थांच्या स्वायत्ततेबाबत मात्र अनभिज्ञ आहेत. संस्था चालवणारे आपल्याला स्वायत्तता दिली, स्वैराचार करण्याचा परवाना नव्हे, असे समजून घेण्यास तयार नाहीत

इतर सहकारी संस्थांमध्ये सभासद शेअरपुरते मालक असतात, पण हाउसिंग सोसायटीत प्रत्येकाचा मालकी हक्क आहे. इतर संस्थांना प्रामुख्याने सहकारी संस्था कायदा १९६० लागू होतो. पण, गृहनिर्माण संस्थेला २५ वेगवेगळे कायदे लागू होतात. बऱ्याच जणांना याची नीट माहिती नसल्याने वाद निर्माण होतात आणि प्रकरणे सरकार दरबारी दाखल होतात. सभासद म्हणून आपले हक्क काय आणि संस्थेचे अधिकार काय हा वादाचा मुद्दा असतो.

९७ व्या घटनादुरुस्तीने संस्थांना स्वायत्तता दिली आहे. प्रत्येक संस्था आदर्श उपविधी (मॉडेल बाय-लॉज) ठरवू शकते. पण, सदस्यांना ते माहिती असतीलच याची खात्री नाही. मुंबई, ठाणे, नवी मुंबई यासारख्या शहरांमध्ये हाउसिंग सोसायटीचा कारभार पाहणारी मंडळी आपापले दैनंदिन काम सांभाळून वेळ देतात. पूर्वी सामाजिक बांधिलकी म्हणून असे काम केले जात असे. आता लोकांना वेळ द्यावासा वाटत नाही. किरकोळ वाद उपनिबंधक, सहनिबंधक कार्यालयात जातात आणि नंतर मंत्रालयापर्यंत पोहोचतात, असे या क्षेत्रात काही दशके कार्यरत असलेले ॲड. डी.एस. वडेर यांचे म्हणणे आहे.

प्रत्येकाने आपापली जबाबदारी समजून घेतली तर वाद कमी होतील. पण, त्यासाठी कायदे, नियम याचे ज्ञान आवश्यक आहे. त्यासाठी प्रशिक्षणाचीही गरज आहे. सभासदत्वावरून वाद होतात, इमारतीमधील गळती, देखभाल, दुरुस्ती, पार्किंग यावरून हिरिरीने भांडणे होतात. लोक कोर्टकचेरीची वाट धरतात पण सामंजस्याने मार्ग निघत नाही. थकबाकीदार सदस्यांच्या तक्रारीची दखल घेणे सहकारी संस्थांच्या निबंधकांवर बंधनकारक नाही तरीही छोट्या-मोठ्या तक्रारीवरून संस्थेला नोटिसा काढल्या जातात. यात छळवादच अधिक आहे, असे पदाधिकारी म्हणतात.

देखभाल, दुरुस्ती खर्च सदस्यनिहाय नियमाने समान असला पाहिजे, पण तो घराच्या आकारानुसार प्रति चौरस फूट ठरवला जातो. यावरूनही वाद होतात. २५ ते ३० टक्के लोक दरमहा देखभाल शुल्क देतात, ३० ते ४० टक्के अधूनमधून देतात, ५ ते १० टक्के वर्षातून १-२ वेळा देतात आणि २-४ टक्के टाळतात. अशा वेळी ज्याला नोटीस दिली जाते तो लगेच सरकार दरबारी पोहोचतो आणि संस्थेला नोटीस बजावली जाते. मग सुरू होतो वेगळाच छळवाद, असे लोक सांगतात. मुंबईत सहकारी संस्थांचे एकूण २९ वॉर्ड आहेत. तिथे सामोपचाराने मार्ग काढण्याचे प्रयत्न होतात का? हा मोठाच प्रश्न आहे. कायदे, नियम याची माहिती लोकांनी करून घेतली तर ५०-६० टक्के तक्रारी कमी होतील, असे म्हटले जाते. पण, इथे वेळ कोणाला आहे.