शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
5
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
6
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
7
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
8
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
9
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
10
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
11
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
12
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
13
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
14
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
15
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
16
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
17
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
18
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
19
IPL Auction 2026 LIVE: नवोदित कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, अकिब जावेदवर पैशांचा पाऊस, लागल्या विक्रमी बोली
20
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पांढरीशुभ्र साडी, डोक्यावर पदर.. आवाजात मादक ठसक्याची आग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 08:42 IST

तमाशाच्या रांगड्या फडातून लावणीला बाहेर काढून बैठकीत आणण्याचे आणि प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय नि:संशय सुलोचना चव्हाण यांनाच दिले पाहिजे! 

- संजीव साबडे, ज्येष्ठ पत्रकार

लावण्य आणि शृंगाराचा ठसठशीतपणा तितक्याच ठसकेबाज पद्धतीने मांडताना सात्विक सादरीकरण खूपच अवघड. त्यामुळे कैक वर्षे आपल्याकडे फडाची लावणी केवळ पुरुषांपुरतीच मर्यादित राहिली. धाट, भाषा, तिचा धारदारपणा आणि किंचित अप्रत्यक्ष चावट शारीर उल्लेख यामुळे ‘लावणी’ हा लोककला प्रकार घराच्याच नव्हे, तर गावाबाहेरच्या तंबूपुरता मर्यादित राहिला. लावणीला फडातून बाहेर काढून बैठकीत आणण्याचे आणि प्रतिष्ठा मिळवून देण्याचे कामे अनेक गायिकांनी केले असले तरी त्याचे प्रामुख्याने श्रेय सुलोचना चव्हाण यांनाच दिले जाते. 

लावणी सम्राज्ञी  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुलोचनाबाईंच्या धारदार आवाजाचा ठसका कायम कानात रुंजी घालत राहील. उषा मंगेशकर, आशा भोसले, रोशन सातारकर, सुरेखा पुणेकर, शोभा गुर्टू, अलीकडचा तरुण आवाज बेला शेंडे अशा जवळपास सर्व मराठी गायिकांनी अनेक लावण्या म्हटल्या आहेत. त्या लोकप्रियही झाल्या आहेत. पण लावणी आणि सुलोचनाबाई यांचे कायम अतूट नाते राहिले, ते त्यांच्या आवाजामुळे. कळीदार कपुरी पान, पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, मला हो म्हणतात लवंगी मिरची, पाडाला पिकलाय आंबा, सोळावं वरीस धोक्याचं, खेळताना रंग बाई होळीचा, कसं काय पाटील बरं हाय का या त्यांनी गायलेल्या लावण्या आजही हृदयात स्थान करून आहेत. काही वेळा लावणी आठवते, पण गायिका माहीत नसते. सुलोचनाबाईंच्या लावणीबाबत तसे कधीच झाले वा होणार नाही. याचे कारण त्यांच्या आवाजातील ठसका आणि मादकता. ग्रामीण भागांतील लोकसंस्कृतीचा भाग असलेल्या ‘लावणी’ला शहरांत आणि मध्यमवर्गीय घराघरांत पोहोचवण्यात सर्वात मोठे योगदान सुलोचनाबाईंचे! पूर्वी बहुतांशी मराठी चित्रपट तमाशाप्रधान होते. एखाद दुसरी लावणी असायलाच हवी, असा आग्रह असायचा. अशा वेळी सुलोचना चव्हाण यांचेच नाव पुढे यायचे. सुमारे सहा दशके त्यांच्या लावण्यांनी रसिकांना वेडे केले. 

जेव्हा फडाची लावणी लोकप्रिय होती, तेव्हा सुलोचनाबाईंनी बसून, हातवारे व कोणतेही अंगविक्षेप न करता लावण्या सादर केल्या. पांढरीशुभ्र साडी, डोक्यावर पदर आणि चेहऱ्यावर विनम्र भाव असलेल्या सुलोचनाबाई मंचावर यायच्या. मात्र, त्यांनी गायला सुरुवात केली की सारा माहोल बदलून जाई. प्रेक्षकांतून फर्माईशी येत, शिट्ट्या येत, काही जण तर पैसे उडवत, समोर नाचायला सुरुवात करीत. पण गातानाही चेहऱ्यावर मार्दव असणाऱ्या या गायिकेने प्रेक्षकांच्या असल्या थेरांकडे कायम दुर्लक्ष केले. गाणी संपली की प्रेक्षकांना वाकून नमस्कार करून त्या तत्काळ रंगमंचाच्या मागे निघून जात. पारंपरिक बैठकीच्या लावणीतही अदाकारी असते. पण सुलोचनाबाईंनी तिलाही थारा दिला नाही. अदाकारीपेक्षा स्वतःच्या आवाजावर त्यांची भिस्त होती. त्यांची लावणी गातानाची छायाचित्रे पाहिल्यास त्या भक्तिगीत म्हणत असाव्यात, असाच भास होईल. जागी हो जानकी, न्याहारी कृष्णाची घेऊनी अशा भक्तिरस असलेल्या अनेक लावण्या त्यांच्या नावावर आहेत. 

आपल्याकडे लोककलेची बराच काळ उपेक्षा झाली.  सुलोचना चव्हाण यांच्या बाबतीतही तेच झाले. त्यांना यावर्षी म्हणजे कारकिर्दीच्या अखेरच्या काळात ‘पद्मश्री’ किताब दिला गेला. लहानसहान पुरस्कार खूप मिळाले; पण बड्या संस्थांनी त्यांच्या कार्याचा गौरव उशिराच केला. अर्थात सुलोचनाबाईंनी कधी त्याची पर्वा केली नाही. सुरुवातीच्या काळात कार्यक्रमाची बिदागीही अत्यल्प असे. काही जण तर ठरल्यापेक्षा कमी देत. त्यांचे पुत्र व प्रख्यात ढोलकीपटू विजय चव्हाण यांनी मात्र नंतर अशा मंडळींना दूर केले; तेव्हा कुठे सुलोचनाबाईंना थोडाफार पैसा दिसू लागला. बैठकीच्या, नृत्य व अदाकारीच्या लावणीला समाजात मान्यता मिळत असताना त्यासाठी आयुष्य घालविलेल्या सुलोचनाबाई आता हयात नाहीत, त्यांच्या लावणीचा ठसका मात्र कधीही उणावणार नाही! sanjeevsabade1@gmail.com