शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

जिथे द्वंद्व असते तिथेच दुःख असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 15:33 IST

संतांना सुख कसे प्राप्त होते व संसारी जीवाला का प्राप्त होत नाही..?

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

सर्वसामान्य माणसाच्या मनात असे नेहमी येते की आपण प्रपंचात सर्वकाळ सुखी असावे. आपल्याला कधीही दुःख भोगावे लागू नये त्याच दृष्टीने तो सतत प्रयत्न करीत असतो. व्यास महाराज म्हणतात,

संसारे सर्वदा सौख्यं न कदा दुःखमस्तु मे,एषैव वर्तते इच्छा सामान्य जनमानसे

सुखासाठीच मनुष्य प्रत्येक कर्म करीत असतो पण फळ मात्र विपरीत मिळते, असे का..? याचे उत्तर द्यावयाचे झाल्यास प्रत्येक जीव हा नाशिवंत विषयांत सुख शोधतो. या जगात जे जे पदार्थ नाशिवंत आहेत ते शाश्वत सुखाची प्राप्ती करून देतील का..? पहिल्यांदा सुख म्हणजे काय याचा विचार केला पाहिजे.. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात,

किंबहुना सोय, जीव आत्मयाची लाहे,तेथे जे होय, तया नाम सुख..!

जीवाला आत्म्याचा लाभ होणे म्हणजेच सुख. इंद्रिय सुख हे नश्वर व परिणामी दुःखकारकच असते.भागवतकार म्हणतात,

सुखमैद्रिंयकं राजन् स्वर्गे नरक एव चदेहिनां यद्यथा दुःखं तस्मान्नेच्छेत तद् बुधः

आपण म्हणाल, संतांना सुख कसे प्राप्त होते व आम्हाला का प्राप्त होत नाही..? तर याचे उत्तर असे की, संत महात्मे नाशिवंत विषयांत सुख शोधतच नाहीत. त्यांच्या सुखाचा विषयच परमात्मा असतो. त्यांचे चित्त भगवद् स्वरुपाशी रममाण झालेले असते. जिथे द्वंद्व असते तिथेच दुःख असते. या द्वंद्वावाचा परिणाम त्यांच्या जीवनात होतच नाही. संत एकनाथ महाराज म्हणतात,

प्राप्ता प्राप्त लाभावस्था, बाधु न शके साधुच्या चित्ता चित्त घातले भगवंता, या नाव निरपेक्षता

लौकिक जीवनातील एखादी वस्तू मिळावी म्हणून त्यांचे चित्त कधी विचलित होत नाही.संत तुकाराम महाराज म्हणतात,

चित्त चैतन्या पडता मिठीदिसे हरी रूप अवघी सृष्टी

एकदा का चित्त भगवद् स्वरूपाशी एकाग्र झाले की सुख दुःखाच्या कल्पना संपून जातात. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,

का तिन्ही काळ होता, त्रिधा नव्हे सविता तैसा सुख दुःखी चित्ता, भेदु नाही

म्हणून अध्यात्म शास्त्रात समचित्त होण्याच्या साधनेला खूप खूप महत्त्व आहे..!

( लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांच्या संपर्क क्रमांक - 83298 78467 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक