शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांना’ प्रवेशबंदी का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 05:30 IST

सारे काश्मीर एक तुरुंगवास अनुभवत आहे. नेत्यांना त्यांच्या घरातच ‘बंद’ करण्यात आले. मोर्चे, मिरवणुका व निषेध सभांना बंदी आहे. मात्र, ही बंदी मोडून हजारो स्त्रिया व पुरुष रस्त्यावर येत असल्याची चित्रे पाश्चात्त्य वाहिन्या दाखवीत आहेत.

३७० कलम रद्द केल्यानंतर काश्मिरातील लोकमताची पाहणी करण्यासाठी त्या प्रदेशाला भेट देण्याची परवानगी मिळावी ही राहुल गांधींनी केलेली विनंती काश्मीरचे नायब राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मान्य केली. या भेटीतच आपण लोकप्रतिनिधी, नेते व पोलीस अधिकाऱ्यांचीही भेट घेऊ, ही दुसरी विनंतीही मान्य करण्यात आली. त्यानुसार राहुल गांधी व देशातील अन्य प्रमुख राजकीय पक्षांचे नेते दिल्लीहून काश्मीरला रवाना झाले. मात्र श्रीनगरच्या विमानतळावर पोहोचताच त्यांच्याविरुद्ध मनाईहुकूम काढण्यात येऊन त्यांना काश्मीर प्रवेश नाकारण्यात आल्याचे सांगितले गेले. परिणामी, श्रीनगरच्या विमानतळावरूनच हे नेते दिल्लीला परतले. हा सारा प्रसंग सरकारची लोकप्रतिनिधींविषयीची दिल्लीची बेपर्वा वृत्ती व काश्मिरात जे घडत आहे (वा असेल) ते लोकांपर्यंत पोहोचू न देण्याची शासनाची मानसिकताच उघड करणारी आहे.

काश्मिरात सर्वत्र शांतता आहे, लोक कामावर आणि मुले शाळेत जाऊ लागली आणि हे सरकारकडून देशाला सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ते खरे नाही. सारे काश्मीर एक तुरुंगवास अनुभवत आहे. काश्मीरच्या अनेक भागांत कर्फ्यू आहे. मोर्चे, मिरवणुका व निषेध सभांना बंदी आहे. मात्र, ही बंदी मोडून हजारो स्त्रिया व पुरुष रस्त्यावर येत असल्याची चित्रे सीएनएन व अनेक पाश्चात्त्य वाहिन्या जगाला दाखवीत आहेत. तात्पर्य, आपला खोटेपणा लपविण्यासाठी व तो विरोधी पक्षनेत्यांना पाहून दडविण्यासाठीच राहुल गांधी व अन्य नेत्यांना दिलेली काश्मीर प्रवेशाची बंदी सरकारने नाकारली आहे. या प्रकरणात केंद्राने आपली भूमिका जाहीर केली नसली तरी ती काय असेल याची कल्पना साऱ्यांना आहे. मुळात सरकारजवळ सांगायला काही उरलेच नाही. प्रथम परवानगी द्यायची व ऐनवेळी माघार घ्यायची या बाबीचा अर्थ दुसरा कोणता असू शकतो? या प्रकरणाची जबाबदारी आता काश्मीर सरकारवर ढकलून नामानिराळे होण्याची संधीही सरकारजवळ नाही. कारण काश्मीर हा आता केंद्रशासित प्रदेश आहे व त्यावर केंद्रीय गृहमंत्रालयाचे नियंत्रण आहे. राज्यपाल हे तर बोलून चालून केंद्राच्या हातचे बाहुले आहेत. ‘ते’ सांगणार आणि ‘हे’ वागणार.

राहुल गांधी व विरोधी पक्षनेते हे देशातील जबाबदार नेते आहेत. ते संसदेचे सभासद आहेत. त्यांच्या ताब्यात देशातील किमान आठ राज्ये आहेत. तरीही त्यांना विमानतळावरून परत पाठविले जात असेल तर त्यात नक्कीच काही लपविण्याजोगे आहे. देशात संचारबंदी नाही. ती काश्मिरातही नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. तेथील नेते कैदेत नाहीत, असेही सरकारने सांगितले आहे. मग ही बंदी का व कशासाठी? काश्मीरला केंद्रशासित करून व त्या राज्याचे दोन तुकडे करूनही तेथे शांतता निर्माण करण्यात सरकार अपयशी झाले आहे. याचाच हा पुरावा आहे काय? फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला व मेहबूबा मुफ्ती हे तीन मुख्यमंत्री आणि त्या प्रदेशाचे खासदार कुठे आहेत? ते काय म्हणत आहेत? जे झाले त्याविषयीच्या त्यांच्या प्रतिक्रिया वृत्तपत्रांतून ‘त्रोटक’ स्वरूपात प्रकाशित झाल्या. एकेकाळी व काही प्रमाणात आजही मिझोरम किंवा नागालँडमध्ये काय सुरू आहे याची कल्पनाच देशाला येत नाही. आता त्या प्रदेशात काश्मीरची भर पडली आहे. लेह प्रदेशाचा, सरकारला अनुकूल असलेला खासदार काय म्हणतो किंवा जम्मूमधील आताचे पुढारी काय म्हणतात ते प्रकाशित होते. मात्र, काश्मिरातील नेते, जनता, विद्यार्थी व स्त्रिया काय बोलतात याविषयीचा एकही शब्द माध्यमात उमटत नाही.

माध्यमे सरकारच्या नियंत्रणात आहेत आणि काश्मिरात तर वृत्तबंदीच आहे. त्यामुळे हे समजणारे आहे. राज्य विरोधी पक्षाच्या नेत्यांना अगोदर येण्याची परवानगी देऊन नंतर त्यांना भेटीवाचून परत पाठविणे यामागे सरकारचा हेतू कोणता? या नेत्यांचा अपमान करण्याचा, सत्य दडवून ठेवण्याचा की काश्मिरी जनतेची वाचाच बंद करण्याचा? अशी दडपशाही फार काळ चालत नाही, हे १९७६ च्या आणीबाणीने देशाला दाखवून दिले आहे. मॉस्को व हाँगकाँगमधील जनतेचे उठावही हेच सांगणारे आहेत. ही स्थिती भारत सरकारला काही शिकवू शकत नसेल तर त्यांच्या लोकशाही निष्ठेविषयी काय म्हणावे?

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर