शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

टीका कशासाठी?

By admin | Updated: December 27, 2015 21:49 IST

राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करण्यासाठी तसे अनेक मुद्दे असताना त्यांनी दिल्ली शहरातील प्रदूषणाला कुठेतरी आळा बसावा म्हणून जो सम-विषम तारखांचा प्रयोग सुरू करण्याचे

राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करण्यासाठी तसे अनेक मुद्दे असताना त्यांनी दिल्ली शहरातील प्रदूषणाला कुठेतरी आळा बसावा म्हणून जो सम-विषम तारखांचा प्रयोग सुरू करण्याचे जे योजिले आहे त्यातून स्वत:चा आणि आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचा अपवाद न करण्याचा जो निर्णय जाहीर केला आहे, त्याचे स्वागत न करता हाही त्यांचा प्रसिद्धीचाच एक स्टंट असल्याची टीका करण्याचे खरे तर काही कारण नाही. ज्या वाहनांच्या क्रमांकातील अखेरचा अंक सम असेल तीच वाहने सम तारखांना रस्त्यावर येतील व तेच विषम क्रमांक आणि विषम तारखांबाबत लागू होईल असा नियम केला गेला आहे. त्यातून त्यांनी राजधानीतील काही बड्या पदांवरील तसेच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या वाहनांना सूट दिली असली तरी स्वत:ला मात्र अशी सूट घेतलेली नाही. तसे करण्यामागे दिल्ली शहरातील अन्य बड्यांनी आपले अनुकरण करावे आणि या मोहिमेत पुढाकार घ्यावा असाही एक अंतस्थ हेतू असू शकतो व तसे असण्यात काही वाईट नाही. त्यांच्या या मोहिमेचे खुद्द न्यायव्यवस्थेनेही स्वागत केले आहे. मुळात ही योजना प्रायोगिक तत्त्वावर नववर्ष दिनापासून केवळ पंधरा दिवस अंमलात येणार आहे. या प्रयोगाचा कितपत लाभ होतो यावर तिला कायमस्वरूपी राबवायचे वा नाही याचा विचार केला जाणार आहे. कोणत्याही स्थितीत प्रदूषण आटोक्यात आलेच पाहिजे या विचाराने दिल्ली शहरात डिझेलवर चालणाऱ्या मजबूत मोटारींची नोंदणी तीन महिन्यांपर्यंत स्थगित ठेवण्याचे आणि पंधरा वर्षे जुन्या वाहनांच्या परवान्यांचे नूतनीकरण न करण्याचे आदेश तर चक्क न्यायालयांनीच दिले आहेत. यापासून प्रेरणा घेऊन आता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार त्यांच्या राज्याची राजधानी असलेल्या पाटणा शहरात पंधरा वर्षे जुन्या मोटारींना प्रवेश बंदीचा प्रयोग लागू करण्याचा विचार करू लागले आहेत. त्याचवेळी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनी याबाबत असे स्पष्टपणे म्हटले आहे की, चुकारांना दोन हजारांचा दंड आणि वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्याची तरतूद नियमात असली तरी शहराचा व्याप आणि आवाका लक्षात घेता केवळ पोलीस यंत्रणा सर्व वाहनांवर लक्ष ठेवू शकेल आणि चुकारांवर कारवाई करू शकेल हे शक्य नाही. लोकानी आपल्या शहराच्या स्वच्छ पर्यावरणासाठी आपणहून यात सहभागी व्हावे अशी त्यांची अपेक्षा आहे. केजरीवाल यांची अपेक्षाही काही वेगळी नाही. पण समाजासमोर आदर्र्श निर्माण करण्यासाठी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी पुढाकार घेतला तर त्यातून चांगला संदेश जात असतो व त्यासाठीच केजरीवाल यांनी स्वत:स अपवाद न करण्याचे ठरविले असावे. त्याला प्रसिद्धीचा स्टंट म्हणून हिणवायचे कोणालाच काही कारण नाही.