शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

दुकानदारी कुणाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:25 IST

चांगले विचार, सकारात्मक काम करण्याची इच्छाशक्ती, चुकीच्या गोष्टींना पाठीशी न घालण्याची वृत्ती आणि स्वच्छ प्रतिमेमुळे ते कायम माध्यमांचे आवडते आहेत.

देवेंद्र फडणवीस हे माध्यमांचे आवडते मुख्यमंत्री. चांगले विचार, सकारात्मक काम करण्याची इच्छाशक्ती, चुकीच्या गोष्टींना पाठीशी न घालण्याची वृत्ती आणि स्वच्छ प्रतिमेमुळे ते कायम माध्यमांचे आवडते आहेत. कधीही त्यांच्यावर टोकाची टीका या कार्यकाळात झालेली नाही. मात्र गुरुवारी भाजपाच्या बैठकीत त्यांनी भाषण करताना माध्यमांवर न पटणारी टीका तर केलीच शिवाय ‘सब घोडे बारा टक्के’ या न्यायाने चांगले काम करणाºयांचे त्यांनी अत्यंत हीन शब्दात मोजमाप केले. माध्यमे दुकानदारी करतात, वाईट शोधण्याचेच काम करतात, आपल्यातील उणीदुणी काढतात असेही ते म्हणाले. मात्र अशी टीका करताना अनेक गोष्टी ते विसरले. फडणवीस विरोधी पक्षात असताना याच दुकानदारांनी त्यांना मदत केली होती. तेव्हाचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे प्रत्येक भाषणाची सुरुवात करतात, ते आपल्याला बोलू देत नाहीत याचीही खंत त्यांनी त्यावेळी बोलून दाखवली होती. त्यावेळी त्या दुकानदारांनी त्यांच्या बातम्या छापल्या होत्या. पुढे खडसेंनी अनेक विषयात त्यांना बोलण्याची संधी आधी दिली होती. पुढे याच खडसेंना स्वत:च्या पक्षाच्या सरकारमध्ये आल्यानंतर व त्यांचे मंत्रिपद गेल्यानंतर एमआयडीसीचा एक जीआर मिळावा म्हणून थेट विधानसभेत अध्यक्षांना साकडे घालावे लागले. तरीही त्यांना तो जीआर मिळाला नाहीच. प्रकाश मेहता, सुभाष देसाई या मंत्र्यांवरच्या आरोपावर कारवाईच्या घोषणा झाल्या पण कृती काहीच नाही, विनोद तावडे, पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या येतात मग अशा गोष्टीेंचे विश्लेषण माध्यमांनी केले तर त्यांना थेट दुकानदार ठरवणे हा तर एककल्लीपणा झाला. माध्यमांचे कामच समाजातील चुकीच्या गोष्टी शोधण्याचे, त्यावर प्रहार करण्याचे असते. ‘‘खिचों ना कमानों को, ना तलवार निकालो, जब तोफ मुकाबिल हो, तो अखबार निकालो,’’ हा अकबर इलाहाबादींचा शेर आजचा नाही. अनेक वर्षांपूर्वी त्यांनी माध्यमांचे महत्त्व सांगताना हे लिहून ठेवले होते. माध्यमे कायम चुकीच्या गोष्टीवर प्रहार करत असतातच. याच माध्यमांनी रान उठवले म्हणूनच देशात, राज्यात सत्ताबदल झाला. सत्तेची फळं फडणवीस यांना मिळाली. त्याची परतफेड सगळ्या माध्यमांनाच दुकानदार ठरवून करावी हे दुर्दैव. फडणवीस यांच्याकडून हे अपेक्षित नाही. ते सुसंस्कृत राजकारणी आहेत. दुसरे कुणी असे बोलले असते तर त्याचे फार वाटले नसते पण फडणवीस यांनी असे विधान करुन त्या राजकारण्यांमध्ये आणि आपल्यात फरक नाही हे दाखवून दिले आहे. माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर २४ तासाच्या आत खुलासा पाठवलाच पाहिजे, सरकारची बाजू पाठवलीच पाहिजे, असे लेखी आदेश काढणारे फडणवीस त्यांच्याच मंत्र्यांवर आरोप होत असताना गप्प बसतातच शिवाय माध्यमांच्या टीकेकडे लक्ष देऊ नका, असेही जाहीरपणे सांगतात तेंव्हा त्यांच्या कथनी आणि करणीत अंतर दिसू लागते. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे तुम्ही तरी निदान अन्य राजकारण्यांसारखे वागू नये हीच या क्षेत्रात चांगले काम करणाºया दुकानदारांकडून माफक अपेक्षा.