शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी उत्पादनांचे अंदाज का चुकतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:15 IST

सुरुवातीला देशात मागणी इतकेच साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज वर्तविला गेला होता. मात्र, सध्या साखरेची विक्रमी उत्पादनाकडे वाटचाल सुरू आहे. साखरेचेच नाही तर अन्य कृषी मालाचेही सरकारचे अंदाज चुकतात. परिणामी, दर कमी-जास्त होऊन त्याचा फटका शेतकरी आणि ग्राहकाला बसतो.

- चंद्रकांत कित्तुरेदेशात यंदा साखरेचे उत्पादन विक्रमी होण्याची लक्षणे दिसत आहेत. २५१ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज होता. तो आता २९० लाख टनांवर जाईल, असा अंदाज आहे. केवळ साखरच नव्हे, तर देशातील सर्वच कृषी उत्पादनांच्या बाबतीत हे कमी-अधिक प्रमाणात घडत आहे. सरकारने काढलेले अंदाज चुकतात. परिणामी, दरात चढ-उतार होतात. तात्पुरते उपाय योजून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सरकार करते. अंदाज का चुकतात याबाबत काहीतरी कारणमीमांसा करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जातो. तूर, हरभरा, सोयाबीन, शेंगदाणे यासारख्या पिकांबाबतचे गेल्या दोन वर्षांचे अनुभव हेच सांगतात. बाजारात मागणीपेक्षा जादा पुरवठा झाला की, किमती कमी होतात आणि कमी झाला की त्या वाढतात. अन्नधान्याच्या बाबतीतही बाजाराचा हाच न्याय आहे. त्यामुळे मागणी इतकाच पुरवठा होईल, असे नियोजन झाले तर कृषी उत्पादनाच्या किमती स्थिर राहू शकतात. पण आपल्या देशातील भौगोलिक परिस्थिती, राजकीय इच्छाशक्ती ही कोणत्याही कृषी उत्पादनाचे किती उत्पादन घ्यावे, याबाबत नियोजन करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी अशी नाही. यामुळेच ही परिस्थिती उद्भवते. पीक मुबलक आले की, दर कोसळतात. उत्पादन खर्चही निघत नाही. परिणामी, शेतकºयांना तोटा सहन करावा लागतो. आधीच कर्जात बुडालेला शेतकरी आणखी कर्जाच्या विळख्यात अडकतो. त्यातून बाहेर पडणे अशक्य वाटू लागले की, तो आत्महत्येचा मार्ग अनुसरतो. हे आपल्या देशातील वर्षानुवर्षाचे विदारक सत्य आहे. यावर मार्ग काढण्याच्या घोषणा, उपाय वेगवेगळ््या सरकारने केल्या. परंतु, परिणाम फारसे उत्साहवर्धक नाहीत.सुरुवातीला २०१७-१८ या हंगामातील साखरेचे उत्पादन २५१ लाख टन होईल असा अंदाज ‘इस्मा’ या संघटनेने वर्तविला होता. केंद्र सरकारची असा अंदाज वर्तविणारी स्वतंत्र यंत्रणा नसल्यामुळे ‘इस्मा’चा अंदाजच सरकारही गृहीत धरते. जानेवारीत सुधारित अंदाज वर्तविताना तो २६१ लाख टनांवर नेण्यात आला. आता उद्या, बुधवारी पुन्हा ‘इस्मा’कडून सुधारित अंदाज वर्तविला जाणार आहे. गतवर्षी साखरेचे उत्पादन २४५ लाख टन होईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात २०३ लाख टन उत्पादन झाले. यामुळे साखरेला पर्यायाने उसालाही चांगला भाव दिला गेला. परिणामी, ऊस लागवडीखालील क्षेत्रात चांगली वाढ झाली. त्यातच यंदा पाऊसमान चांगले झाले; त्यामुळे उसाची वाढ जोमाने होऊन साखरेचा उताराही वाढला आहे. परिणामी, साखरेच्या उत्पादनात अपेक्षेपेक्षा अधिक वाढ होत असल्याचे दिसत आहे.‘इस्मा’बरोबरच विविध राज्यांतील साखर आयुक्तालये किंवा ऊस आयुक्तालयांनी साखर कारखान्यांकडून घेतलेली ऊस नोंदीची आकडेवारी आणि कृषी विभागाची आकडेवारी पाहून हा अंदाज सरकार वर्तवते, पण यात अचूकता नाही. याला वेगवेगळी कारणे आहेत. आॅल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनच्या अंदाजानुसार यंदा साखर आकडा २९० लाख टनांवर जाणार आहे. साखरेसह सर्वच शेतमालांचे किती उत्पादन होईल, याचे अचूक अंदाज बांधणारी यंत्रणा केंद्र आणि राज्य सरकारांनी विकसित करायला हवी. विकसित देशात जर अशी यंत्रणा असेल, तर ती आपल्याकडे का असू नये? ती असेल तर शेतमालांच्या किमती स्थिर ठेवण्यासही मदतकारक ठरू शकेल. नाही तर वेधशाळेने पावसाचा अंदाज वर्तवावा आणि नेमके कडक ऊन पडावे अशी स्थिती असते. तशीच ती शेतमालाच्या उत्पादनाबाबतही राहील.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेEconomyअर्थव्यवस्थाagricultureशेती