शहरं
Join us  
Trending Stories
1
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
2
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
3
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
4
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
5
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
6
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
7
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
8
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!
9
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
10
"कुठल्याही भाषेला विरोध नाही पण...", मनसेच्या हिंदी भाषा सक्ती विरोधानंतर मराठी अभिनेत्री स्पष्टच बोलली
11
ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला
12
रेस्टॉरंट वेटर ते क्रिकेट अंपायर...! IPL मध्ये दिसणारा हा मराठमोळा पंच कोण आहे?
13
नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे, यामागचं कारण आलं समोर
14
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
15
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा
16
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी!
17
Zeeshan Siddique: '१० कोटी दे नाहीतर तुला वडिलांसारखे मारून टाकीन'; झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी
18
अभिनेता टायगर श्रॉफच्या हत्येसाठी २ लाखाची सुपारी दिल्याचा दावा; एकावर गुन्हा दाखल
19
ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय
20
रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?

कुठे गेली ती आपुलकी, बांधिलकी आणि एकमेकांसाठी जीव देणारा बंधुभाव?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2023 07:39 IST

जिवाला जीव देणारी भावना लोप पावते आहे. स्वत:चा अजेंडा लादण्यासाठी कोण कुठल्या थराला जाऊ शकतं हे चित्र दिवसेंदिवस ठळक होत आहे.

- पद्माकर उखळीकर, परभणी

अलीकडे अनेक अस्वस्थ करणाऱ्या घटना घडताहेत. कुठे गेली ती आपुलकी, कुठे गेली ती बांधिलकी, बंधुभाव आणि एकमेकांसाठी जिवाला जीव देणारी भावना? राजकीय लाभापोटी देशातील सलोखा बिघडवण्याचे काम काही प्रवृत्ती करत असतात. देशातील नागरिकांवर स्वत:चा अजेंडा लादण्यासाठी कोण कुठल्या थराला जाऊ शकतं हे चित्र दिवसेंदिवस ठळक होत आहे. कुठलाही एकच विचार सर्वांनी मान्य करावा ही कुठली लोकशाही? फोडा आणि राज्य करा हा विचार रूढ होत आहे आणि याला काही सनातनी विचारांतून दुजोरा मिळत आहे.

लोकशाहीत प्रत्येकाला विचारस्वातंत्र्य आहे. प्रत्येक व्यक्तीला त्या त्या विचारसरणीचा प्रचार, प्रसार करण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिला आहे. पण याचा अर्थ कोणाला काहीही करण्याला कसंही वागण्याला मोकळीक आहे, असं नव्हे.

महाराष्ट्राने ऐक्याचा आदर्श देशाला घालून दिला आहे. पण आता महाराष्ट्राची ओळख दंगलींचा महाराष्ट्र अशी होते की काय याची चिंता वाटते. छत्रपती संभाजीनगर, विदर्भातील अकोल्यात, नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे गेल्या दोन तीन महिन्यांत दंगली घडल्या तर त्र्यंबकेश्वर येथे कटू प्रसंग होता होता वाचला. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाली आणि यातून अकोल्यात वादाला सुरुवात झाली. किरकोळ वादातून हाणामारी झाली व दंगल भडकली. दोन दिवस अकोला शहर धुमसत होते. अकोल्यातील दंगल शमत नाही तोवर नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे हिंसाचार झाला. या हिंसाचाराचे दंगलीत रूपांतर होऊन वाहने पेटवली गेली. त्र्यंबकेश्वरमध्येही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ मे रोजी हिंसाचार झाला. अनेक गाड्या, दुकाने जाळली गेली. सर्वसामान्यांनी मोठ्या कष्टाने, आपल्या घामाने उभारलेली संपत्ती, मिळकत डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होते तेव्हा त्या व्यक्तीला काय वाटत असेल? कोणत्या प्रसंगांतून ती जात असेल?

अशावेळी जिवंतपणीच ती थोडी थोडी मरत असते. दंगलीत अनेक निष्पापांचे बळी जातात. ज्या गल्लीबोळात, चौकात दंगल पेट घेते, तेव्हा 'पेटवणाऱ्यांचं काहीच जळत नाही. जळते ती भावना, बांधिलकी, आपुलकी, डोळ्यांत तरळणारी आणि आजवर जपलेली सारी स्वप्नं, इथे कुणीही असू शकतं. हिंदू, मुस्लीम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, इसाई पण शेवटी तो आहे तर आपल्याच देशाचा नागरिक, आपलाच भाऊ ना। मग, दंगल कुणासाठी?.