शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सरकार कुणाचे? अधिकाऱ्यांचे की नेत्यांचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 01:17 IST

राज्यात गुटखाबंदी असली तरी त्याची राजरोस विक्री होत आहे. यावर नियंत्रण ठेवणारे एफडीएचे अधिकारी आणि गुटखा विक्रेत्यांचे लागेबांधे कोणत्या थराला गेले आहेत याचे भयंकर उदाहरण विधिमंडळात पहायला मिळाले.

- अतुल कुलकर्णीराज्यात गुटखाबंदी असली तरी त्याची राजरोस विक्री होत आहे. यावर नियंत्रण ठेवणारे एफडीएचे अधिकारी आणि गुटखा विक्रेत्यांचे लागेबांधे कोणत्या थराला गेले आहेत याचे भयंकर उदाहरण विधिमंडळात पहायला मिळाले. तुम्ही गुटख्याच्या विरोधात लक्षवेधी का लावली, सीआयडी चौकशीचा आग्रह का धरला आर.डी. आकरुपे नावाचा अधिकारी भाजपाच्या आमदाराला घेऊन थेट विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या दालनात जाब विचारण्यास गेला. गुटख्याच्या व्यवहारातील पैसा अती झाला की व्यवस्थेची भीती वाटेनाशी होते. त्यात राजकारणी जर अधिकाºयांच्या हातात हात घालून काम करू लागले तर ही हिंमत आणखीनच वाढते. त्या अधिकाºयास निलंबित केले गेले पण त्याने प्रश्न सुटणार नाही. भाजपाचे जे आमदार त्या अधिकाºयासोबत मुंडे यांच्या दालनात जाऊन चढ्या आवाजात जाब विचारत होते त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई व्हायला पाहिजे. सगळ्यांना समान न्याय देण्याची भूमिका या अशा गंभीर विषयात घ्यायलाच पाहिजे. नाहीतर ही फक्त मलमपट्टी ठरेल.राज्यात अधिकाºयांच्या मनमानीला राजकारण्यांची साथ राज्याला बिहारच्या दिशेने नेणारी आहे. औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या कहाण्या विधिमंडळात गाजल्या. त्यांना आयुक्त करावे म्हणून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लेखी पत्र दिले होते. दुसरीकडे वर्षानुवर्षे मुंबईत ठाण मांडलेल्या एफडीएच्या १२ अधिकाºयांच्या बदल्या केल्यानंतर ते अधिकारी मॅटमध्ये गेले. तेथे मंत्र्यांचे आदेशही अंधारात ठेवून केस लढवण्यापर्यंत त्यांची मजल गेली. मॅटनेच या सगळ्या गोष्टी उघडकीस आणल्या. तरीही मंत्र्यांना पणाला लावणाºया एकाही अधिकाºयावर कोणतीही कारवाई करण्याची हिंमत मंत्री गिरीश बापट यांनी दाखवली नाही. मुक्या जनावरांना लाळ्या खुरकत आजार होऊ नये म्हणून देण्यात येणारी लस वर्षभर दिली गेली नाही. विभागाचे उपसचिव, आयुक्त बेमुर्वतखोर वागले, प्रधान सचिवांनी सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आणल्या, मात्र मंत्री महादेव जानकर यांनी त्या अधिकाºयांनाच अभय दिले आणि विरोधक न्यायिक चौकशीची मागणी करत असताना मुख्यमंत्र्यांनी जानकर अडचणीत येऊ नयेत म्हणून स्वत:च्या पारदर्शी कारभाराला मुरड घालत त्यांना अभय दिले.राज्यपालांचे भाषण मराठीत वाचून दाखवण्याची अखंड परपंरा यावेळी विधिमंडळ अधिकाºयांच्या हलगर्जीपणामुळे मोडीत निघाली. मुख्यमंत्र्यांना त्यासाठी सभागृहात माफी मागावी लागली. त्यांनी या प्रकरणी दोषी असणाºयांना आजच्या आज घरी पाठवा असे सभागृहात सांगितले. राज्यपालांनी याची चौकशी करून कठोर शासन करा असे पत्र पाठवले. मात्र अधिवेशन संपत आले तरी कोणतीही कारवाई झालेली नाही.माहिती अधिकारात ग्रामविकास सचिवांकडे एक अर्ज केला. त्यांनी तो सीएससी ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस लि. कंपनीकडे पाठवला. तेथे काम करणाºया कृष्णन अय्यर या अधिकाºयाने तो अर्ज तीन महिने फिरवत ठेवलाय. तिकडे शैलेश गांधी यांनी माहिती अधिकाराची स्थिती चिंताजनक असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केलीय. हे असे चित्र असताना कसल्या पारदर्शकतेच्या गोष्टी करायच्या? असले बेफिकीर अधिकारी मुख्यमंत्र्यांची बदनामीच करतात हेही लक्षात येत नसेल का? प्रशासनात मंत्री कमकुवत असले की अधिकारी बेफाम सुटतात. याची अनेक उदाहरणे आज पहायला मिळत आहेत. सरकार कुणाचे? अधिकाºयांचे की नेत्यांचे हा प्रश्न राज्यकर्त्यांनीच स्वत:ला विचारावा.