शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

कोण म्हणते, माणूस फक्त ‘साधन’ आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 08:14 IST

‘प्रत्येक माणूस ही एक बी असते. जमिनीत पेरली, तर रुजते. नाहीतर हीच बी जेमतेम एका पक्ष्याचे खाद्य असते.’

ठळक मुद्दे‘प्रत्येक माणूस ही एक बी असते. जमिनीत पेरली, तर रुजते. नाहीतर हीच बी जेमतेम एका पक्ष्याचे खाद्य असते.’

सदगुरू,ईशा फाउंडेशनचे संस्थापक

आपल्याकडे “ह्युमन रिसोर्स” अशी एक संकल्पना वापरली जाते. मानव संसाधन. पण खरे पाहता माणूस फक्त एक ‘साधन’  असू शकतो का? त्याला साधन मानावे का ? खरे पाहता साधन म्हणजे काय? ज्याचे गुणधर्म आणि क्षमता आधीच माहिती असतात, अशी  एखादी वस्तू अगर कौशल्य! ते एक परिमाण आहे. माणूस म्हणजे परिमाण नव्हे, माणूस ही एक शक्यता असते. एखादा माणूस  वैयक्तिकरीत्या किती उंचीवर  जाईल, हे मुळात आपण त्या शक्यतेचा किती उलगडा करतो यावर अवलंबून असते. 

एका जिवंत व्यक्तीला ‘साधन’ मानले जाते, कारण ती व्यक्ती हाताळणाऱ्या वरिष्ठांना निश्चितता हवी असते. शक्यतो अनपेक्षित असे काही घडलेले त्यांना नको असते. म्हणून मग ते व्यक्तीला ‘रिसोर्स’ बनवतात आणि अनपेक्षित शक्यता खुडून टाकतात, नष्ट करतात.

प्रत्येक माणूस कोण असतो ? - एक बी! त्याला योग्य सुपीक जमीन मिळाली की, ते बी स्वतःच्या क्षमता ओळखते. मातीत पेरले, तर  एक बीज संपूर्ण पृथ्वी हिरवीगार करू शकते, अन्यथा ते जेमतेम एका पक्ष्याचे खाद्य असते. तेच माणसाच्या बाबतीत नाही का?  ‘हे केवळ एक साधन आहे’  असा विचार केला गेला, तर त्या माणसात दडलेल्या प्रतिभेचा कधीच उलगडा होणार नाही. म्हणजे मग तुम्ही एका विमानाची  ऑटोरिक्षा बनविणार. जो तुम्हाला उंचीवर नेऊ शकला असता, तो माणूस तुमच्यामुळेच जेमतेम रस्त्यावर चालण्याच्या लायकीचा उरणार!

मूल जन्माला येते, तेव्हा तुम्हाला माहीत नसते, की ते साधू होणार, की जादूगार किंवा एक सम्राट! हे मूल भोवतालातून काय ग्रहण करील, तुम्ही त्याचे पालनपोषण कसे कराल, यावर ते अवलंबून  असेल. त्या मुलाला तुम्ही  एक सकारात्मक, कार्यक्षम शक्यता म्हणून विकसित कराल, की एक नकारात्मक, अकार्यक्षम अडथळा बनवाल, यावर बरेच काही ठरेल.

व्यवसायाची गरज म्हणून तुम्ही माणसे हाताळता, तेव्हा त्यांच्यातून उत्तम ते बाहेर कसे काढता येईल, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. एखादा मनुष्य आनंदी अवस्थेत असतो, तेव्हाच तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सर्वोत्तम कार्य करतो, हे शास्त्र-पुराव्याने सिध्द झालेले आहे. पण आज दुर्दैवाने कामाची सर्व ठिकाणे तणावपूर्ण बनली आहेत.  दडपण नसेल, तर लोक कामच करत नाहीत, असा विचित्र समज तयार झाला आहे. अत्यंत तणावग्रस्त असताना साधा तव्यावरचा  डोसा उलटायला जाल, तरीही  तो जमिनीवर उलटून पडेल. अशा अवस्थेत तुम्हाला डोसा करता येणार नाही, नीट गाडी चालवता येणार नाही. पण निवांत, सतर्क आणि आनंदी  असाल, अवस्थेत असता, तेव्हा तुम्ही याच गोष्टी अगदी सहजपणे करू शकाल.

जिथे प्रत्येकाला त्याचे  सर्वोत्तम प्रयत्न करावेसे वाटतील, असे वातावरण तयार करणे, हेच नेत्यांचे काम आहे. एकदा हे साधले, की मग ‘माणसांचे व्यवस्थापन करण्याची’ गरजच पडत नाही. सर्वोत्कृष्ट गोष्टी सहज घडतात. हा महामारीचा अत्यंत अनिश्चित काळ आहे. अशावेळी, तुमच्या आजुबाजूला कोणत्या मनोवृत्तीची, कोणत्या स्वभावाची माणसे आहेत, याने खूप फरक पडतो. तुमच्यासाठी सर्वोत्तम ते द्यायला सतत तयार असलेले, तुम्ही त्यांच्यावर सहज विश्वास टाकू शकाल असे,  सकारात्मक स्वभावाचे आनंदी सहकारी तुमच्याबरोबर चालत असतील, तर  त्यांच्या आधाराने या अनिश्चिततेच्या काळातून तरून  जाणे सहजशक्य आहे. 

कोणी तुमच्या वाटेतला अडथळा बनत असेल, तर त्या व्यक्तीमध्ये ही नकारात्मकता कुठून आणि का आली असेल, याचा विचार केला, तर कदाचित त्याच्या/तिच्या मनाच्या गाठी सोडविण्याची वाट सहज सापडू शकेल... तसे प्रयत्न करा, हाच या अनिश्चित काळाचा सांगावा आहे.