शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

आंतरराष्ट्रीय संस्थांना भारताबद्दल आकस (का) आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 06:49 IST

मानव विकास निर्देशांक, लोकशाही मूल्ये, प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य आणि हॅपिनेस इंडेक्ससारख्या परिमाणांमध्ये भारत इतका पिछाडीवर का?

नंदकिशोर पाटीलसंपादक, लोकमत, औरंगाबाद

आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाची प्रतिमा उंचावली, हा अलीकडच्या काळात सातत्याने केला जाणारा दावा खरा मानायचा असेल तर,  पुढीलपैकी एक पर्याय स्वीकारावा लागतो. एक म्हणजे, ज्या निकषांच्या आधारे एखाद्या राष्ट्राचे प्रतिमावर्धन झाले की कसे, हे ठरवले जाते; ते निकषच बाजूला सारणे अथवा अप्रिय वाटतील ते-ते अहवाल तरी नाकारायचे. सरकारने दुसरा पर्याय स्वीकारला असल्याचे दिसते. नुकताच जाहीर झालेला जागतिक असमानता अहवाल जसा अजून आपल्या पचनी पडलेला नाही, तीच गत मानवी हक्क, मानवी विकास, लोकशाही मूल्ये, माध्यमांचे स्वातंत्र्य आणि हॅपिनेस इंडेक्सची!

नानाप्रकारचे निकष लावून आणि तितकेच सोयीस्कर निष्कर्ष काढून भारताला बदनाम करण्याचा विडा काही आंतरराष्ट्रीय संस्थांनी उचलला आहे, ही सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्याची प्रतिक्रिया  एकवेळ दुर्लक्षित करता येईल. मात्र, सरकारी पातळीवरदेखील तोच कित्ता गिरवला गेल्याने आश्चर्य व्यक्त झाले. अर्थात, सरकारला गैरसोयीचे ठरेल ते नाकारण्याची प्रवृत्ती जगभर सगळीकडे सारखीच असते म्हणा!देशातील मान्यवर अशा काही माजी सनदी अधिकाऱ्यांनी संबंंधित संस्थांची विश्वासार्हता, व्यवहार्यता आणि महत्त्व पटवून देत सरकारने हे अहवाल किती गांभीर्याने घेतले पाहिजेत, याकडे लक्ष वेधले आहे.

कोणत्याही देशाची आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी जसे सकल राष्ट्रीय उत्पादन, दरडोई उत्पन्न मोजले जाते; तसे नागरिकांचे राहणीमान, आयुर्मान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मानवी हक्कांचे संरक्षण, महिला व बालकांची सुरक्षा, निष्पक्ष न्यायदान व्यवस्था, निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थांची निरपेक्ष भूमिका अशा कसोट्यांवर देशाचा सामाजिक-राजकीय लसावी काढला जातो आणि हे काम जगभरातील काही नामांकित संस्था करीत असतात. ‘मुडीज’सारखी संस्था दरवर्षी पतमानांकन जाहीर करते; परंतु केवळ आर्थिक वाटचालीवरून राष्ट्राच्या अंतरंगात डोकावता येत नाही. लोकांना आचार-विचार, विहार आणि धर्माचारादी स्वातंत्र्य निर्भयपणे उपभोगता येते की नाही हे देखील तितकेच गरजेचे असते. आनंददायी जीवन जगण्याच्या प्रत्येकाच्या तऱ्हा आणि कल्पना भलेही निराळ्या असतील; परंतु शांततामय सहजीवनासाठी सभोवतालचे पर्यावरणदेखील तितकेच पूरक असावे लागते. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांच्या पलीकडेदेखील मानवाच्या इतर काही गरजा असतात आणि त्याची पूर्तता राजसत्तेच्या धोरणांवर अवलंबून असते.

हल्ली अन्नावाचून कोणी उपाशी राहत नाही; परंतु पोटभर आणि पोषक या दोन भिन्न बाबी आहेत. रोजच्या अन्नात पोषक घटक नसतील तर मुलांची शारीरिक वाढ होणार नाही. भुकेच्या निर्देशांकातून नेमकी हीच बाब तपासली जाते. नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक निर्देशांकात भारताची ५५ व्या स्थानावरून ९४ व्या स्थानावर घसरण झाल्याचे म्हटले आहे. मात्र, सरकारने ग्लोबल हंगर इंडेक्सचा अहवालच नाकारला आहे. सदरील अहवालातील निष्कर्ष वस्तुनिष्ठ नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. यासाठी सरकारने कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाची आकडेवारी पुढे केली आहे. लॉकडाऊन काळात लाखो गोरगरीब, बेरोजगार, मजुरांना मोफत वाटप केलेल्या अन्नधान्याची आकडेवारीच सादर केली आहे. त्यात तथ्य आहे, हे खरे!  परंतु सरकारने दिलेली आकडेवारी आणि हंगर इंडेक्सचा कालावधी यात अंतर असल्याचे दिसून येते. भुकेचा निर्देशांक आपण नाकारला ही बाब एकवेळ मान्य. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानव विकास निर्देशांकांची तर आपण साधी दखलही घेतली नाही. उलट, गेल्या सात वर्षांपासून आपण एकाच स्थानावर (१३१ क्रमांकावर !) कायम आहोत. घसरण झाली नाही, म्हणून समाधान व्यक्त करायचे, तर करता येऊ शकेल!

भारतात लोकशाही मूल्यांचा ऱ्हास होत चालला असून, विशिष्ट वर्गाला लक्ष्य बनविले जात असल्याचे स्वीडनस्थित ‘व्ही-डेन’नामक संस्थेने म्हटले आहे. तर ‘रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स’ नामक फ्रेंच संस्थेच्या ‘वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स’मध्ये भारत १४२ व्या स्थानी आहे!जागतिक पातळीवरचे हे सर्व अहवाल आपण नाकारले म्हणून निष्कर्ष थोडेच बदलणार.