शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

दगडी भिंतीआड डांबलेली तरुण पोरं इथे येतात तरी कुठून?; तरुणाईची पावलं गुन्हेगारीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 09:05 IST

तुरुंगातील तरुणांच्या वाढत्या प्रमाणाचं मूळ सामाजिक व्यवस्थेत दडलंय. नकारात्मक सामाजिक व्यवस्थेमुळे तरुणाईची पावलं गुन्हेगारीकडे पडत आहेत.

- रवींद्र राऊळ

राज्यभरातील जवळपास साठ तुरुंगांमध्ये डांबलेल्या ३८ हजार कैद्यांपैकी सुमारे ५२ टक्के कैदी तरुण असून कारागृहांच्या दगडी भिंतीआड अशी तरुणाई कोमेजण्यात बिहार आणि उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो, अशी माहिती कारागृह विभागाने दिलेल्या तपशिलातून उघड झाली आहे.

१८ ते ३० वयोगटातील ही इतकी मुलं करिअर करायचं सोडून गुन्हेगारीच्या वेगवेगळ्या मार्गांनी तुरुंगात कशी आणि कुठून पोहोचतात, हा प्रश्न छळणारा आहे. याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुरुंगात डांबलेल्या तरुणांपेक्षा कैकपटीत गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण तुरुंगाबाहेरही समाजात मोकाट आहेत. त्यांना वेळीच सावरायचं कसं?  तरुणवर्ग दाेरी कापलेल्या पतंगासारखा भरकटत आहे आणि तुरुंगातील तरुणाईचं प्रमाण ही त्याची लिटमस टेस्ट आहे.

चार महिन्यांपूर्वी दहावी-बारावीच्या ऑफलाइन परीक्षांसाठी राज्यातील विद्यार्थी मनापासून तयारी करत असतानाच काही हजार हुल्लडबाज विद्यार्थी मात्र ही परीक्षा ऑनलाइन घेण्यात याव्यात या मागणीसाठी हिंदुस्थानी भाऊने केलेल्या तर्कशून्य आणि बेजबाबदार आंदोलनात सहभागी होत रस्त्यावर उतरले होते. यातीलच बहुतांशी मुलं पुढील काळात समाजात नेमक्या कुठल्या स्थानी असतील? स्वत:च्या सोयीसाठी सरकारने निर्माण केलेली व्यवस्थाच नाकारणारी मुलं तुरुंगात नसली तरी स्वत:ला कोंडवाड्यात कोंडून घेणारीच म्हटली पाहिजेत. त्याआधी पुण्यात कुख्यात गजा मारणे याची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर तळोजा ते पुणे अशी मिरवणूक काढण्यात आली होती. तेव्हाही त्यात शेकडो दुचाकीस्वार सहभागी झाले होते. या दोन्ही घटना सध्याच्या तरुणांसमोरील आयडॉल बदलत आहेत का, असा प्रश्न उपस्थित करतात आणि तुरुंगांमध्ये तरुणांची गर्दी का, याचं उत्तर सापडू लागतं.

पूर्वी शहरी भागात गुन्हेगारीचं प्रमाण अधिक असायचं. संघटित गुन्हेगारी ही शहरी भागात जास्त प्रमाणात होती. आता हा काटा ग्रामीण भागाकडे मोठ्या प्रमाणात झुकू लागलाय. संघटित गुन्हेगारीचं महत्त्व इथल्या समाजकंटकांनी समजून घेतलंय. ग्रामीण भागातही धटिंगणांचा धुडगूस अधिक प्रमाणात वाढायला लागलाय. अनेक व्हायरल व्हिडिओंमध्ये तो दिसून येतो. हप्तेबाजीसाठी दांडगाई करणारे, बर्थ-डेला मध्यरात्री तलवारीने केक कापून आपली जरब वाढवण्यावर तरुण भर देताहेत. समाजात अशी अशांतता निर्माण करून आपली दहशतवादी प्रतिमा तयार करणारे आयुष्यात कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर तुरुंगाआड पोहोचतात.

तुरुंगातील तरुणांच्या या वाढत्या प्रमाणाचं मूळ हे सामाजिक व्यवस्था आणि त्याच्या बांधणीत दडलंय. नकारात्मक सामाजिक व्यवस्था तरुणवर्गाला त्याची पावलं गुन्हेगारीकडे वळवण्यास भाग पाडत आहे. भ्रष्टाचाराला मिळालेली प्रतिष्ठा आणि इझी मनीच्या मोहापायी खरेखुरे आयडॉल तरुणांना आपलेसे वाटेना झालेत. त्यांच्या कर्तृत्वाची महती आणि मोल या तरुणांच्या मनात बिंबवण्यात समाज अपयशी ठरलाय का, असा सवाल उभा ठाकला आहे.

बहुतांशी युवा कैदी हे तुरुंगात येण्याआधी तेच त्यांच्या घरचे मिळवते असतात. त्यामुळे त्यांच्या तुरुंगातील मुक्कामाच्या काळात उदरनिर्वाह करणं कुटुंबीयांना अवघड जात असतं. त्यांची परवड हाही एक मोठा प्रश्न आहे. कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी स्वीकारण्यासाठी पन्नास हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्याची योजना सरकारने तयार केली आहे. कैदी तुरुंगात काम करून ही कर्जफेड करू शकतात. अशा योजना स्तुत्यच आहेत, पण मुळात हे तरुण तुरुंगांच्या दिशेने वळणारच नाहीत यासाठी निदान काही करता येईल का, याचा विचार कधी होईल? 

टॅग्स :Arrestअटक