शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दगडी भिंतीआड डांबलेली तरुण पोरं इथे येतात तरी कुठून?; तरुणाईची पावलं गुन्हेगारीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 09:05 IST

तुरुंगातील तरुणांच्या वाढत्या प्रमाणाचं मूळ सामाजिक व्यवस्थेत दडलंय. नकारात्मक सामाजिक व्यवस्थेमुळे तरुणाईची पावलं गुन्हेगारीकडे पडत आहेत.

- रवींद्र राऊळ

राज्यभरातील जवळपास साठ तुरुंगांमध्ये डांबलेल्या ३८ हजार कैद्यांपैकी सुमारे ५२ टक्के कैदी तरुण असून कारागृहांच्या दगडी भिंतीआड अशी तरुणाई कोमेजण्यात बिहार आणि उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो, अशी माहिती कारागृह विभागाने दिलेल्या तपशिलातून उघड झाली आहे.

१८ ते ३० वयोगटातील ही इतकी मुलं करिअर करायचं सोडून गुन्हेगारीच्या वेगवेगळ्या मार्गांनी तुरुंगात कशी आणि कुठून पोहोचतात, हा प्रश्न छळणारा आहे. याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुरुंगात डांबलेल्या तरुणांपेक्षा कैकपटीत गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण तुरुंगाबाहेरही समाजात मोकाट आहेत. त्यांना वेळीच सावरायचं कसं?  तरुणवर्ग दाेरी कापलेल्या पतंगासारखा भरकटत आहे आणि तुरुंगातील तरुणाईचं प्रमाण ही त्याची लिटमस टेस्ट आहे.

चार महिन्यांपूर्वी दहावी-बारावीच्या ऑफलाइन परीक्षांसाठी राज्यातील विद्यार्थी मनापासून तयारी करत असतानाच काही हजार हुल्लडबाज विद्यार्थी मात्र ही परीक्षा ऑनलाइन घेण्यात याव्यात या मागणीसाठी हिंदुस्थानी भाऊने केलेल्या तर्कशून्य आणि बेजबाबदार आंदोलनात सहभागी होत रस्त्यावर उतरले होते. यातीलच बहुतांशी मुलं पुढील काळात समाजात नेमक्या कुठल्या स्थानी असतील? स्वत:च्या सोयीसाठी सरकारने निर्माण केलेली व्यवस्थाच नाकारणारी मुलं तुरुंगात नसली तरी स्वत:ला कोंडवाड्यात कोंडून घेणारीच म्हटली पाहिजेत. त्याआधी पुण्यात कुख्यात गजा मारणे याची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर तळोजा ते पुणे अशी मिरवणूक काढण्यात आली होती. तेव्हाही त्यात शेकडो दुचाकीस्वार सहभागी झाले होते. या दोन्ही घटना सध्याच्या तरुणांसमोरील आयडॉल बदलत आहेत का, असा प्रश्न उपस्थित करतात आणि तुरुंगांमध्ये तरुणांची गर्दी का, याचं उत्तर सापडू लागतं.

पूर्वी शहरी भागात गुन्हेगारीचं प्रमाण अधिक असायचं. संघटित गुन्हेगारी ही शहरी भागात जास्त प्रमाणात होती. आता हा काटा ग्रामीण भागाकडे मोठ्या प्रमाणात झुकू लागलाय. संघटित गुन्हेगारीचं महत्त्व इथल्या समाजकंटकांनी समजून घेतलंय. ग्रामीण भागातही धटिंगणांचा धुडगूस अधिक प्रमाणात वाढायला लागलाय. अनेक व्हायरल व्हिडिओंमध्ये तो दिसून येतो. हप्तेबाजीसाठी दांडगाई करणारे, बर्थ-डेला मध्यरात्री तलवारीने केक कापून आपली जरब वाढवण्यावर तरुण भर देताहेत. समाजात अशी अशांतता निर्माण करून आपली दहशतवादी प्रतिमा तयार करणारे आयुष्यात कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर तुरुंगाआड पोहोचतात.

तुरुंगातील तरुणांच्या या वाढत्या प्रमाणाचं मूळ हे सामाजिक व्यवस्था आणि त्याच्या बांधणीत दडलंय. नकारात्मक सामाजिक व्यवस्था तरुणवर्गाला त्याची पावलं गुन्हेगारीकडे वळवण्यास भाग पाडत आहे. भ्रष्टाचाराला मिळालेली प्रतिष्ठा आणि इझी मनीच्या मोहापायी खरेखुरे आयडॉल तरुणांना आपलेसे वाटेना झालेत. त्यांच्या कर्तृत्वाची महती आणि मोल या तरुणांच्या मनात बिंबवण्यात समाज अपयशी ठरलाय का, असा सवाल उभा ठाकला आहे.

बहुतांशी युवा कैदी हे तुरुंगात येण्याआधी तेच त्यांच्या घरचे मिळवते असतात. त्यामुळे त्यांच्या तुरुंगातील मुक्कामाच्या काळात उदरनिर्वाह करणं कुटुंबीयांना अवघड जात असतं. त्यांची परवड हाही एक मोठा प्रश्न आहे. कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी स्वीकारण्यासाठी पन्नास हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्याची योजना सरकारने तयार केली आहे. कैदी तुरुंगात काम करून ही कर्जफेड करू शकतात. अशा योजना स्तुत्यच आहेत, पण मुळात हे तरुण तुरुंगांच्या दिशेने वळणारच नाहीत यासाठी निदान काही करता येईल का, याचा विचार कधी होईल? 

टॅग्स :Arrestअटक