शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

दगडी भिंतीआड डांबलेली तरुण पोरं इथे येतात तरी कुठून?; तरुणाईची पावलं गुन्हेगारीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 09:05 IST

तुरुंगातील तरुणांच्या वाढत्या प्रमाणाचं मूळ सामाजिक व्यवस्थेत दडलंय. नकारात्मक सामाजिक व्यवस्थेमुळे तरुणाईची पावलं गुन्हेगारीकडे पडत आहेत.

- रवींद्र राऊळ

राज्यभरातील जवळपास साठ तुरुंगांमध्ये डांबलेल्या ३८ हजार कैद्यांपैकी सुमारे ५२ टक्के कैदी तरुण असून कारागृहांच्या दगडी भिंतीआड अशी तरुणाई कोमेजण्यात बिहार आणि उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो, अशी माहिती कारागृह विभागाने दिलेल्या तपशिलातून उघड झाली आहे.

१८ ते ३० वयोगटातील ही इतकी मुलं करिअर करायचं सोडून गुन्हेगारीच्या वेगवेगळ्या मार्गांनी तुरुंगात कशी आणि कुठून पोहोचतात, हा प्रश्न छळणारा आहे. याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुरुंगात डांबलेल्या तरुणांपेक्षा कैकपटीत गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण तुरुंगाबाहेरही समाजात मोकाट आहेत. त्यांना वेळीच सावरायचं कसं?  तरुणवर्ग दाेरी कापलेल्या पतंगासारखा भरकटत आहे आणि तुरुंगातील तरुणाईचं प्रमाण ही त्याची लिटमस टेस्ट आहे.

चार महिन्यांपूर्वी दहावी-बारावीच्या ऑफलाइन परीक्षांसाठी राज्यातील विद्यार्थी मनापासून तयारी करत असतानाच काही हजार हुल्लडबाज विद्यार्थी मात्र ही परीक्षा ऑनलाइन घेण्यात याव्यात या मागणीसाठी हिंदुस्थानी भाऊने केलेल्या तर्कशून्य आणि बेजबाबदार आंदोलनात सहभागी होत रस्त्यावर उतरले होते. यातीलच बहुतांशी मुलं पुढील काळात समाजात नेमक्या कुठल्या स्थानी असतील? स्वत:च्या सोयीसाठी सरकारने निर्माण केलेली व्यवस्थाच नाकारणारी मुलं तुरुंगात नसली तरी स्वत:ला कोंडवाड्यात कोंडून घेणारीच म्हटली पाहिजेत. त्याआधी पुण्यात कुख्यात गजा मारणे याची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर तळोजा ते पुणे अशी मिरवणूक काढण्यात आली होती. तेव्हाही त्यात शेकडो दुचाकीस्वार सहभागी झाले होते. या दोन्ही घटना सध्याच्या तरुणांसमोरील आयडॉल बदलत आहेत का, असा प्रश्न उपस्थित करतात आणि तुरुंगांमध्ये तरुणांची गर्दी का, याचं उत्तर सापडू लागतं.

पूर्वी शहरी भागात गुन्हेगारीचं प्रमाण अधिक असायचं. संघटित गुन्हेगारी ही शहरी भागात जास्त प्रमाणात होती. आता हा काटा ग्रामीण भागाकडे मोठ्या प्रमाणात झुकू लागलाय. संघटित गुन्हेगारीचं महत्त्व इथल्या समाजकंटकांनी समजून घेतलंय. ग्रामीण भागातही धटिंगणांचा धुडगूस अधिक प्रमाणात वाढायला लागलाय. अनेक व्हायरल व्हिडिओंमध्ये तो दिसून येतो. हप्तेबाजीसाठी दांडगाई करणारे, बर्थ-डेला मध्यरात्री तलवारीने केक कापून आपली जरब वाढवण्यावर तरुण भर देताहेत. समाजात अशी अशांतता निर्माण करून आपली दहशतवादी प्रतिमा तयार करणारे आयुष्यात कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर तुरुंगाआड पोहोचतात.

तुरुंगातील तरुणांच्या या वाढत्या प्रमाणाचं मूळ हे सामाजिक व्यवस्था आणि त्याच्या बांधणीत दडलंय. नकारात्मक सामाजिक व्यवस्था तरुणवर्गाला त्याची पावलं गुन्हेगारीकडे वळवण्यास भाग पाडत आहे. भ्रष्टाचाराला मिळालेली प्रतिष्ठा आणि इझी मनीच्या मोहापायी खरेखुरे आयडॉल तरुणांना आपलेसे वाटेना झालेत. त्यांच्या कर्तृत्वाची महती आणि मोल या तरुणांच्या मनात बिंबवण्यात समाज अपयशी ठरलाय का, असा सवाल उभा ठाकला आहे.

बहुतांशी युवा कैदी हे तुरुंगात येण्याआधी तेच त्यांच्या घरचे मिळवते असतात. त्यामुळे त्यांच्या तुरुंगातील मुक्कामाच्या काळात उदरनिर्वाह करणं कुटुंबीयांना अवघड जात असतं. त्यांची परवड हाही एक मोठा प्रश्न आहे. कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी स्वीकारण्यासाठी पन्नास हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्याची योजना सरकारने तयार केली आहे. कैदी तुरुंगात काम करून ही कर्जफेड करू शकतात. अशा योजना स्तुत्यच आहेत, पण मुळात हे तरुण तुरुंगांच्या दिशेने वळणारच नाहीत यासाठी निदान काही करता येईल का, याचा विचार कधी होईल? 

टॅग्स :Arrestअटक