शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

कुठे गेली ती आपुलकी, बांधिलकी आणि एकमेकांसाठी जीव देणारा बंधुभाव?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2023 07:39 IST

जिवाला जीव देणारी भावना लोप पावते आहे. स्वत:चा अजेंडा लादण्यासाठी कोण कुठल्या थराला जाऊ शकतं हे चित्र दिवसेंदिवस ठळक होत आहे.

- पद्माकर उखळीकर, परभणी

अलीकडे अनेक अस्वस्थ करणाऱ्या घटना घडताहेत. कुठे गेली ती आपुलकी, कुठे गेली ती बांधिलकी, बंधुभाव आणि एकमेकांसाठी जिवाला जीव देणारी भावना? राजकीय लाभापोटी देशातील सलोखा बिघडवण्याचे काम काही प्रवृत्ती करत असतात. देशातील नागरिकांवर स्वत:चा अजेंडा लादण्यासाठी कोण कुठल्या थराला जाऊ शकतं हे चित्र दिवसेंदिवस ठळक होत आहे. कुठलाही एकच विचार सर्वांनी मान्य करावा ही कुठली लोकशाही? फोडा आणि राज्य करा हा विचार रूढ होत आहे आणि याला काही सनातनी विचारांतून दुजोरा मिळत आहे.

लोकशाहीत प्रत्येकाला विचारस्वातंत्र्य आहे. प्रत्येक व्यक्तीला त्या त्या विचारसरणीचा प्रचार, प्रसार करण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिला आहे. पण याचा अर्थ कोणाला काहीही करण्याला कसंही वागण्याला मोकळीक आहे, असं नव्हे.

महाराष्ट्राने ऐक्याचा आदर्श देशाला घालून दिला आहे. पण आता महाराष्ट्राची ओळख दंगलींचा महाराष्ट्र अशी होते की काय याची चिंता वाटते. छत्रपती संभाजीनगर, विदर्भातील अकोल्यात, नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे गेल्या दोन तीन महिन्यांत दंगली घडल्या तर त्र्यंबकेश्वर येथे कटू प्रसंग होता होता वाचला. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाली आणि यातून अकोल्यात वादाला सुरुवात झाली. किरकोळ वादातून हाणामारी झाली व दंगल भडकली. दोन दिवस अकोला शहर धुमसत होते. अकोल्यातील दंगल शमत नाही तोवर नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे हिंसाचार झाला. या हिंसाचाराचे दंगलीत रूपांतर होऊन वाहने पेटवली गेली. त्र्यंबकेश्वरमध्येही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ मे रोजी हिंसाचार झाला. अनेक गाड्या, दुकाने जाळली गेली. सर्वसामान्यांनी मोठ्या कष्टाने, आपल्या घामाने उभारलेली संपत्ती, मिळकत डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होते तेव्हा त्या व्यक्तीला काय वाटत असेल? कोणत्या प्रसंगांतून ती जात असेल?

अशावेळी जिवंतपणीच ती थोडी थोडी मरत असते. दंगलीत अनेक निष्पापांचे बळी जातात. ज्या गल्लीबोळात, चौकात दंगल पेट घेते, तेव्हा 'पेटवणाऱ्यांचं काहीच जळत नाही. जळते ती भावना, बांधिलकी, आपुलकी, डोळ्यांत तरळणारी आणि आजवर जपलेली सारी स्वप्नं, इथे कुणीही असू शकतं. हिंदू, मुस्लीम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, इसाई पण शेवटी तो आहे तर आपल्याच देशाचा नागरिक, आपलाच भाऊ ना। मग, दंगल कुणासाठी?.