शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिक बचतीच्या व्याजावर कुठवर जगणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 06:31 IST

वाढती महागाई आणि नियमित उत्पन्न नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे जगणे दिवसेंदिवस अधिक खडतर होत आहे. यावर साकल्याने विचार होणे गरजेचे आहे.

प्रा. डॉ. संजय खडक्कार, माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ वैधानिक विकास मंडळ

महागाई सातत्याने डोके वर काढते आहे. सर्वसामान्यांनाही आपला खर्च भागवणे त्यामुळे कठीण होत चालले आहे. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या हालाला तर पारावारच राहिलेला नाही. ना नोकरी, ना नियमित उत्पन्न, ना इतर काही सोयी.. केवळ विविध ठेवींवर (असतील तर) मिळणारे व्याज, हीच काय ती त्यांच्या उदरनिर्वाहाची तुटपुंजी सोय. पण त्यावरही अनेक बंधने आहेत.

वाढत्या महागाईमुळे ज्येष्ठ नागरिकांना ठेवींवरील व्याजावर जगणे कठीण होत आहे. भरीस भर म्हणजे जे व्याज मिळते, त्यावरही आयकर लागत असल्यामुळे त्यांच्या जीवनाची वाटचाल अजून खडतर होत आहे. वाढत्या महागाईमुळे बचतीच्या व्याजावर आयुष्य व्यतित करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आपले जगणे सुसह्य होण्यासाठी न्याय्य उपाययोजनांची निश्चितच आवश्यकता आहे. सामाजिक न्यायअंतर्गत देशातील ज्येष्ठ नागरिकांना सन्मानजनक परिस्थितीत आयुष्य जगता यावे, यासाठी येत्या अर्थसंकल्पात (दि. २३ जुलै २०२४) ज्येष्ठ नागरिकांच्या बचतीच्या व्याजावरील आयकरातून सूट देण्याचा विचार व्हायला हवा.

देशातील जनतेला जून २०२४ मध्ये महागाईचा मोठा धक्का बसला. गेल्या महिन्यात किरकोळ महागाई ५.०८ टक्क्यांवर पोहोचली. महागाईचा दर असाच वाढत राहिल्यास, ज्येष्ठ नागरिकांना ठेवीवर मिळणाऱ्या व्याजावर गुजारा करणे यापुढे नुसते कठीणच होणार नाही, तर अशक्य होईल. आयकर कलम ८० टीटीबीअंतर्गत बचत बँक खाते, ठेवींवरील व्याजाच्या संदर्भात ज्येष्ठ नागरिक ५०,००० रुपयांपर्यंत कपातीचा दावा करू शकतात. मात्र तेवढे पुरेसे नाही.

ज्येष्ठ नागरिकांना विविध ठेवींद्वारे मिळालेल्या व्याजावर आयकर लागत असेल तर भविष्यात ज्येष्ठ नागरिक त्यांची बचत ठेवींमध्ये न ठेवता सोने, जमीन, स्थावर मालमत्ता, शेअर बाजार इत्यादीत गुंतवण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण अशी गुंतवणूक जोखीमपूर्ण असते व ज्येष्ठ नागरिकांसाठी तेवढी सहज व सुलभ नसते. ठेवींच्या व्याजावरील आयकरामुळे निश्चितच ज्येष्ठ नागरिकांना आपली गुंतवणूक बचत ठेवींमधून काढण्याशिवाय पर्याय असणार नाही. त्यामुळे सरकारलाही विकासासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवी मिळणार नाहीत. मागील आर्थिक वर्षात (२०२३-२०२४) सरकारला ज्येष्ठ नागरिकांना ठेवींवर दिल्या जाणाऱ्या व्याजावर आकारलेल्या आयकरातून तब्बल २७ हजार कोटी रुपये मिळाले आहेत.

मागील एका दशकाहून अधिक काळात भारतीय कुटुंबांच्या आर्थिक बचती, रोख स्वरूपात ठेवलेल्या किंवा बँक ठेवी आणि इतर आर्थिक साधनांमध्ये गुंतवल्या गेलेल्या रकमेत घट होताना दिसते. ती २०११-२०१२ मधील सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) ७.४ टक्क्यांवरून घसरून २०२२-२०२३ मध्ये जीडीपीच्या ५.३ टक्क्यावर येऊन पोहोचली. २०२३-२०२४ मध्ये ती जीडीपीच्या ६ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ही घसरण निश्चितच चिंतेचा विषय आहे.

भारतातील ज्येष्ठ नागरिक प्रामुख्याने आयुष्यभर मेहनतीने कमविलेला पैसा विविध बचत योजनेत ठेवून त्यावर  मिळणाऱ्या व्याजावर आपले आयुष्य सुकर करतो. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक संशोधन विभागाच्या अहवालानुसार देशात ज्येष्ठ नागरिकांची अंदाजे ७४ दशलक्ष मुदत ठेव खाती आहेत, ज्यात एकूण ठेवींची रक्कम ३४ लाख कोटी रुपये आहे. मागील पाच वर्षांमध्ये, ज्येष्ठ नागरिकांची प्रतिठेव सरासरी ४.६ लाख रुपये इतकी झाली आहे, जी पाच वर्षांपूर्वी ३.३ लाख रुपये होती. येत्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांचा साकल्याने विचार होणे सामाजिक न्यायांतर्गत अत्यंत महत्त्वाचे आहे.