शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

जिथे द्वंद्व असते तिथेच दुःख असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 15:33 IST

संतांना सुख कसे प्राप्त होते व संसारी जीवाला का प्राप्त होत नाही..?

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

सर्वसामान्य माणसाच्या मनात असे नेहमी येते की आपण प्रपंचात सर्वकाळ सुखी असावे. आपल्याला कधीही दुःख भोगावे लागू नये त्याच दृष्टीने तो सतत प्रयत्न करीत असतो. व्यास महाराज म्हणतात,

संसारे सर्वदा सौख्यं न कदा दुःखमस्तु मे,एषैव वर्तते इच्छा सामान्य जनमानसे

सुखासाठीच मनुष्य प्रत्येक कर्म करीत असतो पण फळ मात्र विपरीत मिळते, असे का..? याचे उत्तर द्यावयाचे झाल्यास प्रत्येक जीव हा नाशिवंत विषयांत सुख शोधतो. या जगात जे जे पदार्थ नाशिवंत आहेत ते शाश्वत सुखाची प्राप्ती करून देतील का..? पहिल्यांदा सुख म्हणजे काय याचा विचार केला पाहिजे.. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात,

किंबहुना सोय, जीव आत्मयाची लाहे,तेथे जे होय, तया नाम सुख..!

जीवाला आत्म्याचा लाभ होणे म्हणजेच सुख. इंद्रिय सुख हे नश्वर व परिणामी दुःखकारकच असते.भागवतकार म्हणतात,

सुखमैद्रिंयकं राजन् स्वर्गे नरक एव चदेहिनां यद्यथा दुःखं तस्मान्नेच्छेत तद् बुधः

आपण म्हणाल, संतांना सुख कसे प्राप्त होते व आम्हाला का प्राप्त होत नाही..? तर याचे उत्तर असे की, संत महात्मे नाशिवंत विषयांत सुख शोधतच नाहीत. त्यांच्या सुखाचा विषयच परमात्मा असतो. त्यांचे चित्त भगवद् स्वरुपाशी रममाण झालेले असते. जिथे द्वंद्व असते तिथेच दुःख असते. या द्वंद्वावाचा परिणाम त्यांच्या जीवनात होतच नाही. संत एकनाथ महाराज म्हणतात,

प्राप्ता प्राप्त लाभावस्था, बाधु न शके साधुच्या चित्ता चित्त घातले भगवंता, या नाव निरपेक्षता

लौकिक जीवनातील एखादी वस्तू मिळावी म्हणून त्यांचे चित्त कधी विचलित होत नाही.संत तुकाराम महाराज म्हणतात,

चित्त चैतन्या पडता मिठीदिसे हरी रूप अवघी सृष्टी

एकदा का चित्त भगवद् स्वरूपाशी एकाग्र झाले की सुख दुःखाच्या कल्पना संपून जातात. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,

का तिन्ही काळ होता, त्रिधा नव्हे सविता तैसा सुख दुःखी चित्ता, भेदु नाही

म्हणून अध्यात्म शास्त्रात समचित्त होण्याच्या साधनेला खूप खूप महत्त्व आहे..!

( लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांच्या संपर्क क्रमांक - 83298 78467 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक