शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ज्येष्ठ नागरिक बचतीच्या व्याजावर कुठवर जगणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 06:31 IST

वाढती महागाई आणि नियमित उत्पन्न नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे जगणे दिवसेंदिवस अधिक खडतर होत आहे. यावर साकल्याने विचार होणे गरजेचे आहे.

प्रा. डॉ. संजय खडक्कार, माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ वैधानिक विकास मंडळ

महागाई सातत्याने डोके वर काढते आहे. सर्वसामान्यांनाही आपला खर्च भागवणे त्यामुळे कठीण होत चालले आहे. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या हालाला तर पारावारच राहिलेला नाही. ना नोकरी, ना नियमित उत्पन्न, ना इतर काही सोयी.. केवळ विविध ठेवींवर (असतील तर) मिळणारे व्याज, हीच काय ती त्यांच्या उदरनिर्वाहाची तुटपुंजी सोय. पण त्यावरही अनेक बंधने आहेत.

वाढत्या महागाईमुळे ज्येष्ठ नागरिकांना ठेवींवरील व्याजावर जगणे कठीण होत आहे. भरीस भर म्हणजे जे व्याज मिळते, त्यावरही आयकर लागत असल्यामुळे त्यांच्या जीवनाची वाटचाल अजून खडतर होत आहे. वाढत्या महागाईमुळे बचतीच्या व्याजावर आयुष्य व्यतित करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आपले जगणे सुसह्य होण्यासाठी न्याय्य उपाययोजनांची निश्चितच आवश्यकता आहे. सामाजिक न्यायअंतर्गत देशातील ज्येष्ठ नागरिकांना सन्मानजनक परिस्थितीत आयुष्य जगता यावे, यासाठी येत्या अर्थसंकल्पात (दि. २३ जुलै २०२४) ज्येष्ठ नागरिकांच्या बचतीच्या व्याजावरील आयकरातून सूट देण्याचा विचार व्हायला हवा.

देशातील जनतेला जून २०२४ मध्ये महागाईचा मोठा धक्का बसला. गेल्या महिन्यात किरकोळ महागाई ५.०८ टक्क्यांवर पोहोचली. महागाईचा दर असाच वाढत राहिल्यास, ज्येष्ठ नागरिकांना ठेवीवर मिळणाऱ्या व्याजावर गुजारा करणे यापुढे नुसते कठीणच होणार नाही, तर अशक्य होईल. आयकर कलम ८० टीटीबीअंतर्गत बचत बँक खाते, ठेवींवरील व्याजाच्या संदर्भात ज्येष्ठ नागरिक ५०,००० रुपयांपर्यंत कपातीचा दावा करू शकतात. मात्र तेवढे पुरेसे नाही.

ज्येष्ठ नागरिकांना विविध ठेवींद्वारे मिळालेल्या व्याजावर आयकर लागत असेल तर भविष्यात ज्येष्ठ नागरिक त्यांची बचत ठेवींमध्ये न ठेवता सोने, जमीन, स्थावर मालमत्ता, शेअर बाजार इत्यादीत गुंतवण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण अशी गुंतवणूक जोखीमपूर्ण असते व ज्येष्ठ नागरिकांसाठी तेवढी सहज व सुलभ नसते. ठेवींच्या व्याजावरील आयकरामुळे निश्चितच ज्येष्ठ नागरिकांना आपली गुंतवणूक बचत ठेवींमधून काढण्याशिवाय पर्याय असणार नाही. त्यामुळे सरकारलाही विकासासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवी मिळणार नाहीत. मागील आर्थिक वर्षात (२०२३-२०२४) सरकारला ज्येष्ठ नागरिकांना ठेवींवर दिल्या जाणाऱ्या व्याजावर आकारलेल्या आयकरातून तब्बल २७ हजार कोटी रुपये मिळाले आहेत.

मागील एका दशकाहून अधिक काळात भारतीय कुटुंबांच्या आर्थिक बचती, रोख स्वरूपात ठेवलेल्या किंवा बँक ठेवी आणि इतर आर्थिक साधनांमध्ये गुंतवल्या गेलेल्या रकमेत घट होताना दिसते. ती २०११-२०१२ मधील सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) ७.४ टक्क्यांवरून घसरून २०२२-२०२३ मध्ये जीडीपीच्या ५.३ टक्क्यावर येऊन पोहोचली. २०२३-२०२४ मध्ये ती जीडीपीच्या ६ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ही घसरण निश्चितच चिंतेचा विषय आहे.

भारतातील ज्येष्ठ नागरिक प्रामुख्याने आयुष्यभर मेहनतीने कमविलेला पैसा विविध बचत योजनेत ठेवून त्यावर  मिळणाऱ्या व्याजावर आपले आयुष्य सुकर करतो. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आर्थिक संशोधन विभागाच्या अहवालानुसार देशात ज्येष्ठ नागरिकांची अंदाजे ७४ दशलक्ष मुदत ठेव खाती आहेत, ज्यात एकूण ठेवींची रक्कम ३४ लाख कोटी रुपये आहे. मागील पाच वर्षांमध्ये, ज्येष्ठ नागरिकांची प्रतिठेव सरासरी ४.६ लाख रुपये इतकी झाली आहे, जी पाच वर्षांपूर्वी ३.३ लाख रुपये होती. येत्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांचा साकल्याने विचार होणे सामाजिक न्यायांतर्गत अत्यंत महत्त्वाचे आहे.