शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
3
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
4
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
5
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
6
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
7
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
8
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
9
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
10
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
11
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
12
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
13
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
14
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
15
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
16
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
17
'हीरामंडी'मधील या अभिनेत्रीला आला होता कास्टिंग काउचचा अनुभव, म्हणाली...
18
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
19
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठी, रायबरेलीतील उमेदवारांबाबत काय म्हणाल्या मनेका गांधी?
20
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी

दुकानदारी कुणाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:25 AM

चांगले विचार, सकारात्मक काम करण्याची इच्छाशक्ती, चुकीच्या गोष्टींना पाठीशी न घालण्याची वृत्ती आणि स्वच्छ प्रतिमेमुळे ते कायम माध्यमांचे आवडते आहेत.

देवेंद्र फडणवीस हे माध्यमांचे आवडते मुख्यमंत्री. चांगले विचार, सकारात्मक काम करण्याची इच्छाशक्ती, चुकीच्या गोष्टींना पाठीशी न घालण्याची वृत्ती आणि स्वच्छ प्रतिमेमुळे ते कायम माध्यमांचे आवडते आहेत. कधीही त्यांच्यावर टोकाची टीका या कार्यकाळात झालेली नाही. मात्र गुरुवारी भाजपाच्या बैठकीत त्यांनी भाषण करताना माध्यमांवर न पटणारी टीका तर केलीच शिवाय ‘सब घोडे बारा टक्के’ या न्यायाने चांगले काम करणाºयांचे त्यांनी अत्यंत हीन शब्दात मोजमाप केले. माध्यमे दुकानदारी करतात, वाईट शोधण्याचेच काम करतात, आपल्यातील उणीदुणी काढतात असेही ते म्हणाले. मात्र अशी टीका करताना अनेक गोष्टी ते विसरले. फडणवीस विरोधी पक्षात असताना याच दुकानदारांनी त्यांना मदत केली होती. तेव्हाचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे प्रत्येक भाषणाची सुरुवात करतात, ते आपल्याला बोलू देत नाहीत याचीही खंत त्यांनी त्यावेळी बोलून दाखवली होती. त्यावेळी त्या दुकानदारांनी त्यांच्या बातम्या छापल्या होत्या. पुढे खडसेंनी अनेक विषयात त्यांना बोलण्याची संधी आधी दिली होती. पुढे याच खडसेंना स्वत:च्या पक्षाच्या सरकारमध्ये आल्यानंतर व त्यांचे मंत्रिपद गेल्यानंतर एमआयडीसीचा एक जीआर मिळावा म्हणून थेट विधानसभेत अध्यक्षांना साकडे घालावे लागले. तरीही त्यांना तो जीआर मिळाला नाहीच. प्रकाश मेहता, सुभाष देसाई या मंत्र्यांवरच्या आरोपावर कारवाईच्या घोषणा झाल्या पण कृती काहीच नाही, विनोद तावडे, पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या येतात मग अशा गोष्टीेंचे विश्लेषण माध्यमांनी केले तर त्यांना थेट दुकानदार ठरवणे हा तर एककल्लीपणा झाला. माध्यमांचे कामच समाजातील चुकीच्या गोष्टी शोधण्याचे, त्यावर प्रहार करण्याचे असते. ‘‘खिचों ना कमानों को, ना तलवार निकालो, जब तोफ मुकाबिल हो, तो अखबार निकालो,’’ हा अकबर इलाहाबादींचा शेर आजचा नाही. अनेक वर्षांपूर्वी त्यांनी माध्यमांचे महत्त्व सांगताना हे लिहून ठेवले होते. माध्यमे कायम चुकीच्या गोष्टीवर प्रहार करत असतातच. याच माध्यमांनी रान उठवले म्हणूनच देशात, राज्यात सत्ताबदल झाला. सत्तेची फळं फडणवीस यांना मिळाली. त्याची परतफेड सगळ्या माध्यमांनाच दुकानदार ठरवून करावी हे दुर्दैव. फडणवीस यांच्याकडून हे अपेक्षित नाही. ते सुसंस्कृत राजकारणी आहेत. दुसरे कुणी असे बोलले असते तर त्याचे फार वाटले नसते पण फडणवीस यांनी असे विधान करुन त्या राजकारण्यांमध्ये आणि आपल्यात फरक नाही हे दाखवून दिले आहे. माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर २४ तासाच्या आत खुलासा पाठवलाच पाहिजे, सरकारची बाजू पाठवलीच पाहिजे, असे लेखी आदेश काढणारे फडणवीस त्यांच्याच मंत्र्यांवर आरोप होत असताना गप्प बसतातच शिवाय माध्यमांच्या टीकेकडे लक्ष देऊ नका, असेही जाहीरपणे सांगतात तेंव्हा त्यांच्या कथनी आणि करणीत अंतर दिसू लागते. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे तुम्ही तरी निदान अन्य राजकारण्यांसारखे वागू नये हीच या क्षेत्रात चांगले काम करणाºया दुकानदारांकडून माफक अपेक्षा.