शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

झाड लावताय? - कुठे, कोणतं आणि कधी लावाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 08:59 IST

पावसाळा जवळ आला की, वृक्षारोपणाचा उत्साह सुरू होतो. झाड लावणे हे जबाबदारीने स्वीकारण्याचे व्रत आहे, असे सांगणारा हा लेख आजच्या वृक्षदिनानिमित्त..

- शेखर गायकवाड, आपलं पर्यावरण संस्था, नाशिक -

पावसाळा जवळ आला की, बऱ्याच ठिकाणी वृक्षारोपणाची लगबग सुरू होते. कोणतेही झाड लावताना ते कुठे लावणार, कोणते लावणार आणि त्याची काळजी कशी घेणार, याच नीट विचार करायला हवा. त्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे :१. रेन-ट्री, गुलमोहर, पेल्ट्राफॉर्म, अकेशिया, स्पॅतोडिया, गिरीपुष्प, निलगिरी, सुबाभुळे यांसारखी पटकन वाढणारी विदेशी प्रजातींची झाडे लावण्यावर प्रारंभी भर होता. त्यामुळे जैवविविधतेचे मोठे नुकसान होते हे लक्षात आल्यावर हल्ली जो तो नर्सरीमध्ये जाऊन वड, पिंपळ, उंबर, कडूनिंब या प्रजातींची मागणी करताना दिसतो. हे सरसकटीकरण टाळा.२. जागेच्या उपलब्धतेनुसार  प्रदेशनिष्ठ झाडांची निवड अपेक्षित आहे. रस्त्यालगत, इमारतीच्या आवारात, उद्यानासाठी सोडलेल्या जागेत, डोंगरावर,  गावाजवळच्या मोकळ्या जागेत वृक्षारोपण करताना योग्य ठिकाणी योग्य वृक्ष प्रजातीची निवड करा.३. पूर्वी आपल्या अवतीभवती जी पर्यावरणपूरक देशी झाडे होती, त्यातील काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशा वृक्षांची रोपे मिळवून किंवा तयार करून आपल्या परिसरात लावण्याचा प्रयत्न करणे हेच वृक्षारोपणाचे अभ्यासपूर्ण, शाश्वत कार्य होय.४. वृक्षरोपण म्हणजे डोळ्याला हिरवळ दिसण्यासाठी करायची कृती नव्हे, तर ती एक शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे. झाड केवळ लावणेच नव्हे, तर त्याच्या वाढीसाठी काम करण्याचे, संयमाने स्वीकारण्याचे हे व्रत आहे. ५. वृक्षारोपण करताना आपण ज्या भागात वृक्षारोपण करत आहोत, तेथील नैसर्गिक परिसंस्था आणि पर्यावरण यांचे भान असणे महत्त्वाचे. महाराष्ट्रात विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वातावरण आहे. काही ठिकाणी प्रचंड पाऊस पडतो. नाशिक, पुणे इत्यादि ठिकाणी समतोल प्रमाणात पाऊस पडतो. काही ठिकाणी पावसाचे प्रमाण अल्प असते. अशा वेळेस त्या त्या ठिकाणी वृक्षारोपण करताना तिथल्या वातावरणाच्या अनुसरून आपण वृक्षांची लागवड केली, तर ती नक्कीच फलदायी ठरेल.६. काही देशी प्रजातींची झाडे सगळ्या वातावरणात वाढतात, तर काही ठरावीक प्रदेशांत वाढतात. प्रदेशनिष्ठ वृक्षांची रोपे नको त्या ठिकाणी लावण्याचा अट्टाहास करून आपण वेळ व श्रम वाया घालवतो. त्याला यश न मिळाल्यास काही प्रमाणात आपल्याला नैराश्य येतं.७.  उदाहरणार्थ : बरेच लोक कडुनिंबाची रोपे कोकण पट्ट्यामध्ये म्हणजेच जास्त पावसाच्या ठिकाणी लावतात, ती थोडे दिवस तग धरतात आणि नंतर सुकून जातात. कडुनिंब उष्ण, कोरड्या हवामानात नैसर्गिकरीत्या जोमाने वाढतो.  डोंगराळ व उष्ण प्रदेशात कदंबाचे झाड तग धरत नाही. कदंबाला चांगली ओलावा टिकवून ठेवणारी माती लागते, जिथे ते चांगल्या प्रकारे वाढतात. ८. जागेच्या उपलब्धतेनुसार झाडांची निवड करावी. आटोपशीर वाढणारे वृक्ष इमारतीच्या व बंगल्याच्या आवारात लागवडीस योग्य  ठरतात. पारिजातक, मधू कामिनी, बहावा, बकुळ, सोनचाफा, फालसा, आपटा, बेल, कढीपत्ता, सीताअशोक, आंबाअशोक, काळा कुडा, पांढरा कुडा इत्यादी झाडे बंगले व इमारतींच्या पुढे-मागे असलेल्या मोकळ्या जागेत लावल्यास ते उपयुक्त ठरू शकतात. याशिवाय अशोक, सुपारी, भेरलीमाड, शिंदी ही सरळ वाढणारी झाडेही येथे लावता येऊ शकतात.९. काॅलनी रोडला लागून असलेल्या जागेत ताम्हण, बकुळ, बहावा, मुचकुंद, पुत्रंजीवा, दांडोस, कांचन,, सेमलाकांचन, कुसुम, तिवस, शिसम, पाडळ, असाणा.. इत्यादी झाडे योग्य ठरू शकतात.१०. पारंपरिक झाडे लावताना त्यात शोभिवंत, सुंदर फुलोरा देणारे, पक्ष्यांना उपयोगी.. असा उपलब्ध जागेचा विचार करून लागवड केल्यास आपल्या परिसराची शोभा तर वाढेलच, पण त्यातून उपयुक्तताही साधली जाईल.  थोडक्यात काय, तर वृक्षारोपण करताना त्या त्या प्रदेशातली जैवविविधता आपण राखू शकलो तरच त्या वृक्षारोपणाला खरा अर्थ आहे. 

 

टॅग्स :Plantsइनडोअर प्लाण्ट्स