शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

कर्तृत्वशून्य कारभाराचा जाब कुणाला विचारायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 22:56 IST

हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानंतर होणारे दु:ख विसरुन भाजपने तीन महिन्यांत पहिल्यांदा रस्त्यावर उतरुन राज्यव्यापी धरणे आंदोलन केले.

मिलिंद कुलकर्णीहातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानंतर होणारे दु:ख विसरुन भाजपने तीन महिन्यांत पहिल्यांदा रस्त्यावर उतरुन राज्यव्यापी धरणे आंदोलन केले. ‘मी पुन्हा येईन’ या घोषणेतील फोलपणा महाविकास आघाडीच्या मजबुतीकरणामुळे लक्षात आल्याने प्रदेश अधिवेशनात भाजपला विरोधी पक्षाची भूमिका नाईलाजाने स्विकारावी लागलेली दिसत आहे. सर्वाधिक आमदार असतानाही सत्तेपासून वंचित रहावे लागले आहे; याचे दु:ख जेवढे आहे, त्यापेक्षा भीती ही आहे की, सत्तेसाठी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अन्य पक्षीयांना ‘घरवापसी’चे वेध लागले तर थोपवायचे कसे? म्हणून महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची वारंवार घोषणा केली गेली; परंतु किमान समान कार्यक्रमावर गठीत झालेल्या या सरकारने वादग्रस्त विषय समोर आले तरी सामोपचार आणि सामंजस्याने ते सोडवित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपपुढे संघर्षाशिवाय पर्याय राहिलेला नाही. प्रबळ विरोधी पक्ष म्हणून भूमिका घेण्याच्या या भाजपच्या कृतीचे स्वागत करायला हवे. कोणत्याही सरकारवर विरोधी पक्षाचा अंकुश राहिला तर जनहितविरोधी निर्णय घेण्यास सरकार धजावत नाही.भाजपने धरणे आंदोलनासाठी काही मुद्दे हाती घेतले होते. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु आणि अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना २५ हजार रुपये मदत करु ही आश्वासने महाविकास आघाडीने पाळली नाही, हा पहिला मुद्दा होता. तर दुसºया मुद्यात गुन्हेगारांना धाक न राहिल्याने महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे या गंभीर समस्येला हात घातला आहे. भाजपने महत्त्वाच्या प्रश्नांवर संघर्ष सुरु केला आहे. कर्जमाफी, कर्जमुक्ती यासंबंधी सरकारला निश्चित शेतकºयांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा लागेल. आंध्रच्या धर्तीवर कायदा करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी हिंगणघाटच्या घटनेनंतर केले होते, आता अधिवेशनात ते विधेयक आणण्याची जबाबदारी सरकारची आहे. भाजपने दबाव वाढविला आहे, आणि तो रास्त म्हणावा लागेल.अवघ्या तीन महिन्यात सरकारची संभावना ही विश्वासघातकी अशी करणाºया भाजपने आता स्वत:च्या ताब्यात असलेल्या केंद्र सरकार, जिल्हा परिषदा, पालिकांमधील कारभाराची जबाबदारीदेखील घ्यायला हवी. तेथील कर्तृत्वशून्य नेतृत्व, दिशाहीन कारभार, भ्रष्टाचाराचे होणारे आरोप आणि या सर्वांंचा जनसामान्यांच्या जीवनावर होणारा विपरीत परिणाम याचा जाब कोणाला विचारायचा आणि कोणी विचारायचा हेदेखील भाजपने एकदा स्पष्ट करावे. खान्देशचा विचार केला तर चारही खासदार हे भाजपचे आहेत. गेल्या सहा वर्षांपासून केंद्रात भाजपचे सरकार आहे. मात्र राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचा घोळ काही संपता संपेना. चार खासदार आणि या कामाशी संबंधित मंत्री नेमके करतात काय, हा प्रश्न आता जनतेला पडला आहे.तीच अवस्था जळगाव जिल्हा परिषद, जळगाव आणि धुळे महापालिका यांची आहे. अमृत पाणी योजना, मल निस्सारण योजना, घनकचरा प्रकल्प या केंद्र व राज्य शासनाशी निगडीत योजना सुरळीतपणे राबविल्या न गेल्याने पालिका आणि ठेकेदारांमध्ये वाद निर्माण झाले आहेत. त्याचा परिणाम असा झाला आहे की, मुदतीत कामे झाली नाही, त्यामुळे पुन्हा मुदतवाढ द्यावी लागली. ही कामे पूर्ण झाल्याशिवाय रस्त्यांची कामे न करण्याचे आदेश राज्य शासनाने यापूर्वीच दिले आहेत. त्यामुळे रस्ते खड्डेमय झाले आहे. धूळ आणि धुराने नागरिक हैराण झाले आहेत. दोन्ही शहरे बकाल झाली आहेत. अतिक्रमणांना सत्ताधारी पदाधिकारी व नगरसेवक अभय देत असल्याने प्रशासनाचे हात बांधले आहेत. ‘एक वर्षात विकास करुन दाखवू, १०० कोटींचा निधी आणू, ८०० कोटींचा निधी आणला ’ अशा वल्गना करणारे नेते आता कोणत्या बिळात जाऊन बसले आहेत, हे सामान्य नागरिकांना कळायला मार्ग नाही. राज्य सरकारची तीन महिन्यात परीक्षा घेणाºया भाजपने स्वत:च्या ताब्यातील संस्थांचा कारभार तरी सुरळीत आणि प्रामाणिकपणे केला तर नागरिकांचे किमान आशीर्वाद तरी पुढील निवडणुकीत त्यांना मिळतील, अन्यथा राज्याप्रमाणे जिल्हा परिषदा आणि पालिकादेखील गमावण्याची वेळ भाजपवर येऊ शकते. विरोधी पक्षाचा अनुभव असल्याने ही भूमिका भाजप स्थानिक पातळीवर चांगली निभावू शकेल, असे जनतेला वाटू लागेल.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव