शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

टीका कशासाठी?

By admin | Updated: December 27, 2015 21:49 IST

राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करण्यासाठी तसे अनेक मुद्दे असताना त्यांनी दिल्ली शहरातील प्रदूषणाला कुठेतरी आळा बसावा म्हणून जो सम-विषम तारखांचा प्रयोग सुरू करण्याचे

राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करण्यासाठी तसे अनेक मुद्दे असताना त्यांनी दिल्ली शहरातील प्रदूषणाला कुठेतरी आळा बसावा म्हणून जो सम-विषम तारखांचा प्रयोग सुरू करण्याचे जे योजिले आहे त्यातून स्वत:चा आणि आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचा अपवाद न करण्याचा जो निर्णय जाहीर केला आहे, त्याचे स्वागत न करता हाही त्यांचा प्रसिद्धीचाच एक स्टंट असल्याची टीका करण्याचे खरे तर काही कारण नाही. ज्या वाहनांच्या क्रमांकातील अखेरचा अंक सम असेल तीच वाहने सम तारखांना रस्त्यावर येतील व तेच विषम क्रमांक आणि विषम तारखांबाबत लागू होईल असा नियम केला गेला आहे. त्यातून त्यांनी राजधानीतील काही बड्या पदांवरील तसेच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या वाहनांना सूट दिली असली तरी स्वत:ला मात्र अशी सूट घेतलेली नाही. तसे करण्यामागे दिल्ली शहरातील अन्य बड्यांनी आपले अनुकरण करावे आणि या मोहिमेत पुढाकार घ्यावा असाही एक अंतस्थ हेतू असू शकतो व तसे असण्यात काही वाईट नाही. त्यांच्या या मोहिमेचे खुद्द न्यायव्यवस्थेनेही स्वागत केले आहे. मुळात ही योजना प्रायोगिक तत्त्वावर नववर्ष दिनापासून केवळ पंधरा दिवस अंमलात येणार आहे. या प्रयोगाचा कितपत लाभ होतो यावर तिला कायमस्वरूपी राबवायचे वा नाही याचा विचार केला जाणार आहे. कोणत्याही स्थितीत प्रदूषण आटोक्यात आलेच पाहिजे या विचाराने दिल्ली शहरात डिझेलवर चालणाऱ्या मजबूत मोटारींची नोंदणी तीन महिन्यांपर्यंत स्थगित ठेवण्याचे आणि पंधरा वर्षे जुन्या वाहनांच्या परवान्यांचे नूतनीकरण न करण्याचे आदेश तर चक्क न्यायालयांनीच दिले आहेत. यापासून प्रेरणा घेऊन आता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार त्यांच्या राज्याची राजधानी असलेल्या पाटणा शहरात पंधरा वर्षे जुन्या मोटारींना प्रवेश बंदीचा प्रयोग लागू करण्याचा विचार करू लागले आहेत. त्याचवेळी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनी याबाबत असे स्पष्टपणे म्हटले आहे की, चुकारांना दोन हजारांचा दंड आणि वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्याची तरतूद नियमात असली तरी शहराचा व्याप आणि आवाका लक्षात घेता केवळ पोलीस यंत्रणा सर्व वाहनांवर लक्ष ठेवू शकेल आणि चुकारांवर कारवाई करू शकेल हे शक्य नाही. लोकानी आपल्या शहराच्या स्वच्छ पर्यावरणासाठी आपणहून यात सहभागी व्हावे अशी त्यांची अपेक्षा आहे. केजरीवाल यांची अपेक्षाही काही वेगळी नाही. पण समाजासमोर आदर्र्श निर्माण करण्यासाठी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी पुढाकार घेतला तर त्यातून चांगला संदेश जात असतो व त्यासाठीच केजरीवाल यांनी स्वत:स अपवाद न करण्याचे ठरविले असावे. त्याला प्रसिद्धीचा स्टंट म्हणून हिणवायचे कोणालाच काही कारण नाही.