शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

बेलगाम ड्रॅगनच्या मुसक्या कोण आवळणार?

By विजय दर्डा | Updated: September 8, 2020 05:30 IST

कोरोना विषाणूची निर्यात केल्याचा संशय असलेल्या चीनमधून अमेरिकेत पोहोचली अज्ञात बियांची रहस्यमय पाकिटे.

- विजय दर्डाचेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह (vijaydarda@lokmat.com)

पुराणकथेतील कालिया नागाबद्दल तुम्ही ऐकले असेल. ज्या डोहात तो राहायचा त्याचे पाणी इतके विषारी झाले होते की, बाजूने जाणारे पशुपक्षीही मरून पडायचे. कालियाच्या विषाने यमुनाही विषारी झाली, त्यामुळे भगवान कृष्णाला यमुनेच्या प्रवाहात उडी घ्यावी लागली. कालियाला दहा तोंडे होती. कृष्णाने ती चिरडून टाकल्यावर कालियाला त्याची चूक कळली. आज चीन त्या कालिया नागासारखाच सारे जग गिळंकृत करू पाहत आहे. जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्था असणाऱ्या इतर देशांप्रमाणेच चीनकडेही अणुबॉम्ब व इतर संहारक जैविक शस्रे आहेत. मानवी जीवन, मानवी अधिकारांची पत्रास या देशात ठेवली जात नाही. १९८९ मध्ये लोकशाहीची मागणी करणाऱ्या हजारो तरुणांना या देशाने तोफेच्या तोंडी दिले, रणगाड्यांखाली चिरडले. एखाद्या लढाईत लाखभर सैनिक मेले तर त्याची चीनला फिकीर नसते. अमेरिका, जपान किंवा भारतासारखा लोकशाही देश असा विचार तरी करू शकेल? उत्तर अर्थातच नाही असे आहे, कारण आपण माणसांचे जीवित, अधिकार यांची कदर करतो. चीनचे नेमके उलटे आहे. जगा आणि जगू द्या यावर त्यांचा विश्वासच नाही. हा देश देव मानत नाही. या निलाजऱ्या देशाने भगवान बुद्धांना कधीच हद्दपार केले आहे. या देशाच्या नसानसात कट-कारस्थानेच वाहत असतात. एकीकडे चीन भारताशी वाटाघाटींचे ढोंग करतो दुसरीकडे जमीन हडपण्याचा खुनशी खेळ खेळतो. रशियात भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी बोलणी केल्याच्या दुसऱ्याच दिवशी धमक्या देणाऱ्या चीनची प्रवृत्ती चलाख, कुटिल राक्षसासारखीच आहे. प्रश्न असा आहे की या अशा देशाच्या मुसक्या कशा आवळायच्या?

एक स्पष्ट केले पाहिजे. मी स्वत: चिनी जनतेच्या विरोधात नाही. तिथले लोक माझे मित्रच आहेत. चीनच्या पीपल्स पार्टीने त्यांना नरकयातनात ढकलले असल्याने मला चिनी नागरिकांची काळजीच वाटते. दहा लाखांहून अधिक बिगर मुस्लिमांना तुरुंगात टाकणाºया राक्षसी प्रवृत्तीच्या सरकारला माझा विरोध आहे. जगातल्या छोट्या असहाय्य देशाना वाट्टेल तशी कर्जे वाटून चीनने अंकित केले आहे. आता त्यांना या राक्षसाच्या तावडीतून कोण वाचवणार हाही प्रश्न आहेच. अशा स्थितीत मोठे देश चीनशी कसे लढतील? या घडीला जगातल्या किमान १०० देशांतले लोकशाहीचा बुरखा पांघरलेले हुकूमशहा चीनच्या तालावर नाचत आहेत. चीन उघडपणे दहशतवाद्यांना साथ देतो आहे. भारत सुरक्षा परिषदेत हाफिज सैदला दहशतवादी घोषित करू इच्छितो तर चीन तेथे नकाराधिकार वापरतो. अशा चीनशी लढणे कसे सोपे असेल?

कमालीची गोष्ट म्हणजे अवघ्या जगात चीनच्या विरोधात हवा असूनही चीन मात्र सतत सगळ्यांवर डोळे वटारत असतो. या देशाने अमेरिकेशी पंगा घेतला आहे. तिबेटप्रमाणेच चीन आता तैवान गिळू पाहतोय. जपानशी त्याच्या कुरबुरी चालू आहेत. दक्षिण चिनी समुद्र आणि लाल समुद्रातही त्याने उच्छाद मांडला आहे. भारतीय सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून ठेवली आहेच. भारत संयमाने वागतो आहे म्हणून ठीक, नाही तर युद्ध केव्हाच सुरू झाले असते. युरोपशीही चीनने शत्रुत्व पत्करले आहे. ऑस्ट्रेलियाशीही तोच प्रकार दिसतो. हाँगकाँगच्या प्रश्नावर ब्रिटनशी झालेला समझौता झुगारणाºया चीनपासून सुटकेसाठी कोणीही हॉँगकाँगच्या मदतीला आलेले नाही.

चीनच्या कुरापतीचे नवे उदाहरण समोर आले आहे. ‘चायना पोस्ट’ नावाच्या कुठल्या संस्थेकडून अमेरिकेतल्या विभिन्न राज्यातल्या लोकांना त्यांनी न मागवलेली पाकिटे आली. त्यावर ‘दागिने’ असे लिहिलेले होते. लोकांनी ती उघडली, तर आत विविध प्रकारच्या बिया होत्या. अमेरिकी सरकारला कळल्यावर हे बियाणे गोळा करण्यात आले. लोकांनी ते पेरू नये असे सांगितले गेले. अशी पाकिटे इतर देशातही गेली म्हणतात. गतसप्ताहात भारताने यासंदर्भात लोकांना सावध केले. यात कळीचा प्रश्न हा, की बियांची पाकिटे दुसऱ्या देशात पोहोचलीच कशी? कारण एका देशातून दुसऱ्या देशात बियाणे किंवा रोपे नेण्यास परवानगीच नसते. चीन यावर बोलायला तयार नाही. ‘चौकशी सुरू आहे’ एवढेच उत्तर दिले जाते आहे. अनेकांना आठवत असेल की भारतात मागे दुष्काळ पडल्यावर अमेरिकेतून लाल गहू आयात केला गेला. त्या गव्हाबरोबर गवताचे बीसुद्धा आले होते. या गवताने आपली हजारो एकर जमीन आजही नापीक ठेवली आहे. दुसऱ्या देशातली जमिनीची सुपीकता नष्ट करण्याचा चीनचा यामागे डाव असू शकतो. बेलगाम होत चाललेल्या चीनला जग लगाम कसा घालू शकेल हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. चीनशी बहुतांश व्यवहार थांबवणाय़ऱ्या अमेरिकेचे मी अभिनंदन करतो. भारतानेही चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली शिवाय इतर काही पावले टाकली; पण यामुळे चीन सुधारेल? मला ते सोपे वाटत नाही. जगातल्या बलवान देशांनी मतभेद विसरून एकत्रितपणे चीनला लगाम घालण्याची आज गरज आहे.

टॅग्स :chinaचीनAmericaअमेरिकाindia china faceoffभारत-चीन तणाव