शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

ज्येष्ठ नागरिक बचतीच्या व्याजावर कुठवर जगणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 06:31 IST

वाढती महागाई आणि नियमित उत्पन्न नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे जगणे दिवसेंदिवस अधिक खडतर होत आहे. यावर साकल्याने विचार होणे गरजेचे आहे.

प्रा. डॉ. संजय खडक्कार, माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ वैधानिक विकास मंडळ

महागाई सातत्याने डोके वर काढते आहे. सर्वसामान्यांनाही आपला खर्च भागवणे त्यामुळे कठीण होत चालले आहे. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या हालाला तर पारावारच राहिलेला नाही. ना नोकरी, ना नियमित उत्पन्न, ना इतर काही सोयी.. केवळ विविध ठेवींवर (असतील तर) मिळणारे व्याज, हीच काय ती त्यांच्या उदरनिर्वाहाची तुटपुंजी सोय. पण त्यावरही अनेक बंधने आहेत.

वाढत्या महागाईमुळे ज्येष्ठ नागरिकांना ठेवींवरील व्याजावर जगणे कठीण होत आहे. भरीस भर म्हणजे जे व्याज मिळते, त्यावरही आयकर लागत असल्यामुळे त्यांच्या जीवनाची वाटचाल अजून खडतर होत आहे. वाढत्या महागाईमुळे बचतीच्या व्याजावर आयुष्य व्यतित करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आपले जगणे सुसह्य होण्यासाठी न्याय्य उपाययोजनांची निश्चितच आवश्यकता आहे. सामाजिक न्यायअंतर्गत देशातील ज्येष्ठ नागरिकांना सन्मानजनक परिस्थितीत आयुष्य जगता यावे, यासाठी येत्या अर्थसंकल्पात (दि. २३ जुलै २०२४) ज्येष्ठ नागरिकांच्या बचतीच्या व्याजावरील आयकरातून सूट देण्याचा विचार व्हायला हवा.

देशातील जनतेला जून २०२४ मध्ये महागाईचा मोठा धक्का बसला. गेल्या महिन्यात किरकोळ महागाई ५.०८ टक्क्यांवर पोहोचली. महागाईचा दर असाच वाढत राहिल्यास, ज्येष्ठ नागरिकांना ठेवीवर मिळणाऱ्या व्याजावर गुजारा करणे यापुढे नुसते कठीणच होणार नाही, तर अशक्य होईल. आयकर कलम ८० टीटीबीअंतर्गत बचत बँक खाते, ठेवींवरील व्याजाच्या संदर्भात ज्येष्ठ नागरिक ५०,००० रुपयांपर्यंत कपातीचा दावा करू शकतात. मात्र तेवढे पुरेसे नाही.

ज्येष्ठ नागरिकांना विविध ठेवींद्वारे मिळालेल्या व्याजावर आयकर लागत असेल तर भविष्यात ज्येष्ठ नागरिक त्यांची बचत ठेवींमध्ये न ठेवता सोने, जमीन, स्थावर मालमत्ता, शेअर बाजार इत्यादीत गुंतवण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण अशी गुंतवणूक जोखीमपूर्ण असते व ज्येष्ठ नागरिकांसाठी तेवढी सहज व सुलभ नसते. ठेवींच्या व्याजावरील आयकरामुळे निश्चितच ज्येष्ठ नागरिकांना आपली गुंतवणूक बचत ठेवींमधून काढण्याशिवाय पर्याय असणार नाही. त्यामुळे सरकारलाही विकासासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवी मिळणार नाहीत. मागील आर्थिक वर्षात (२०२३-२०२४) सरकारला ज्येष्ठ नागरिकांना ठेवींवर दिल्या जाणाऱ्या व्याजावर आकारलेल्या आयकरातून तब्बल २७ हजार कोटी रुपये मिळाले आहेत.

मागील एका दशकाहून अधिक काळात भारतीय कुटुंबांच्या आर्थिक बचती, रोख स्वरूपात ठेवलेल्या किंवा बँक ठेवी आणि इतर आर्थिक साधनांमध्ये गुंतवल्या गेलेल्या रकमेत घट होताना दिसते. ती २०११-२०१२ मधील सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) ७.४ टक्क्यांवरून घसरून २०२२-२०२३ मध्ये जीडीपीच्या ५.३ टक्क्यावर येऊन पोहोचली. २०२३-२०२४ मध्ये ती जीडीपीच्या ६ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ही घसरण निश्चितच चिंतेचा विषय आहे.

भारतातील ज्येष्ठ नागरिक प्रामुख्याने आयुष्यभर मेहनतीने कमविलेला पैसा विविध बचत योजनेत ठेवून त्यावर  मिळणाऱ्या व्याजावर आपले आयुष्य सुकर करतो. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक संशोधन विभागाच्या अहवालानुसार देशात ज्येष्ठ नागरिकांची अंदाजे ७४ दशलक्ष मुदत ठेव खाती आहेत, ज्यात एकूण ठेवींची रक्कम ३४ लाख कोटी रुपये आहे. मागील पाच वर्षांमध्ये, ज्येष्ठ नागरिकांची प्रतिठेव सरासरी ४.६ लाख रुपये इतकी झाली आहे, जी पाच वर्षांपूर्वी ३.३ लाख रुपये होती. येत्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांचा साकल्याने विचार होणे सामाजिक न्यायांतर्गत अत्यंत महत्त्वाचे आहे.