शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
3
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
4
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
5
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
6
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
7
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
8
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
9
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
10
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
11
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
12
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
13
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
14
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
15
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
16
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
17
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
18
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
19
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
20
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी

मंत्रिमंडळात वऱ्हाडातून कोणाची वर्णी?

By किरण अग्रवाल | Updated: July 10, 2022 11:13 IST

Maharashtra Cabinet : शिंदेशाहीच्या सरकारात वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यांच्या वाट्याला किती मंत्रिपदे येतात याची उत्सुकता त्याचदृष्टीने वाढली आहे.

-  किरण अग्रवाल

राज्यात होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भाने वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांतील काही नावे घेतली जात असून, यंदा खरंच या तीनही जिल्ह्यांना प्रतिनिधित्व मिळते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे. तसे झालेच तर तो नक्कीच एक इतिहास ठरेल.

 

आपापल्या मतदारसंघाच्या विकासासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत असतातच. पण हा विकास अधिक वेगाने पुढे न्यायचा, तर त्यासाठी मंत्रिपदासारख्या जबाबदारीची अपेक्षा बाळगली जाते. राज्यातील शिंदेशाहीच्या सरकारात वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यांच्या वाट्याला किती मंत्रिपदे येतात याची उत्सुकता त्याचदृष्टीने वाढली आहे. विकासासाठीच मंत्रिपदे इतका मर्यादित हेतू यामागे नाही, तर ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वर्चस्वाला रोखण्यासाठीचा काटशह म्हणूनही त्याकडे पाहिले जात असल्याने याबाबतची उत्सुकता वाढणे स्वाभाविक ठरले आहे.

 

राज्यात घडून आलेल्या राजकीय भूकंपानंतर गेल्या आठवड्यात एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आरुढ झाले असून, आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्यासाठीचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सदिच्छा भेटीसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशीही चर्चा केली आहे. यात मंत्रिमंडळाच्या रचनेवर चर्चा करण्यासाठी दिल्लीत आल्याचे खुद्द शिंदे यांनी म्हटल्यामुळे आता कोणत्या मतदारसंघाला व कोणाला लाल दिवा लाभतो हे बघणे औत्सुक्याचे ठरले आहे.

 

महत्त्वाचे म्हणजे, उद्धव ठाकरे यांना ‘खो’ देऊन शिंदे सरकार अस्तित्वात आले आहे, त्यासाठी घडून आलेले राजकारण बघता यापुढील काळात ठाकरे यांची संघटना व शिंदे सरकार यांच्यात वर्चस्ववादाची लढाई लढली जाण्याची चिन्हे आहेत. अकोल्यातील शिवसेनेचे एकमात्र आमदार नितीन देशमुख ठाकरे यांच्याकडे माघारी परतल्याने या जिल्ह्यात भाजपाला मंत्रिपद खुणावते आहे. ठाकरे सरकारमध्ये मंत्रिपदापासून वंचित राहिलेल्या या जिल्ह्याला लगतच्या अमरावतीमधील बच्चू कडू यांचे पालकत्व लाभले, परंतु त्यांच्या प्रहार पक्षाच्या विस्ताराखेरीज अकोल्यातील जनतेला वेगळा किंवा विशेष लाभ झालेला दिसून येऊ शकला नाही. या पार्श्वभूमीवर व महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनेही आ. रणधीर सावरकर यांचे नाव मंत्रिपदासाठी अग्रक्रमाने घेतले जात असून, स्थानिक पातळीवर अलीकडे अधिक आक्रमक बनलेल्या शिवसेनेला रोखण्याची खेळी म्हणून भाजपा मंत्रिपदाची आस ठेवून आहे. ज्येष्ठ आमदार प्रकाश भारसाकळे की सावरकर, अशी येथे स्पर्धा होऊ शकते.

 

वऱ्हाडाचा विचार करता, केवळ बुलडाणा जिल्ह्यात शिंदे यांच्या बंडाला समर्थन लाभले. शिवसेनेचे आमदारद्वय डॉ. संजय रायमुलकर आणि संजय गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून बंडामध्ये साथ दिली. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात या दोघा संजयपैकी एकाला तरी मंत्रिपदाची संधी निश्चित मानली जात आहे. शिवसेनेतील बंडानंतर भाजपचे माजी कामगार मंत्री आ. डॉ. संजय कुटे यांनी शिंदे गट आणि भाजपमध्ये समन्वयकाची भूमिका निभावली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणवले जाणारे कुटे यांच्याकडे एक अेाबीसी चेहरा म्हणूनही भाजप पाहात आहे. त्यामुळे त्यांचे मंत्रिपदही पक्के मानले जात आहे. १९७८ पासून आजपर्यंत बुलडाणा जिल्ह्याला राज्याच्या मंत्रिमंडळात किमान राज्यमंत्री म्हणून तरी स्थान मिळालेले आहेच, यंदा मात्र ४७ वर्षांच्या इतिहासात या जिल्ह्याला प्रथमच एका वेळी दोन मंत्रिपदांची संधी चालून आलेली दिसत आहे. तसे झाल्यास जिल्ह्याचा विकास अधिक वेगाने, म्हणजे मेट्रोच्या गतीने होण्याची अपेक्षा करता येईल.

 

वाशिमच्या बाबतीत बोलायचे तर १९९८ मध्ये जिल्हा स्थापन झाल्यानंतर या जिल्ह्यातील सुभाष ठाकरे व सुभाष झनक या दोघांनाच मंत्रिपद लाभले. झनक यांच्यानंतर सुमारे १२ वर्षांपासून या जिल्ह्याला मंत्रिपदच मिळालेले नाही. २५ व्या राैप्यमहाेत्सवी वर्षात जिल्हा वाटचाल करीत असताना या जिल्ह्यालाही मंत्रिपद लाभले तर विकास वेगाने हाेईल. विशेष म्हणजे, सध्याच्या राजकीय स्थितीमध्ये खासदार भावना गवळी यांचे शिवसेना प्रताेद पद काढून घेतल्यामुळे शिवसैनिकांमध्ये चलबिचल आहे. पक्षांतर्गंत पातळीवर नाराजीचा सूर उमटताना दिसून येत आहे. अशास्थितीत आमदारकीची हॅटट्रिक केलेल्या राजेंद्र पाटणी यांचे नाव चर्चेत आले असून, खासदारकीमुळे काहीसे आकारास आलेले शिवसेनेचे वर्चस्व रोखतानाच भाजपाला संघटना विस्तारासाठी त्यामुळे माेठी संधी लाभण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यादृष्टीने वाशिमकरांच्या नजरा मंत्रिमंडळाकडे लागल्या असून तब्बल एका तपाचा मंत्रिपदाचा बॅकलाॅग दूर होण्याची अपेक्षा केली जात आहे, जी अवाजवी म्हणता येऊ नये.

 

सारांशात, अकोला व वाशिम येथे ठाकरेंच्या संघटनेला शह देण्यासाठी तर बुलडाण्यात समर्थकांना संधीसाठी मंत्रिपदांची अपेक्षा केली जात असून, कोणत्या का कारणाने होईना; लाल दिव्यांची संख्या वाढली तर वऱ्हाडाच्या विकासाला चालना मिळून जाईल.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPoliticsराजकारणRandhir Savarkarरणधीर सावरकरRajendra Patniराजेंद्र पाटणीSanjay Raymulkarसंजय रायमुलकर