शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

सरकार कुणाचे? अधिकाऱ्यांचे की नेत्यांचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 01:17 IST

राज्यात गुटखाबंदी असली तरी त्याची राजरोस विक्री होत आहे. यावर नियंत्रण ठेवणारे एफडीएचे अधिकारी आणि गुटखा विक्रेत्यांचे लागेबांधे कोणत्या थराला गेले आहेत याचे भयंकर उदाहरण विधिमंडळात पहायला मिळाले.

- अतुल कुलकर्णीराज्यात गुटखाबंदी असली तरी त्याची राजरोस विक्री होत आहे. यावर नियंत्रण ठेवणारे एफडीएचे अधिकारी आणि गुटखा विक्रेत्यांचे लागेबांधे कोणत्या थराला गेले आहेत याचे भयंकर उदाहरण विधिमंडळात पहायला मिळाले. तुम्ही गुटख्याच्या विरोधात लक्षवेधी का लावली, सीआयडी चौकशीचा आग्रह का धरला आर.डी. आकरुपे नावाचा अधिकारी भाजपाच्या आमदाराला घेऊन थेट विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या दालनात जाब विचारण्यास गेला. गुटख्याच्या व्यवहारातील पैसा अती झाला की व्यवस्थेची भीती वाटेनाशी होते. त्यात राजकारणी जर अधिकाºयांच्या हातात हात घालून काम करू लागले तर ही हिंमत आणखीनच वाढते. त्या अधिकाºयास निलंबित केले गेले पण त्याने प्रश्न सुटणार नाही. भाजपाचे जे आमदार त्या अधिकाºयासोबत मुंडे यांच्या दालनात जाऊन चढ्या आवाजात जाब विचारत होते त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई व्हायला पाहिजे. सगळ्यांना समान न्याय देण्याची भूमिका या अशा गंभीर विषयात घ्यायलाच पाहिजे. नाहीतर ही फक्त मलमपट्टी ठरेल.राज्यात अधिकाºयांच्या मनमानीला राजकारण्यांची साथ राज्याला बिहारच्या दिशेने नेणारी आहे. औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या कहाण्या विधिमंडळात गाजल्या. त्यांना आयुक्त करावे म्हणून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लेखी पत्र दिले होते. दुसरीकडे वर्षानुवर्षे मुंबईत ठाण मांडलेल्या एफडीएच्या १२ अधिकाºयांच्या बदल्या केल्यानंतर ते अधिकारी मॅटमध्ये गेले. तेथे मंत्र्यांचे आदेशही अंधारात ठेवून केस लढवण्यापर्यंत त्यांची मजल गेली. मॅटनेच या सगळ्या गोष्टी उघडकीस आणल्या. तरीही मंत्र्यांना पणाला लावणाºया एकाही अधिकाºयावर कोणतीही कारवाई करण्याची हिंमत मंत्री गिरीश बापट यांनी दाखवली नाही. मुक्या जनावरांना लाळ्या खुरकत आजार होऊ नये म्हणून देण्यात येणारी लस वर्षभर दिली गेली नाही. विभागाचे उपसचिव, आयुक्त बेमुर्वतखोर वागले, प्रधान सचिवांनी सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आणल्या, मात्र मंत्री महादेव जानकर यांनी त्या अधिकाºयांनाच अभय दिले आणि विरोधक न्यायिक चौकशीची मागणी करत असताना मुख्यमंत्र्यांनी जानकर अडचणीत येऊ नयेत म्हणून स्वत:च्या पारदर्शी कारभाराला मुरड घालत त्यांना अभय दिले.राज्यपालांचे भाषण मराठीत वाचून दाखवण्याची अखंड परपंरा यावेळी विधिमंडळ अधिकाºयांच्या हलगर्जीपणामुळे मोडीत निघाली. मुख्यमंत्र्यांना त्यासाठी सभागृहात माफी मागावी लागली. त्यांनी या प्रकरणी दोषी असणाºयांना आजच्या आज घरी पाठवा असे सभागृहात सांगितले. राज्यपालांनी याची चौकशी करून कठोर शासन करा असे पत्र पाठवले. मात्र अधिवेशन संपत आले तरी कोणतीही कारवाई झालेली नाही.माहिती अधिकारात ग्रामविकास सचिवांकडे एक अर्ज केला. त्यांनी तो सीएससी ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस लि. कंपनीकडे पाठवला. तेथे काम करणाºया कृष्णन अय्यर या अधिकाºयाने तो अर्ज तीन महिने फिरवत ठेवलाय. तिकडे शैलेश गांधी यांनी माहिती अधिकाराची स्थिती चिंताजनक असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केलीय. हे असे चित्र असताना कसल्या पारदर्शकतेच्या गोष्टी करायच्या? असले बेफिकीर अधिकारी मुख्यमंत्र्यांची बदनामीच करतात हेही लक्षात येत नसेल का? प्रशासनात मंत्री कमकुवत असले की अधिकारी बेफाम सुटतात. याची अनेक उदाहरणे आज पहायला मिळत आहेत. सरकार कुणाचे? अधिकाºयांचे की नेत्यांचे हा प्रश्न राज्यकर्त्यांनीच स्वत:ला विचारावा.