शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

खाण अवलंबितांच्या आंदोलनामागचा बोलविता धनी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 19:39 IST

गेला आठवडा तथाकथित खाण अवलंबित शहरात येऊन हजारोंच्या संख्येने प्रमुख नेत्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत.

- राजू नायकगेला आठवडा तथाकथित खाण अवलंबित शहरात येऊन हजारोंच्या संख्येने प्रमुख नेत्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. फेब्रुवारीपासून गोव्यात खाणी बंद आहेत. त्या सुरू व्हाव्यात म्हणून राजकीय पक्षांना वेठीस धरणे आणि पर्यायाने केंद्राला आपली दखल घ्यायला भाग पाडण्याचा हा प्रयत्न आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने अध्यादेश काढून खाणी सुरू करणे शक्य नसल्याची भूमिका यापूर्वीच जाहीर केली आहे. त्यानंतर खाण अवलंबितांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व गोवा फॉरवर्ड या सरकारातील घटक पक्षांच्या नेत्यांच्या घरांसमोर निदर्शने केली.दोन-तीन हजार लोक शहरामध्ये येतात. शिस्तबद्ध आंदोलन करतात. प्रसारमाध्यमे त्यांना प्रसिद्धी देतात. पुन्हा एकदा दिल्लीला जाऊन पंतप्रधान व पक्षाध्यक्षांची भेट घेण्याचा मनसुबा त्यांनी जाहीर केला आहे. एकेकाळी सांगितले जायचे की २० हजार खाण अवलंबित गोव्यात आहेत; परंतु खाणी तीन वर्षांत दोन टप्प्यांत बंद झाल्या. त्यानंतर अवलंबितांमध्ये घट होत गेली. लोकांनी पर्यायी रोजगार शोधला. आता ती संख्या चार-पाच हजार असू शकते. हे पाच हजार लोक सरकारने आपले धोरण बदलावे यासाठी नित्य नव्या चाली खेळतात.परंतु धोरण बदलणे तेवढे सोपे आहे?, आपल्या घटनेतच नैसर्गिक मालमत्तेचे वितरण फुकटात करू नये, अशी तरतूद आहे. गोवा मुक्तीपूर्वी खाण लिजेस मोफत देऊन अवघ्या काही खाण कंपन्यांची चांदी करण्यात आली. २०१५पर्यंत या कंपन्या छप्पर फाडके म्हणजे २५ हजार कोटी फायदा कमावत होत्या. त्यातून त्यांनी प्रमुख राजकीय पक्ष, स्थानिक पंचायती व स्थानिक व्यवहार आपल्या ताब्यात ठेवले. आज ही यंत्रणा खाण अवलंबितांच्या नावे व्यवस्था वेठीस धरून आपले हक्क मागते.परंतु, हे जे हक्क ते मागताहेत ते घटनात्मकदृष्ट्या अवैध आहेतच, शिवाय काही कंपन्यांची चांदी करून देत राज्याला आर्थिक नुकसानीत ढकलत आहेत. या लोह खनिज खाणींच्या लिजांचा लिलाव केल्यास राज्य सरकारच्या तिजोरीत एक लाख कोटींचा महसूल प्राप्त होऊ शकतो. राज्याचा अर्थसंकल्प १० हजार कोटींचा असून सतत नवे कर लादले जात असल्याने व खाणपट्ट्यातील कल्याणकारी योजनांवरही खर्च करावा लागत असल्याने सरकारी खर्चाचा बोजा वाढत चालला आहे. अर्थतज्ज्ञ मानतात की खाणींच्या लिजांचा लिलाव झाल्यास नवे कर लादण्याची आवश्यकता न भासता भविष्यातील पिढ्यांसाठीही योजना तयार करणे राज्य सरकारला शक्य होणार आहे.राजधानीत धडक देऊन सरकारला वेठीस धरू पाहाणारे तथाकथित खाण अवलंबित नेमके गाफील राहातात ते येथे. खाणी बंद झाल्याने त्यांची रोजीरोटी बंद झाली असली तरी आपल्यासाठी काही न मागता खाण कंपन्यांची तरफदारी ते करतात, त्यातच त्यांच्या आंदोलनाचे अपयश आहे. आपले हित साधण्यासाठी त्याच खाण कंपन्यांना लिजेस द्या, अशी मागणी ते करतात. त्यामागे चुकार आणि भ्रष्ट कंपन्यांचीच त्यांना फूस असल्याचे स्पष्ट होते. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात खाणविषयक सुनावणी चालू असताना दिल्लीच्या प्रमुख वृत्तपत्रांमध्ये संपूर्ण पान जाहिराती खाण अवबंलितांच्या वतीने प्रसिद्ध व्हायच्या. तुम्ही जर आर्थिकदृष्ट्या कंगाल बनला असाल तर या जाहिराती देण्याची ताकद तुमच्यात कशी, मोठ्या कंपन्याही आपला माल विकताना एवढ्या जाहिराती देत नाहीत, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला होता. त्यामागे खाण कंपन्याच असल्याचा अंदाज न्यायालयाने व्यक्त केला होता.दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेण्यासाठीही ‘गरीब-बिचारे’ अवलंबित विमानाने जातात. दिल्लीतील त्यांची आंदोलनेही ‘पंचतारांकित’ असतात. तुम्हाला कोण निधी देतो, असा सवाल येथील नागरिकही करीत असतात. दुर्दैवाने एका बाजूला या अवलंबितांना पैसे पुरविताना खाणींचा ज्यांच्यावर परिणाम झालाय, त्यांना पाणी आणि प्रदूषणमुक्त सोयी पुरवायला खाण कंपन्यांनी ठाम नकार दिला आहे. सरकारही त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे न्यायालयाचेही गोव्यातील घडामोडींकडे लक्ष लागले असून केंद्राने वटहुकूम काढून खाण कंपन्यांकडे मेहरनजर केल्यास न्यायालयाचा बडगा बसेल हे निश्चित आहे. म्हणूनच केंद्र सरकारने या आंदोलनाकडे अजूनपर्यंत दुर्लक्ष करण्याची भूमिका ठेवली आहे.

टॅग्स :Mining Scamखाण घोटाळा