शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

‘व्हेजी’ फिटनेसचा उद्गाता

By admin | Updated: February 21, 2016 01:34 IST

काय खाताय यापेक्षा किती खाताय? याचा विचार केल्यास योग्य तो परिणाम मिळतो. वजन वाढवणे म्हणजे मसल्स वाढवणे, असा साधा अर्थ घेता येऊ शकतो. त्यासाठी मांसाहार टाळून

(विशेष)

- महेश चेमटेकाय खाताय यापेक्षा किती खाताय? याचा विचार केल्यास योग्य तो परिणाम मिळतो. वजन वाढवणे म्हणजे मसल्स वाढवणे, असा साधा अर्थ घेता येऊ शकतो. त्यासाठी मांसाहार टाळून ध्येयप्राप्ती करू शकतो. ज्या वेळी व्यायाम करतो त्या वेळी शरीरातील ऊर्जा खर्ची पडते. ती भरून काढण्याठी पनीर, मशरुम, सोयाबीन, मोड आलेली कडधान्ये, सलाड, फळे यांचे सेवन करणे फायद्याचे ठरते. व्यायाम आणि शरीर कमावणे म्हटले की मांसाहार हा ओघानेच येतो. पण या विचार आणि कृतीला छेद देण्याचे काम प्रसाद आंजर्लेकर या युवा फिटनेस ट्रेनरने केले आहे. शुद्ध शाकाहारी राहूनही तुम्ही सिक्स पॅक अ‍ॅब्ज करू शकता, असा विश्वास त्याने तरुणांमध्ये निर्माण केला आहे. ‘व्हेजी फिटनेस’ ही चळवळ त्याने त्याच उद्देशाने सुरू केली आहे. शाकाहारातही तुम्हाला बळकट क्षमता आहे, हे त्याने समोर आणले आहे. जिम आणि मांसाहार या समीकरणाला छेद देण्यात तो यशस्वी ठरला आहे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात खाण्या-पिण्याकडे लक्ष नसते. त्यात ‘जिम’साठी वेळ मिळालाच तर, तेथे डाएट प्लॅन दिला जातो. फिटनेससाठी किंबहुना जिममध्ये व्यायाम केल्यानंतर मांसाहार उपयुक्त ठरतो, असा गैरसमज रुजवण्यात आला आहे. या गोष्टीला छेद देत शाकाहारी राहून तंदुरुस्त राहण्याचा नवा फंडा ‘व्हेजी फिटनेस’ची चळवळ रुजवू पाहणाऱ्या प्रसाद आंजर्लेकरने आणला आहे.. निसर्गत: उपलब्ध असणाऱ्या फळभाज्या, पालेभाज्या, कडधान्ये यांच्या आधारेदेखील तंदुरुस्त राहता येते. पीळदार देहयष्टीसाठीही या गोष्टी महत्त्वाची कामगिरी बजावतात. २०१० साली आंतरराष्ट्रीय व्यायामशाळेत ‘पर्सनल ट्रेनर’ म्हणून प्रसादने करियरला सुरुवात केली. निसर्गाने आपल्याला इतके भरभरून दिले असताना, त्याचा योग्य आणि प्रभावी उपयोग केला पाहिजे या जाणिवेतून त्याने ज्येष्ठांचा सल्ला घेऊन ‘व्हेजी फिटनेस’ची संकल्पना प्रत्यक्षात आणली. शरीराची जडणघडण होत असताना निसर्गत: प्रोटिन, कार्बोहायड्रेट आणि फॅट्स यांचा समावेश शरीरात असतो. मुळात तंदुरुस्त राहणे आणि शरीर कमावणे (बॉडी बिल्डिंग) या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. बाह्य शरीर आकर्षक बनविणे हे महत्त्वाचे असले तरी अंतर्गत तंदुरुस्ती तितकीच महत्त्वाची आहे. त्याचबरोबर प्रोटिन, कार्बोहायड्रेट आणि फॅट हे घटक महत्त्वाचे ठरतात. रोजच्या रोज भरपूर पाणी पिणे हे शरीरासाठी फायद्याचे आहे. त्याचबरोबर आपल्याला पुरेशी झोप मिळणेही अत्यंत आवश्यक आहे. शरीराची हालचाल करताना प्रथम आपल्याला कार्बोहायड्रेटमुळे ऊर्जा मिळते. लिहिणे, वाचणे, खेळणे, व्यायाम करणे यामध्ये प्रथम कार्बो नंतर प्रोटिन आणि शेवटी फॅट्सचा वापर शरीराकडून होतो. वजन कमी करताना अनावश्यक फॅट्स कमी करण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. मग त्यात सूर्यनमस्कार असो, झुंबा नृत्य असो वा जिममधले वर्कआऊट असो. येथे होणाऱ्या श्रमांमधूनही वजन कमी करता येते. थोडक्यात योग्य व्यायाम, डाएट आणि आराम या त्रयींमुळे फॅट्स कमी करून तंदुरुस्त राहता येते, असे तो सांगतो.