शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

जिथे द्वंद्व असते तिथेच दुःख असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 15:33 IST

संतांना सुख कसे प्राप्त होते व संसारी जीवाला का प्राप्त होत नाही..?

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

सर्वसामान्य माणसाच्या मनात असे नेहमी येते की आपण प्रपंचात सर्वकाळ सुखी असावे. आपल्याला कधीही दुःख भोगावे लागू नये त्याच दृष्टीने तो सतत प्रयत्न करीत असतो. व्यास महाराज म्हणतात,

संसारे सर्वदा सौख्यं न कदा दुःखमस्तु मे,एषैव वर्तते इच्छा सामान्य जनमानसे

सुखासाठीच मनुष्य प्रत्येक कर्म करीत असतो पण फळ मात्र विपरीत मिळते, असे का..? याचे उत्तर द्यावयाचे झाल्यास प्रत्येक जीव हा नाशिवंत विषयांत सुख शोधतो. या जगात जे जे पदार्थ नाशिवंत आहेत ते शाश्वत सुखाची प्राप्ती करून देतील का..? पहिल्यांदा सुख म्हणजे काय याचा विचार केला पाहिजे.. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात,

किंबहुना सोय, जीव आत्मयाची लाहे,तेथे जे होय, तया नाम सुख..!

जीवाला आत्म्याचा लाभ होणे म्हणजेच सुख. इंद्रिय सुख हे नश्वर व परिणामी दुःखकारकच असते.भागवतकार म्हणतात,

सुखमैद्रिंयकं राजन् स्वर्गे नरक एव चदेहिनां यद्यथा दुःखं तस्मान्नेच्छेत तद् बुधः

आपण म्हणाल, संतांना सुख कसे प्राप्त होते व आम्हाला का प्राप्त होत नाही..? तर याचे उत्तर असे की, संत महात्मे नाशिवंत विषयांत सुख शोधतच नाहीत. त्यांच्या सुखाचा विषयच परमात्मा असतो. त्यांचे चित्त भगवद् स्वरुपाशी रममाण झालेले असते. जिथे द्वंद्व असते तिथेच दुःख असते. या द्वंद्वावाचा परिणाम त्यांच्या जीवनात होतच नाही. संत एकनाथ महाराज म्हणतात,

प्राप्ता प्राप्त लाभावस्था, बाधु न शके साधुच्या चित्ता चित्त घातले भगवंता, या नाव निरपेक्षता

लौकिक जीवनातील एखादी वस्तू मिळावी म्हणून त्यांचे चित्त कधी विचलित होत नाही.संत तुकाराम महाराज म्हणतात,

चित्त चैतन्या पडता मिठीदिसे हरी रूप अवघी सृष्टी

एकदा का चित्त भगवद् स्वरूपाशी एकाग्र झाले की सुख दुःखाच्या कल्पना संपून जातात. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,

का तिन्ही काळ होता, त्रिधा नव्हे सविता तैसा सुख दुःखी चित्ता, भेदु नाही

म्हणून अध्यात्म शास्त्रात समचित्त होण्याच्या साधनेला खूप खूप महत्त्व आहे..!

( लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांच्या संपर्क क्रमांक - 83298 78467 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक