शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

कुठे गेली ती आपुलकी, बांधिलकी आणि एकमेकांसाठी जीव देणारा बंधुभाव?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2023 07:39 IST

जिवाला जीव देणारी भावना लोप पावते आहे. स्वत:चा अजेंडा लादण्यासाठी कोण कुठल्या थराला जाऊ शकतं हे चित्र दिवसेंदिवस ठळक होत आहे.

- पद्माकर उखळीकर, परभणी

अलीकडे अनेक अस्वस्थ करणाऱ्या घटना घडताहेत. कुठे गेली ती आपुलकी, कुठे गेली ती बांधिलकी, बंधुभाव आणि एकमेकांसाठी जिवाला जीव देणारी भावना? राजकीय लाभापोटी देशातील सलोखा बिघडवण्याचे काम काही प्रवृत्ती करत असतात. देशातील नागरिकांवर स्वत:चा अजेंडा लादण्यासाठी कोण कुठल्या थराला जाऊ शकतं हे चित्र दिवसेंदिवस ठळक होत आहे. कुठलाही एकच विचार सर्वांनी मान्य करावा ही कुठली लोकशाही? फोडा आणि राज्य करा हा विचार रूढ होत आहे आणि याला काही सनातनी विचारांतून दुजोरा मिळत आहे.

लोकशाहीत प्रत्येकाला विचारस्वातंत्र्य आहे. प्रत्येक व्यक्तीला त्या त्या विचारसरणीचा प्रचार, प्रसार करण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिला आहे. पण याचा अर्थ कोणाला काहीही करण्याला कसंही वागण्याला मोकळीक आहे, असं नव्हे.

महाराष्ट्राने ऐक्याचा आदर्श देशाला घालून दिला आहे. पण आता महाराष्ट्राची ओळख दंगलींचा महाराष्ट्र अशी होते की काय याची चिंता वाटते. छत्रपती संभाजीनगर, विदर्भातील अकोल्यात, नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे गेल्या दोन तीन महिन्यांत दंगली घडल्या तर त्र्यंबकेश्वर येथे कटू प्रसंग होता होता वाचला. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट व्हायरल झाली आणि यातून अकोल्यात वादाला सुरुवात झाली. किरकोळ वादातून हाणामारी झाली व दंगल भडकली. दोन दिवस अकोला शहर धुमसत होते. अकोल्यातील दंगल शमत नाही तोवर नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे हिंसाचार झाला. या हिंसाचाराचे दंगलीत रूपांतर होऊन वाहने पेटवली गेली. त्र्यंबकेश्वरमध्येही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ मे रोजी हिंसाचार झाला. अनेक गाड्या, दुकाने जाळली गेली. सर्वसामान्यांनी मोठ्या कष्टाने, आपल्या घामाने उभारलेली संपत्ती, मिळकत डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होते तेव्हा त्या व्यक्तीला काय वाटत असेल? कोणत्या प्रसंगांतून ती जात असेल?

अशावेळी जिवंतपणीच ती थोडी थोडी मरत असते. दंगलीत अनेक निष्पापांचे बळी जातात. ज्या गल्लीबोळात, चौकात दंगल पेट घेते, तेव्हा 'पेटवणाऱ्यांचं काहीच जळत नाही. जळते ती भावना, बांधिलकी, आपुलकी, डोळ्यांत तरळणारी आणि आजवर जपलेली सारी स्वप्नं, इथे कुणीही असू शकतं. हिंदू, मुस्लीम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, इसाई पण शेवटी तो आहे तर आपल्याच देशाचा नागरिक, आपलाच भाऊ ना। मग, दंगल कुणासाठी?.