शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

कोण म्हणते, माणूस फक्त ‘साधन’ आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 08:14 IST

‘प्रत्येक माणूस ही एक बी असते. जमिनीत पेरली, तर रुजते. नाहीतर हीच बी जेमतेम एका पक्ष्याचे खाद्य असते.’

ठळक मुद्दे‘प्रत्येक माणूस ही एक बी असते. जमिनीत पेरली, तर रुजते. नाहीतर हीच बी जेमतेम एका पक्ष्याचे खाद्य असते.’

सदगुरू,ईशा फाउंडेशनचे संस्थापक

आपल्याकडे “ह्युमन रिसोर्स” अशी एक संकल्पना वापरली जाते. मानव संसाधन. पण खरे पाहता माणूस फक्त एक ‘साधन’  असू शकतो का? त्याला साधन मानावे का ? खरे पाहता साधन म्हणजे काय? ज्याचे गुणधर्म आणि क्षमता आधीच माहिती असतात, अशी  एखादी वस्तू अगर कौशल्य! ते एक परिमाण आहे. माणूस म्हणजे परिमाण नव्हे, माणूस ही एक शक्यता असते. एखादा माणूस  वैयक्तिकरीत्या किती उंचीवर  जाईल, हे मुळात आपण त्या शक्यतेचा किती उलगडा करतो यावर अवलंबून असते. 

एका जिवंत व्यक्तीला ‘साधन’ मानले जाते, कारण ती व्यक्ती हाताळणाऱ्या वरिष्ठांना निश्चितता हवी असते. शक्यतो अनपेक्षित असे काही घडलेले त्यांना नको असते. म्हणून मग ते व्यक्तीला ‘रिसोर्स’ बनवतात आणि अनपेक्षित शक्यता खुडून टाकतात, नष्ट करतात.

प्रत्येक माणूस कोण असतो ? - एक बी! त्याला योग्य सुपीक जमीन मिळाली की, ते बी स्वतःच्या क्षमता ओळखते. मातीत पेरले, तर  एक बीज संपूर्ण पृथ्वी हिरवीगार करू शकते, अन्यथा ते जेमतेम एका पक्ष्याचे खाद्य असते. तेच माणसाच्या बाबतीत नाही का?  ‘हे केवळ एक साधन आहे’  असा विचार केला गेला, तर त्या माणसात दडलेल्या प्रतिभेचा कधीच उलगडा होणार नाही. म्हणजे मग तुम्ही एका विमानाची  ऑटोरिक्षा बनविणार. जो तुम्हाला उंचीवर नेऊ शकला असता, तो माणूस तुमच्यामुळेच जेमतेम रस्त्यावर चालण्याच्या लायकीचा उरणार!

मूल जन्माला येते, तेव्हा तुम्हाला माहीत नसते, की ते साधू होणार, की जादूगार किंवा एक सम्राट! हे मूल भोवतालातून काय ग्रहण करील, तुम्ही त्याचे पालनपोषण कसे कराल, यावर ते अवलंबून  असेल. त्या मुलाला तुम्ही  एक सकारात्मक, कार्यक्षम शक्यता म्हणून विकसित कराल, की एक नकारात्मक, अकार्यक्षम अडथळा बनवाल, यावर बरेच काही ठरेल.

व्यवसायाची गरज म्हणून तुम्ही माणसे हाताळता, तेव्हा त्यांच्यातून उत्तम ते बाहेर कसे काढता येईल, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. एखादा मनुष्य आनंदी अवस्थेत असतो, तेव्हाच तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सर्वोत्तम कार्य करतो, हे शास्त्र-पुराव्याने सिध्द झालेले आहे. पण आज दुर्दैवाने कामाची सर्व ठिकाणे तणावपूर्ण बनली आहेत.  दडपण नसेल, तर लोक कामच करत नाहीत, असा विचित्र समज तयार झाला आहे. अत्यंत तणावग्रस्त असताना साधा तव्यावरचा  डोसा उलटायला जाल, तरीही  तो जमिनीवर उलटून पडेल. अशा अवस्थेत तुम्हाला डोसा करता येणार नाही, नीट गाडी चालवता येणार नाही. पण निवांत, सतर्क आणि आनंदी  असाल, अवस्थेत असता, तेव्हा तुम्ही याच गोष्टी अगदी सहजपणे करू शकाल.

जिथे प्रत्येकाला त्याचे  सर्वोत्तम प्रयत्न करावेसे वाटतील, असे वातावरण तयार करणे, हेच नेत्यांचे काम आहे. एकदा हे साधले, की मग ‘माणसांचे व्यवस्थापन करण्याची’ गरजच पडत नाही. सर्वोत्कृष्ट गोष्टी सहज घडतात. हा महामारीचा अत्यंत अनिश्चित काळ आहे. अशावेळी, तुमच्या आजुबाजूला कोणत्या मनोवृत्तीची, कोणत्या स्वभावाची माणसे आहेत, याने खूप फरक पडतो. तुमच्यासाठी सर्वोत्तम ते द्यायला सतत तयार असलेले, तुम्ही त्यांच्यावर सहज विश्वास टाकू शकाल असे,  सकारात्मक स्वभावाचे आनंदी सहकारी तुमच्याबरोबर चालत असतील, तर  त्यांच्या आधाराने या अनिश्चिततेच्या काळातून तरून  जाणे सहजशक्य आहे. 

कोणी तुमच्या वाटेतला अडथळा बनत असेल, तर त्या व्यक्तीमध्ये ही नकारात्मकता कुठून आणि का आली असेल, याचा विचार केला, तर कदाचित त्याच्या/तिच्या मनाच्या गाठी सोडविण्याची वाट सहज सापडू शकेल... तसे प्रयत्न करा, हाच या अनिश्चित काळाचा सांगावा आहे.