शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

सरकारी शाळांची दुरवस्थेला जबाबदार कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:47 IST

- नंदकिशोर पाटीलखासगी मालकीच्या कंपन्यांना शाळा उघडण्याचा परवाना देण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय थेट ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराची आठवण करून देणारा आहे. सामाजिक, भाषिक आणि भौगोलिक सलोखा मजबूत करणारी पारंपरिक शिक्षणपद्धती मोडीत काढून कंपनी सरकारसाठी राबणारे कारकून तयार करणारी शिक्षण प्रणाली लॉर्ड मेकॉलेंनी या देशात आणली आणि दुर्दैेवाने ती आजही ...

- नंदकिशोर पाटीलखासगी मालकीच्या कंपन्यांना शाळा उघडण्याचा परवाना देण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय थेट ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराची आठवण करून देणारा आहे. सामाजिक, भाषिक आणि भौगोलिक सलोखा मजबूत करणारी पारंपरिक शिक्षणपद्धती मोडीत काढून कंपनी सरकारसाठी राबणारे कारकून तयार करणारी शिक्षण प्रणाली लॉर्ड मेकॉलेंनी या देशात आणली आणि दुर्दैेवाने ती आजही तशीच चालू आहे. फरक झालाच असेल, तर तो एवढाच की, सरकार शिक्षणातील गुंतवणुकीतून आपला हात बाजूला काढून घेऊ पाहात आहे. शिक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीचा परतावाच दिसत नसेल तर मग जाहिरातबाजी कशी करणार? हे त्यामागचे मूळ कारण आहे. आपल्याकडच्या सरकारी शाळांना गुणवत्ता, रिटर्न्स आणि मानांकन, यासारखे औद्योगिक निकष लावून उठसूठ विद्यार्थ्यांची बौद्धिक कुवत आणि गुरुजनांची परीक्षा पाहण्याची सध्या नवीच टूम निघाली आहे. हाच निकष पुढे करून जिल्हा परिषदांच्या १३१४ शाळांना कायमचे टाळे लावण्यात आले. वाड्या-तांड्यावरील, भटक्यांच्या पालांवरील एकशिक्षकी शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ज्या उद्योगी घराण्यांनी फक्त नावापुरत्या ‘इंटरनॅशनल’ असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा उघडल्या त्यांच्या दर्जाचे काय आणि त्यांना कोणते निकष लावले जातात, हे एकदा तपासण्याची गरज आहे. तसेही आपल्याकडे शैक्षणिक गुणवत्ता मोजण्याचे परिमाण गुणांकनांच्या पलीकडे जात नाही. विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक, शारीरिक आणि मानसिक विकास हा केवळ गुणांवर नव्हे, तर कौशल्यावर मोजला जावा, हे रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनचे सूत्र आपल्याकडे असताना आपण तथाकथित पाश्चिमात्य ‘ग्रेड’च्या मागे धावू लागलो आहोत. हे करत असताना फ्रान्स, जर्मनी, जपान आणि चीनमध्ये आजही मातृभाषेतूनच शिक्षण दिले जाते आणि तिकडच्या सर्व शाळा या सरकारी मालकीच्या आहेत, हे आपण सोईस्करपणे विसरतो. आपल्याकडच्या सरकारी शाळांची आज दुरवस्था झाली असेल, तर त्यास जबाबदार कोण? ज्या देशात कधीकाळी तक्षशिला, नालंदा यासारखी विश्वविख्यात विद्यापीठं होती, त्या देशातील शिक्षणाची आपण पुरती ‘शाळा’ करून टाकली आहे! जे जे पाश्चात्त्य ते ते चांगले, हे आपल्या मनावर बिंबवण्यात मेकॉले खरंच केवढा यशस्वी झाला! आपणास पुन्हा तेच करायचे आहे का? कॉर्पोरेट कंपन्यांना शाळा उघडण्यास तशी कुणाची हरकत असण्याचे कारण नाही, फक्त तिथे गरीब विद्यार्थ्याला प्रवेश घेण्याची मुभा असेल का, हा खरा प्रश्न आहे. सरकारने कितीही हमी घेतली तरी, आपल्याकडचा शासकीय कारभार पाहता ते शक्य होईल, असे ठामपणे सांगता येत नाही.

 

टॅग्स :MumbaiमुंबईSchoolशाळा