शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

दुकानदारी कुणाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:25 IST

चांगले विचार, सकारात्मक काम करण्याची इच्छाशक्ती, चुकीच्या गोष्टींना पाठीशी न घालण्याची वृत्ती आणि स्वच्छ प्रतिमेमुळे ते कायम माध्यमांचे आवडते आहेत.

देवेंद्र फडणवीस हे माध्यमांचे आवडते मुख्यमंत्री. चांगले विचार, सकारात्मक काम करण्याची इच्छाशक्ती, चुकीच्या गोष्टींना पाठीशी न घालण्याची वृत्ती आणि स्वच्छ प्रतिमेमुळे ते कायम माध्यमांचे आवडते आहेत. कधीही त्यांच्यावर टोकाची टीका या कार्यकाळात झालेली नाही. मात्र गुरुवारी भाजपाच्या बैठकीत त्यांनी भाषण करताना माध्यमांवर न पटणारी टीका तर केलीच शिवाय ‘सब घोडे बारा टक्के’ या न्यायाने चांगले काम करणाºयांचे त्यांनी अत्यंत हीन शब्दात मोजमाप केले. माध्यमे दुकानदारी करतात, वाईट शोधण्याचेच काम करतात, आपल्यातील उणीदुणी काढतात असेही ते म्हणाले. मात्र अशी टीका करताना अनेक गोष्टी ते विसरले. फडणवीस विरोधी पक्षात असताना याच दुकानदारांनी त्यांना मदत केली होती. तेव्हाचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे प्रत्येक भाषणाची सुरुवात करतात, ते आपल्याला बोलू देत नाहीत याचीही खंत त्यांनी त्यावेळी बोलून दाखवली होती. त्यावेळी त्या दुकानदारांनी त्यांच्या बातम्या छापल्या होत्या. पुढे खडसेंनी अनेक विषयात त्यांना बोलण्याची संधी आधी दिली होती. पुढे याच खडसेंना स्वत:च्या पक्षाच्या सरकारमध्ये आल्यानंतर व त्यांचे मंत्रिपद गेल्यानंतर एमआयडीसीचा एक जीआर मिळावा म्हणून थेट विधानसभेत अध्यक्षांना साकडे घालावे लागले. तरीही त्यांना तो जीआर मिळाला नाहीच. प्रकाश मेहता, सुभाष देसाई या मंत्र्यांवरच्या आरोपावर कारवाईच्या घोषणा झाल्या पण कृती काहीच नाही, विनोद तावडे, पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या येतात मग अशा गोष्टीेंचे विश्लेषण माध्यमांनी केले तर त्यांना थेट दुकानदार ठरवणे हा तर एककल्लीपणा झाला. माध्यमांचे कामच समाजातील चुकीच्या गोष्टी शोधण्याचे, त्यावर प्रहार करण्याचे असते. ‘‘खिचों ना कमानों को, ना तलवार निकालो, जब तोफ मुकाबिल हो, तो अखबार निकालो,’’ हा अकबर इलाहाबादींचा शेर आजचा नाही. अनेक वर्षांपूर्वी त्यांनी माध्यमांचे महत्त्व सांगताना हे लिहून ठेवले होते. माध्यमे कायम चुकीच्या गोष्टीवर प्रहार करत असतातच. याच माध्यमांनी रान उठवले म्हणूनच देशात, राज्यात सत्ताबदल झाला. सत्तेची फळं फडणवीस यांना मिळाली. त्याची परतफेड सगळ्या माध्यमांनाच दुकानदार ठरवून करावी हे दुर्दैव. फडणवीस यांच्याकडून हे अपेक्षित नाही. ते सुसंस्कृत राजकारणी आहेत. दुसरे कुणी असे बोलले असते तर त्याचे फार वाटले नसते पण फडणवीस यांनी असे विधान करुन त्या राजकारण्यांमध्ये आणि आपल्यात फरक नाही हे दाखवून दिले आहे. माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर २४ तासाच्या आत खुलासा पाठवलाच पाहिजे, सरकारची बाजू पाठवलीच पाहिजे, असे लेखी आदेश काढणारे फडणवीस त्यांच्याच मंत्र्यांवर आरोप होत असताना गप्प बसतातच शिवाय माध्यमांच्या टीकेकडे लक्ष देऊ नका, असेही जाहीरपणे सांगतात तेंव्हा त्यांच्या कथनी आणि करणीत अंतर दिसू लागते. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे तुम्ही तरी निदान अन्य राजकारण्यांसारखे वागू नये हीच या क्षेत्रात चांगले काम करणाºया दुकानदारांकडून माफक अपेक्षा.