शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

कोण जिंकले, कोण हरले ?

By admin | Updated: September 2, 2015 00:06 IST

कोणी काहीही म्हणत असले तरी भूमी अधिग्रहणाचे विधेयक मागे घेण्याचे ठरवून मोदी सरकारने विरोधी पक्षांसमोर माघारच घेतली आहे. या विधेयकासंबंधीचा केंद्र सरकारचा आग्रह एवढा टोकाचा होता

कोणी काहीही म्हणत असले तरी भूमी अधिग्रहणाचे विधेयक मागे घेण्याचे ठरवून मोदी सरकारने विरोधी पक्षांसमोर माघारच घेतली आहे. या विधेयकासंबंधीचा केंद्र सरकारचा आग्रह एवढा टोकाचा होता की राज्यसभेत त्याला मंजुरी मिळत नसतानाही त्या संबंधीचा अध्यादेश त्याने तीन वेळा जारी केला. ३१ आॅगस्टला तिसऱ्या अध्यादेशाची मुदत संपणार असल्यामुळे तो चौथ्यांदा काढला जाईल असे सरकार पक्षातील अनेकांना वाटले होते. मात्र या विधेयकाला काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांचाच नव्हे तर शेतकरी वर्गाचाही विरोध असल्याचे लक्षात आल्यावरून सरकारने ते मागे घेण्याचा निर्णय घेतला व खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’ या रेडिओवरील भाषणात तशी घोषणा केली. आपल्या पाठिशी असलेल्या बहुमताच्या जोरावर हे विधेयक सरकारला लोकसभेत मंजूर करून घेता आले असले तरी त्यामुळे शेतकरी वर्गात निर्माण झालेले भय मोठे होते. बडे उद्योग आणि महामार्ग यासाठी लागणारी शेतजमीन तिच्या मालकाच्या संमतीवाचूनच अधिग्रहित करण्याची या विधेयकातील तरतूद औद्योगिक घराण्यांना सुखावणारी असली तरी ग्रामीण भाग व शेतकरी वर्ग यांच्यात चिंतेची भावना निर्माण करणारी होती. शेतकऱ्यांची ही नाराजी नेमकी हेरून काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी त्याला संघटित विरोध करण्याची योजना आखली व ती तडीस नेली. या विधेयकामुळे निर्माण झालेला ग्रामीण भागाएवढाच समाजातील समंजस वर्गातील असंतोष एवढा मोठा होता की प्रत्यक्ष सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अनेक पक्षांनीही ते थांबविण्याची गळ सरकारला घातली. परंतु आपली घोषणाबाजी व प्रचार यांच्या बळावर आपण शेतकऱ्यांचा असंतोष घालवू शकू याचा सरकारला वाटणारा विश्वासच ते विधेयक परवापर्यंत त्याने रेटून धरायला कारण ठरले. परंतु कितीही चर्चा केली आणि विधेयकातील दुरुस्त्यांबाबत केवढ्याही तडजोडी केल्या तरी विरोध थांबत नाही आणि असंतोषही शमत नाही हे लक्षात आल्यानंतर सरकारने ते विधेयक थांबविण्याचा व त्यातील तरतुदी ‘आवश्यक वाटल्यास’ राज्यांनी अमलात आणाव्या हे सांगण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या मताशी घट्ट राहणारे व फारशा तडजोडी करणारे नेते नाहीत अशीच त्यांची आजवरची प्रतिमा असल्यामुळे या निर्णयामुळे लोकाभिमुख राहण्याची त्यांची इच्छाही प्रगट झाली. या निर्णयाला एक राजकीय पार्श्वभूमीही कारणीभूत झाली आहे. या विधेयकाचे प्रमुख विरोधक असलेले काँग्रेस, जद (यू) व राजद हे पक्ष बिहारमध्ये येऊ घातलेली विधानसभेची निवडणूक एकत्र येऊन लढत आहेत. त्या राज्यात मोदी आणि नितीशकुमार या दोघांचीही प्रतिमा विकासपुरुष अशी आहे. लोकमताचा अनेकांनी घेतलेला तिथला अंदाजही या निवडणुकीचा निर्णय कसा असेल ते स्पष्ट करू शकला नाही. त्यातून बिहारची निवडणूक देशाच्या राजकारणाला निर्णायक वळण देईल असे जाणकारांच्या वर्तुळात चर्चिले गेले. सोनिया गांधी, नितीशकुमार आणि लालूप्रसाद यांची पाटण्यात जी विराट प्रचारसभा झाली तिनेही केंद्राला त्याच्या भूमिकेचा फेरविचार करायला भाग पाडले असणार. याच दरम्यान गुजरातमध्ये हार्दीक पटेल या तरुणाच्या नेतृत्त्वात पटेल समाजाने जे भव्य आंदोलन उभे केले त्यातूनही ग्रामीण जनतेत धुमसत असलेला असंतोष सरकारच्या ध्यानात आला असणार. गुजरातमधील पटेलांच्या आंदोलनाचा या विधेयकाशी प्रत्यक्ष संबंध नसला व ते पटेल समुदायाच्या आरक्षणासाठी उभे झाले असले तरी त्यातून प्रगटलेला असंतोष मोठा होता व तो केवळ त्याच्या तात्कालीक व प्रगट मागणीतूनच उभा झाला नव्हता. त्याला असलेल्या इतर परिमाणांमध्ये हे विधेयकही सामील होते. या विधेयकामुळे शेतकरी वर्गात व ग्रामीण भागात ‘संशयाचे वातावरण’ निर्माण झाले हे प्रत्यक्ष नरेंद्र मोदींनीही त्यांच्या मन की बातमध्ये मान्य केले. या संशयाचे खापर त्यांनी काँग्रेस व इतर पक्षांनी केलेल्या प्रचारावर फोडले असले तरी तो उभा करण्यात विरोधकांना आलेले यशही त्यांनी अप्रत्यक्षरीत्या मान्यच केले. लोकशाहीत जनमत हाच सरकारचा खरा आधार असतो. २०१४ ची निवडणूक प्रचंड बहुमताने जिंकल्यानंतर हा आधार भाजपाने प्रथम दिल्लीत गमावला. नंतरच्या काळात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याविरुद्ध झालेल्या आरोपांमुळेही सरकार पक्षाची प्रतिमा काहीशी काळवंडली. त्यातच बिहारच्या निवडणुका आणि गुजरातचे आंदोलन आव्हानासारखे पुढे आले. भूसंपादन विधेयक मागे घ्यायला हीच सारी पार्श्वभूमी कारण ठरली. सामान्यत: अशावेळी कोणताही राजकीय पक्ष त्याची माघार मान्य करीत नाही. विरोधकांचा विजयही त्याला अमान्य असतो. परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करूनच अशा वेळा टाळून नेल्या जातात. सध्या तोच प्रकार सुरु झाला आहे. मात्र जनता जागरुक आहे आणि तिला यातली माघार कळणारी आहे. सरकारच्या आताच्या निर्णयामुळे औद्योगिक घराणी नाराज होणार असली तरी त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या वर्गाला दिलासा मिळणार आहे. तो मिळवून दिल्याबद्दल सरकारचे व सरकारला तसे करायला भाग पाडल्याबद्दल विरोधकांचे अभिनंदन !