शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कृषी उत्पादनांचे अंदाज का चुकतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:15 IST

सुरुवातीला देशात मागणी इतकेच साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज वर्तविला गेला होता. मात्र, सध्या साखरेची विक्रमी उत्पादनाकडे वाटचाल सुरू आहे. साखरेचेच नाही तर अन्य कृषी मालाचेही सरकारचे अंदाज चुकतात. परिणामी, दर कमी-जास्त होऊन त्याचा फटका शेतकरी आणि ग्राहकाला बसतो.

- चंद्रकांत कित्तुरेदेशात यंदा साखरेचे उत्पादन विक्रमी होण्याची लक्षणे दिसत आहेत. २५१ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज होता. तो आता २९० लाख टनांवर जाईल, असा अंदाज आहे. केवळ साखरच नव्हे, तर देशातील सर्वच कृषी उत्पादनांच्या बाबतीत हे कमी-अधिक प्रमाणात घडत आहे. सरकारने काढलेले अंदाज चुकतात. परिणामी, दरात चढ-उतार होतात. तात्पुरते उपाय योजून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सरकार करते. अंदाज का चुकतात याबाबत काहीतरी कारणमीमांसा करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जातो. तूर, हरभरा, सोयाबीन, शेंगदाणे यासारख्या पिकांबाबतचे गेल्या दोन वर्षांचे अनुभव हेच सांगतात. बाजारात मागणीपेक्षा जादा पुरवठा झाला की, किमती कमी होतात आणि कमी झाला की त्या वाढतात. अन्नधान्याच्या बाबतीतही बाजाराचा हाच न्याय आहे. त्यामुळे मागणी इतकाच पुरवठा होईल, असे नियोजन झाले तर कृषी उत्पादनाच्या किमती स्थिर राहू शकतात. पण आपल्या देशातील भौगोलिक परिस्थिती, राजकीय इच्छाशक्ती ही कोणत्याही कृषी उत्पादनाचे किती उत्पादन घ्यावे, याबाबत नियोजन करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी अशी नाही. यामुळेच ही परिस्थिती उद्भवते. पीक मुबलक आले की, दर कोसळतात. उत्पादन खर्चही निघत नाही. परिणामी, शेतकºयांना तोटा सहन करावा लागतो. आधीच कर्जात बुडालेला शेतकरी आणखी कर्जाच्या विळख्यात अडकतो. त्यातून बाहेर पडणे अशक्य वाटू लागले की, तो आत्महत्येचा मार्ग अनुसरतो. हे आपल्या देशातील वर्षानुवर्षाचे विदारक सत्य आहे. यावर मार्ग काढण्याच्या घोषणा, उपाय वेगवेगळ््या सरकारने केल्या. परंतु, परिणाम फारसे उत्साहवर्धक नाहीत.सुरुवातीला २०१७-१८ या हंगामातील साखरेचे उत्पादन २५१ लाख टन होईल असा अंदाज ‘इस्मा’ या संघटनेने वर्तविला होता. केंद्र सरकारची असा अंदाज वर्तविणारी स्वतंत्र यंत्रणा नसल्यामुळे ‘इस्मा’चा अंदाजच सरकारही गृहीत धरते. जानेवारीत सुधारित अंदाज वर्तविताना तो २६१ लाख टनांवर नेण्यात आला. आता उद्या, बुधवारी पुन्हा ‘इस्मा’कडून सुधारित अंदाज वर्तविला जाणार आहे. गतवर्षी साखरेचे उत्पादन २४५ लाख टन होईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात २०३ लाख टन उत्पादन झाले. यामुळे साखरेला पर्यायाने उसालाही चांगला भाव दिला गेला. परिणामी, ऊस लागवडीखालील क्षेत्रात चांगली वाढ झाली. त्यातच यंदा पाऊसमान चांगले झाले; त्यामुळे उसाची वाढ जोमाने होऊन साखरेचा उताराही वाढला आहे. परिणामी, साखरेच्या उत्पादनात अपेक्षेपेक्षा अधिक वाढ होत असल्याचे दिसत आहे.‘इस्मा’बरोबरच विविध राज्यांतील साखर आयुक्तालये किंवा ऊस आयुक्तालयांनी साखर कारखान्यांकडून घेतलेली ऊस नोंदीची आकडेवारी आणि कृषी विभागाची आकडेवारी पाहून हा अंदाज सरकार वर्तवते, पण यात अचूकता नाही. याला वेगवेगळी कारणे आहेत. आॅल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनच्या अंदाजानुसार यंदा साखर आकडा २९० लाख टनांवर जाणार आहे. साखरेसह सर्वच शेतमालांचे किती उत्पादन होईल, याचे अचूक अंदाज बांधणारी यंत्रणा केंद्र आणि राज्य सरकारांनी विकसित करायला हवी. विकसित देशात जर अशी यंत्रणा असेल, तर ती आपल्याकडे का असू नये? ती असेल तर शेतमालांच्या किमती स्थिर ठेवण्यासही मदतकारक ठरू शकेल. नाही तर वेधशाळेने पावसाचा अंदाज वर्तवावा आणि नेमके कडक ऊन पडावे अशी स्थिती असते. तशीच ती शेतमालाच्या उत्पादनाबाबतही राहील.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेEconomyअर्थव्यवस्थाagricultureशेती