शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

पांढरीशुभ्र साडी, डोक्यावर पदर.. आवाजात मादक ठसक्याची आग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 08:42 IST

तमाशाच्या रांगड्या फडातून लावणीला बाहेर काढून बैठकीत आणण्याचे आणि प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय नि:संशय सुलोचना चव्हाण यांनाच दिले पाहिजे! 

- संजीव साबडे, ज्येष्ठ पत्रकार

लावण्य आणि शृंगाराचा ठसठशीतपणा तितक्याच ठसकेबाज पद्धतीने मांडताना सात्विक सादरीकरण खूपच अवघड. त्यामुळे कैक वर्षे आपल्याकडे फडाची लावणी केवळ पुरुषांपुरतीच मर्यादित राहिली. धाट, भाषा, तिचा धारदारपणा आणि किंचित अप्रत्यक्ष चावट शारीर उल्लेख यामुळे ‘लावणी’ हा लोककला प्रकार घराच्याच नव्हे, तर गावाबाहेरच्या तंबूपुरता मर्यादित राहिला. लावणीला फडातून बाहेर काढून बैठकीत आणण्याचे आणि प्रतिष्ठा मिळवून देण्याचे कामे अनेक गायिकांनी केले असले तरी त्याचे प्रामुख्याने श्रेय सुलोचना चव्हाण यांनाच दिले जाते. 

लावणी सम्राज्ञी  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुलोचनाबाईंच्या धारदार आवाजाचा ठसका कायम कानात रुंजी घालत राहील. उषा मंगेशकर, आशा भोसले, रोशन सातारकर, सुरेखा पुणेकर, शोभा गुर्टू, अलीकडचा तरुण आवाज बेला शेंडे अशा जवळपास सर्व मराठी गायिकांनी अनेक लावण्या म्हटल्या आहेत. त्या लोकप्रियही झाल्या आहेत. पण लावणी आणि सुलोचनाबाई यांचे कायम अतूट नाते राहिले, ते त्यांच्या आवाजामुळे. कळीदार कपुरी पान, पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, मला हो म्हणतात लवंगी मिरची, पाडाला पिकलाय आंबा, सोळावं वरीस धोक्याचं, खेळताना रंग बाई होळीचा, कसं काय पाटील बरं हाय का या त्यांनी गायलेल्या लावण्या आजही हृदयात स्थान करून आहेत. काही वेळा लावणी आठवते, पण गायिका माहीत नसते. सुलोचनाबाईंच्या लावणीबाबत तसे कधीच झाले वा होणार नाही. याचे कारण त्यांच्या आवाजातील ठसका आणि मादकता. ग्रामीण भागांतील लोकसंस्कृतीचा भाग असलेल्या ‘लावणी’ला शहरांत आणि मध्यमवर्गीय घराघरांत पोहोचवण्यात सर्वात मोठे योगदान सुलोचनाबाईंचे! पूर्वी बहुतांशी मराठी चित्रपट तमाशाप्रधान होते. एखाद दुसरी लावणी असायलाच हवी, असा आग्रह असायचा. अशा वेळी सुलोचना चव्हाण यांचेच नाव पुढे यायचे. सुमारे सहा दशके त्यांच्या लावण्यांनी रसिकांना वेडे केले. 

जेव्हा फडाची लावणी लोकप्रिय होती, तेव्हा सुलोचनाबाईंनी बसून, हातवारे व कोणतेही अंगविक्षेप न करता लावण्या सादर केल्या. पांढरीशुभ्र साडी, डोक्यावर पदर आणि चेहऱ्यावर विनम्र भाव असलेल्या सुलोचनाबाई मंचावर यायच्या. मात्र, त्यांनी गायला सुरुवात केली की सारा माहोल बदलून जाई. प्रेक्षकांतून फर्माईशी येत, शिट्ट्या येत, काही जण तर पैसे उडवत, समोर नाचायला सुरुवात करीत. पण गातानाही चेहऱ्यावर मार्दव असणाऱ्या या गायिकेने प्रेक्षकांच्या असल्या थेरांकडे कायम दुर्लक्ष केले. गाणी संपली की प्रेक्षकांना वाकून नमस्कार करून त्या तत्काळ रंगमंचाच्या मागे निघून जात. पारंपरिक बैठकीच्या लावणीतही अदाकारी असते. पण सुलोचनाबाईंनी तिलाही थारा दिला नाही. अदाकारीपेक्षा स्वतःच्या आवाजावर त्यांची भिस्त होती. त्यांची लावणी गातानाची छायाचित्रे पाहिल्यास त्या भक्तिगीत म्हणत असाव्यात, असाच भास होईल. जागी हो जानकी, न्याहारी कृष्णाची घेऊनी अशा भक्तिरस असलेल्या अनेक लावण्या त्यांच्या नावावर आहेत. 

आपल्याकडे लोककलेची बराच काळ उपेक्षा झाली.  सुलोचना चव्हाण यांच्या बाबतीतही तेच झाले. त्यांना यावर्षी म्हणजे कारकिर्दीच्या अखेरच्या काळात ‘पद्मश्री’ किताब दिला गेला. लहानसहान पुरस्कार खूप मिळाले; पण बड्या संस्थांनी त्यांच्या कार्याचा गौरव उशिराच केला. अर्थात सुलोचनाबाईंनी कधी त्याची पर्वा केली नाही. सुरुवातीच्या काळात कार्यक्रमाची बिदागीही अत्यल्प असे. काही जण तर ठरल्यापेक्षा कमी देत. त्यांचे पुत्र व प्रख्यात ढोलकीपटू विजय चव्हाण यांनी मात्र नंतर अशा मंडळींना दूर केले; तेव्हा कुठे सुलोचनाबाईंना थोडाफार पैसा दिसू लागला. बैठकीच्या, नृत्य व अदाकारीच्या लावणीला समाजात मान्यता मिळत असताना त्यासाठी आयुष्य घालविलेल्या सुलोचनाबाई आता हयात नाहीत, त्यांच्या लावणीचा ठसका मात्र कधीही उणावणार नाही! sanjeevsabade1@gmail.com